दहिवडी : ‘आपला माणूस म्हणून परिचीत असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे रणजितसिंंह देशमुख. त्यांनी ओसाड माळरानावर कोणतेही पद नसताना खटाव-माण तालुक्यांत औद्योगिक क्रांती घडवली. अशा होतकरू व संयमी नेतृत्वाला दुष्काळी मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी देणे, हे तुम्हा आम्हा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यांनी कोणत्याही पक्षातून अथवा अपक्ष निवडणूक लढविली तरी आपण त्यांच्या प्रचारास येणार आहे,’ असे ठाम प्रतिपादन कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे यांनी केले.पिंंगळी, ता. माण येथील माणदेशी प्रबोधनकार मागासवर्गीय सूतगिरणीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कण्हेरी मठाचे काडसिद्धे्श्वर महाराज, माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदारङ्कमदन भोसले, बाबूराव माने, माजी खासदार रणजितसिंंह मोहिते-पाटील, अभिनेते राहुल सोलापूरकर, आचार्य शिवानंद भारती, शामपुरी महाराज औंध, संग्रामभाऊ देशमुख, दादासाहेब गोडसे, अजितराव राजेमाने, रघुनाथ घाडगे, चंद्रकांत पवार, कुमार मगर, माणिकराव कोकरे, रामभाऊशेठ शिंंदे, शांताराम सुर्वे, उपस्थित होते.युवराज संभाजीराजे म्हणाले, ‘कायमङ्क दुष्काळी असणाऱ्या ङ्कमाण-खटाव तालुक्यांत रणजितसिंह देशमुख यांनी अत्यंत खडतर परस्थितीत सूतगिरणीच्या माध्यमातून चांगली कामे उभी केली आहेत. अशा कामांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहिलो आहे. आगामी निवडणुकीतही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार आहोत. राज्यभर फिरत असताना अशा युवकाकडे पाहिल्यानंतर या व्यासपीठावर व समोर असलेल्या असंख्य जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मी पुन्हा-पुन्हा येणार आहे. या भागाचा कायापालट करण्याची धमकङ्खरणजितसिंह देशमुख यांच्याकडेच आहे.’ काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, ‘मातीचे ऋण फेडण्यासाठी देशमुख ध्येयवादाने कार्यरत आहेत.’राहुल सोलापूरकर म्हणाले, ‘अध्यात्म व समाजकारणाची सांगड घालून राजकारण करणाऱ्या देशमुखांचे भवितव्य उज्ज्वल आहे.’ रणजितसिंंह देशमुख म्हणाले, ‘विद्यमान लोकप्रतिनिधींनी कितीही अडचणी आणल्या तरी आपण सूतगिरणीचा प्रकल्प यशस्वीपणेङ्कमार्गी लावला आहे. याच माळावर येत्या वर्षाभरात कोणत्याही परस्थितीत साखर कारखान्याची उभारणी करणार आहे. त्यांनी दिलेले आव्हान आपण आज स्वीकारत असून, कोणत्याही परस्थितीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आपण तयार झालो आहे. उरमोडी पाणी व एमआयडीसी संदर्भात वेगवेगळ्या वल्गना करून ते केविलवाणी धडपड करत आहेत.’ गोविंंदराव शिंंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रशांत कुलकर्णी, धनंजय क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. पांडुरंग खाडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
दुष्काळी नेतृत्वाची धमक रणजितसिंहांकडेच
By admin | Updated: August 27, 2014 23:25 IST