शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

टिंगल करणाऱ्यांना रणजितसिंहांचे कृतीतून उत्तर

By admin | Updated: October 18, 2015 00:24 IST

पृथ्वीराज चव्हाण : नाव न घेता रामराजेंवर टीका; लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याच्या पहिल्या गळित हंगामाचा शुभारंभ

फलटण : ‘डोंगरात कोठे साखर कारखाना असतो का? अशी टिंगलटवाळी करणाऱ्यांना रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रामराजे यांचे नाव न घेता लगावला. तसेच ‘एफआरपी कायद्याची पुनर्रचना प्राधान्याने करणे गरजेचे आहे,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले. स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उपळवे, ता. फलटण येथे उभारलेल्या लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याच्या प्रथम गळित हंगामाच्या शुभारंभ व सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर होते. विक्रमी जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. भारत भालके, आयडीबीआय बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एस. के. वी. श्रीनिवास, स्रेहल बँकेचे जनरल मॅनेजर नरेंंद्रसिंग, वालचंदनगर इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर जी. के. पिल्ले, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, विठ्ठल शुगरचे अध्यक्ष संजय शिंदे, वसंतराव काळे, कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सुभाषराव बेडके, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, जयकुमार शिंदे, नाईक-निंबाळकर कुटुंबीय उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, रणजितसिंहांनी उपळवेसारख्या दुष्काळी भागात डोंगरावर मोठ्या जिद्दीने रेकॉर्डब्रेक विक्रमी वेळेत साखर कारखाना उभारला आहे. स्वराज दूध प्रकल्पाची ज्या पद्धतीने उभारणी करून त्याचे नाव देशात उंचावले, तसेच नाव साखर कारखान्याचे देशात उंचावून हा कारखाना रणजितसिंह देशात एक नंबरचा करतील,’. सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. साखरेचे दर उतरल्याने कारखानदार एफआरपी पण देऊ शकत नाहीत. मात्र एफआरपीचा कायदा असल्याने यातून कारखानदार अडचणीत येऊ नये व ऊसउत्पादकांनाही न्याय मिळावा, ही भावना मनात ठेवूनच एफआरपी कायद्याची पुनर्रचना व्हावी, अशी अपेक्षा आहे. साखर उद्योगाला वारंवार कर्ज देऊन कारखानदारांवर कर्जाचा बोजा टाकण्यापेक्षा केंद्र सरकारने कर्जाऐवजी अनुदान देऊन कारखान्यांना मदत करावी. शुगर डेव्हलपमेंट फंडात सुधारणा करून हा फंड बँकेत रूपांतर करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यात दुष्काळाचे तीव्र सावट आहे. यावर सरकार काय करणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांनी तातडीने जनतेला दिलासा देणारे निर्णय घ्यावेत. प्रत्यक्ष जागेवर जाऊन सरकारने उपाययोजना करावी. लोकप्रियतेपायी दुष्काळग्रस्तांची चेष्टा करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच रणजितसिंहांनी उभारलेला कारखाना फलटणचा भाग्यविधाता ठरणारा व यातून तालुक्यात परिवर्तनाची नांदी होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. रणजितसिंहांनी दीड वर्षापूर्वी आम्हाला भूमिपूजनला बोलावले होते, व आज उद्घाटनाला बोलावून प्रत्यक्ष साखर कारखाना सुरू केला. हे आठवे आश्चर्य असून, तालुक्यातील ऊसउत्पादकांना वरदान ठरणारा हा कारखाना होणार आहे. असे स्पष्ट करतानाच नवीन तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ठ वापरामुळे या कारखान्याला उज्ज्वल भविष्य असल्याचे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले. ज्यांना दुसऱ्याचे चांगले झालेले बघवत नाही. अशा तालुक्यातील सत्ताधारी राजेगटांनी रणजितसिंहांची कारखाना उभारताना टिंगलटवाळी केली. त्यांना प्रत्यक्ष कारखाना उभारून रणजिसिंहांनी जोरदार लगावली आहे. ज्यांनी तालुक्यातील साखर कारखानदारी, दूध संघ, बँका मोडून खाल्या त्यांनी साखर कारखानदारीवर बोलू नये. माण-खटावला पृथ्वीच्या अस्तापर्यंत पाणी येणार नाही, असे सांगणाऱ्यांनी माण तालुक्यात येऊन पाणी बघावे. वाढत असलेला ऊस बघावा, अशी जोरदार टीका आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजे यांचे नाव न घेता केली. माझ्या वडिलांनी तालुक्याच्या विकासासाठी सतत संघर्ष केलाय. त्यांचा संघर्ष बघूनच येथील जनतेसाठी स्वराज्य निर्माण करण्याचा आपण चंग बांधला आहे. मी दिवसरात्र तालुक्याच्या जनतेच्या चेहऱ्यावर सुख बघण्यासाठी झटले असून, तालुक्यातील ऊसउत्पादकांना उच्चांकी दर देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे. जनतेच्या हितासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवून त्यांना कर्जमुक्त करणार असल्याचे रणजितसिंहांनी यावेळी स्पष्ट केले. उपळवे येथील या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.