शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

दर वाढला... कांदा ऐरणी फुटल्या!

By admin | Updated: June 30, 2015 00:20 IST

असे असते सुरक्षा कवच

काद्याशिवाय दैनंदिन आहाराचीही कल्पना करवत नाही. कांद्याचे दर वाढल्यामुळे शेतकरी आनंदी झाले असून, वाढत्या दरामुळे गृहिणींच्या डोळ्यातून पाणी आणले आहे. बाजारपेठेतील वाढत्या दराचा फायदा करून घेण्यासाठी शेतकरी आजवर वखारी (ऐरणी) मध्ये साठवून ठेवलेला कांदा बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात कांद्याचे दर मार्केटमध्ये अचानक उतरल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. या उतरलेल्या दरामुळे वखार असलेल्या शेतकऱ्यांनी कांद्याची साठवण करून ठेवली होती. जून महिन्यात अचानक कांद्याचे दर वाढू लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या साठवणुकीच्या कांद्याकडे शेताच्या बांधावर कांदा व्यापारी फेऱ्या मारू लागले आहेत. खटाव तालुक्यात कांदा उत्पादक ऐरणीत कांदा साठवून ठेवत असल्यामुळे आता काद्यांचे दर तेजीत आले आहेत. त्यामुळे जिकडे-तिकडे वखारी उघडून कांदा निवडण्याचे काम सुरू झाले आहे.गृहिणीच्या रोजच्या वापरातील अविभाज्य असणाऱ्या कांद्याचे दर वाढत असल्यामुळे त्याचे दर २० ते २५ रुपये प्रतिकिलो दराने सुरू झाल्यामुळे आता मात्र गृहिणीच्या स्वयंपाक घरातील बजेट कोलमडत आहे. कांद्याच्या उच्चांकी दराची फोडणी बसल्यामुळे आता अन्नाला चव तरी कशी येणार हा श्रीमंतांबरोबरच सर्वसामान्य आणि नोकरदारांच्या घरात प्रश्न आवासनू निर्माण झाला असल्याचे दिसत आहे.असे असते सुरक्षा कवचबांबूच्या कापापासून बनवलेल्या ताटीचा वापर केला जातो. शेतातच चर काढून त्यामध्ये कांदा ओतला जातो. या चरीच्या कडेने सुरुवातीला तिन्ही बाजूंनी ताटीने बंदिस्त करून त्यात कांदा ओतला जातो. कांद्याच्या उपलब्धेनुसार ऐरण बनविलेली असते. ऐरणीसाठी गव्हाचे काड, वैरण तसेच बांबूच्या कळकाचा, सुतळीचा वापर केला जातो. तसेच वैरण व काड ताटीच्या बरोबर वापरला जातो. तसेच ऐरण तयार झाल्यानंतर त्याच्या वरील आच्छादनासाठी वैरण वापरली जाते. तसेच पावसाच्या तडाख्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सध्या प्लास्टिकच्या कागदांचाही आच्छादन घातले जाते.कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे आम्ही शेतकरी समाधानी आहोत. परंतु, कांद्याला प्रत्येक वेळी असा दर मिळतोच असे नाही. बऱ्याच वेळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कर्जही फेडता आलेले नाही. कांद्याच्या बीयापासून ते कांदा लागवडीपर्यंत शेतकऱ्याला येणारा खर्च त्यानंतर किडीपासून संरक्षण होण्यासाठी मारावे लागणारी किटकनाशके त्याला लागणाऱ्या मजुरीचा खर्च हे सर्व पाहता आता मिळालेला दर योग्य आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्याला आपला कांदा चार ते पाच रुपयाने सुध्दा विकावा लागला आहे त्यावेळी उत्पादनासाठी घातलेले पैसे व दर यामध्ये तफावत येते. त्यामुळे हा खर्चाचा ताळमेळ कुठेच बसवता येत नाही. यावर्षात माझ्यासारख्या बऱ्याच शेतकऱ्यांनी ऐरणीत कांदा साठवणुक करुन ठेवला परंतु गारपीट व वादळी पावसात ऐरणीतील निम्मा कांदा वाया गेला आहे.- दीपक घाडगे,कांदा उत्पादक शेतकरी, खटाव