शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

दुष्काळी नेतृत्वाची धमक रणजितसिंहांकडेच

By admin | Updated: August 27, 2014 23:25 IST

युुवराज संभाजीराजे : पिंगळी येथे सूतगिरणीचे उद्घाटन

दहिवडी : ‘आपला माणूस म्हणून परिचीत असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रणजितसिंंह देशमुख. त्यांनी ओसाड माळरानावर कोणतेही पद नसताना खटाव-माण तालुक्यांत औद्योगिक क्रांती घडवली. अशा होतकरू व संयमी नेतृत्वाला दुष्काळी मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी देणे, हे तुम्हा आम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी कोणत्याही पक्षातून अथवा अपक्ष निवडणूक लढविली तरी आपण त्यांच्या प्रचारास येणार आहे,’ असे ठाम प्रतिपादन कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांनी केले.पिंंगळी, ता. माण येथील माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सूतगिरणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कण्हेरी मठाचे काडसिद्धे्श्वर महाराज, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदारङ्कमदन भोसले, बाबूराव माने, माजी खासदार रणजितसिंंह मोहिते-पाटील, अभिनेते राहुल सोलापूरकर, आचार्य शिवानंद भारती, शामपुरी महाराज औंध, संग्रामभाऊ देशमुख, दादासाहेब गोडसे, अजितराव राजेमाने, रघुनाथ घाडगे, चंद्रकांत पवार, कुमार मगर, माणिकराव कोकरे, रामभाऊशेठ शिंंदे, शांताराम सुर्वे, उपस्थित होते.युवराज संभाजीराजे म्हणाले, ‘कायमङ्क दुष्काळी असणाऱ्या ङ्कमाण-खटाव तालुक्यांत रणजितसिंह देशमुख यांनी अत्यंत खडतर परस्थितीत सूतगिरणीच्या माध्यमातून चांगली कामे उभी केली आहेत. अशा कामांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलो आहे. आगामी निवडणुकीतही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहोत. राज्यभर फिरत असताना अशा युवकाकडे पाहिल्यानंतर या व्यासपीठावर व समोर असलेल्या असंख्य जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मी पुन्हा-पुन्हा येणार आहे. या भागाचा कायापालट करण्याची धमकङ्खरणजितसिंह देशमुख यांच्याकडेच आहे.’ काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, ‘मातीचे ऋण फेडण्यासाठी देशमुख ध्येयवादाने कार्यरत आहेत.’राहुल सोलापूरकर म्हणाले, ‘अध्यात्म व समाजकारणाची सांगड घालून राजकारण करणाऱ्या देशमुखांचे भवितव्य उज्ज्वल आहे.’ रणजितसिंंह देशमुख म्हणाले, ‘विद्यमान लोकप्रतिनिधींनी कितीही अडचणी आणल्या तरी आपण सूतगिरणीचा प्रकल्प यशस्वीपणेङ्कमार्गी लावला आहे. याच माळावर येत्या वर्षाभरात कोणत्याही परस्थितीत साखर कारखान्याची उभारणी करणार आहे. त्यांनी दिलेले आव्हान आपण आज स्वीकारत असून, कोणत्याही परस्थितीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण तयार झालो आहे. उरमोडी पाणी व एमआयडीसी संदर्भात वेगवेगळ्या वल्गना करून ते केविलवाणी धडपड करत आहेत.’ गोविंंदराव शिंंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रशांत कुलकर्णी, धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग खाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)