शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रंक असो वा राव... संस्थात्मक विलगीकरण हाच पर्याय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:39 IST

शासनाचा निर्णय : महामारी रोखण्यासाठी आता कोणताही दुजाभाव नको सागर गुजर लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये ...

शासनाचा निर्णय : महामारी रोखण्यासाठी आता कोणताही दुजाभाव नको

सागर गुजर

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना वाढीचा दर जास्त आहे अथवा जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत, अशा जिल्ह्यांमध्ये गृह विलगीकरण पूर्णतः बंद करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. सातारा जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या परिस्थितीमध्ये रुग्णाची आर्थिक परिस्थिती न बघता सर्वांनाच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अत्यवस्थ रुग्णांना रुग्णालयात, तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणामध्ये राहण्याची सक्ती आहे. मात्र अनेक ठिकाणी गृह विलगीकरण केलेले रुग्ण नियम डावलून रस्त्यावर फिरताना आढळले. चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण न करता अनेकजण लोकांमध्ये मिसळल्याने संसर्ग वाढला. तसेच घरामध्ये विलगीकरणाची सोय नसल्याने अनेकांना घरातूनच संसर्ग झाला. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणामध्ये ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

जिल्ह्यातील सरकारी शाळा, ग्रामपंचायतींच्या इमारती, सामाजिक भवन, गावापासून दूर असलेले मंगल कार्यालय याठिकाणी संस्थात्मक विलगीकरणाच्या तयारीला वेग आलेला आहे. विलगीकरण सेंटरमध्ये पाण्याची सुविधा स्वतंत्र टॉयलेट, बाथरूम, ऑक्सिजन मशीन, पंखे, टीव्ही या बाबींची तरतूद केली गेली, तर लोक १४ दिवसांचा कालावधी आनंदाने पूर्ण करतात, याचा अनुभव अनेक गावांनी घेतला आहे. आता त्यादृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत.

बाधितांच्या हातावर शिक्के कधी मारणार

जिल्ह्यामध्ये रोज २००० एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी बहुतांश बाधित रुग्ण हे गृह विलगीकरणामध्ये असतात. आता सरकारच्या निर्णयामुळे ते संस्थात्मक विलगीकरणात जातील; परंतु जिल्हा प्रशासनाने बाधितांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्के मारणे बंद केले असल्यामुळे बाधित कोण आणि सुदृढ कोण, यातील फरक कळत नाही आणि बाधित लोक सुदृढ लोकांच्या संपर्कात येऊन संसर्ग वाढतो आहे. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

नागझरी गावातील रोल मॉडेल

कोरेगाव तालुक्यातील नागझरी या गावामध्ये वीस रुग्ण सापडल्यानंतर तेथील ग्रामपंचायतीने सरपंच जितेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ संस्थात्मक विलगीकरण सुरू केले. गावातील मुक्ताबाई भोसले हायस्कूलमध्ये ३५ बेडचा आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्यात आला आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायत आणि लोकसहभागाच्या माध्यमातून आधुनिक असा आयसोलेशन वॉर्ड सुरू केला. आयसोलेशन वॉर्डमध्ये पंखे, टीव्ही बसविण्यात आला. येथील टॉयलेटची देखील दुरुस्ती करून घेण्यात आली. नागझरीचे रोल मॉडेल संपूर्ण जिल्ह्यात राबवले, तर संसर्ग रोखणे शक्य होईल.

जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण : १२ हजार

रुग्णालयात दाखल रुग्ण : ३ हजार ५००