शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टिंगल करणाऱ्यांना रणजितसिंहांचे कृतीतून उत्तर

By admin | Updated: October 18, 2015 00:24 IST

पृथ्वीराज चव्हाण : नाव न घेता रामराजेंवर टीका; लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याच्या पहिल्या गळित हंगामाचा शुभारंभ

फलटण : ‘डोंगरात कोठे साखर कारखाना असतो का? अशी टिंगलटवाळी करणाऱ्यांना रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रामराजे यांचे नाव न घेता लगावला. तसेच ‘एफआरपी कायद्याची पुनर्रचना प्राधान्याने करणे गरजेचे आहे,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले. स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उपळवे, ता. फलटण येथे उभारलेल्या लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याच्या प्रथम गळित हंगामाच्या शुभारंभ व सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर होते. विक्रमी जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. भारत भालके, आयडीबीआय बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एस. के. वी. श्रीनिवास, स्रेहल बँकेचे जनरल मॅनेजर नरेंंद्रसिंग, वालचंदनगर इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर जी. के. पिल्ले, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, विठ्ठल शुगरचे अध्यक्ष संजय शिंदे, वसंतराव काळे, कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सुभाषराव बेडके, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, जयकुमार शिंदे, नाईक-निंबाळकर कुटुंबीय उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, रणजितसिंहांनी उपळवेसारख्या दुष्काळी भागात डोंगरावर मोठ्या जिद्दीने रेकॉर्डब्रेक विक्रमी वेळेत साखर कारखाना उभारला आहे. स्वराज दूध प्रकल्पाची ज्या पद्धतीने उभारणी करून त्याचे नाव देशात उंचावले, तसेच नाव साखर कारखान्याचे देशात उंचावून हा कारखाना रणजितसिंह देशात एक नंबरचा करतील,’. सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. साखरेचे दर उतरल्याने कारखानदार एफआरपी पण देऊ शकत नाहीत. मात्र एफआरपीचा कायदा असल्याने यातून कारखानदार अडचणीत येऊ नये व ऊसउत्पादकांनाही न्याय मिळावा, ही भावना मनात ठेवूनच एफआरपी कायद्याची पुनर्रचना व्हावी, अशी अपेक्षा आहे. साखर उद्योगाला वारंवार कर्ज देऊन कारखानदारांवर कर्जाचा बोजा टाकण्यापेक्षा केंद्र सरकारने कर्जाऐवजी अनुदान देऊन कारखान्यांना मदत करावी. शुगर डेव्हलपमेंट फंडात सुधारणा करून हा फंड बँकेत रूपांतर करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यात दुष्काळाचे तीव्र सावट आहे. यावर सरकार काय करणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांनी तातडीने जनतेला दिलासा देणारे निर्णय घ्यावेत. प्रत्यक्ष जागेवर जाऊन सरकारने उपाययोजना करावी. लोकप्रियतेपायी दुष्काळग्रस्तांची चेष्टा करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच रणजितसिंहांनी उभारलेला कारखाना फलटणचा भाग्यविधाता ठरणारा व यातून तालुक्यात परिवर्तनाची नांदी होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. रणजितसिंहांनी दीड वर्षापूर्वी आम्हाला भूमिपूजनला बोलावले होते, व आज उद्घाटनाला बोलावून प्रत्यक्ष साखर कारखाना सुरू केला. हे आठवे आश्चर्य असून, तालुक्यातील ऊसउत्पादकांना वरदान ठरणारा हा कारखाना होणार आहे. असे स्पष्ट करतानाच नवीन तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ठ वापरामुळे या कारखान्याला उज्ज्वल भविष्य असल्याचे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले. ज्यांना दुसऱ्याचे चांगले झालेले बघवत नाही. अशा तालुक्यातील सत्ताधारी राजेगटांनी रणजितसिंहांची कारखाना उभारताना टिंगलटवाळी केली. त्यांना प्रत्यक्ष कारखाना उभारून रणजिसिंहांनी जोरदार लगावली आहे. ज्यांनी तालुक्यातील साखर कारखानदारी, दूध संघ, बँका मोडून खाल्या त्यांनी साखर कारखानदारीवर बोलू नये. माण-खटावला पृथ्वीच्या अस्तापर्यंत पाणी येणार नाही, असे सांगणाऱ्यांनी माण तालुक्यात येऊन पाणी बघावे. वाढत असलेला ऊस बघावा, अशी जोरदार टीका आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजे यांचे नाव न घेता केली. माझ्या वडिलांनी तालुक्याच्या विकासासाठी सतत संघर्ष केलाय. त्यांचा संघर्ष बघूनच येथील जनतेसाठी स्वराज्य निर्माण करण्याचा आपण चंग बांधला आहे. मी दिवसरात्र तालुक्याच्या जनतेच्या चेहऱ्यावर सुख बघण्यासाठी झटले असून, तालुक्यातील ऊसउत्पादकांना उच्चांकी दर देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे. जनतेच्या हितासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवून त्यांना कर्जमुक्त करणार असल्याचे रणजितसिंहांनी यावेळी स्पष्ट केले. उपळवे येथील या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.