शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

टिंगल करणाऱ्यांना रणजितसिंहांचे कृतीतून उत्तर

By admin | Updated: October 18, 2015 00:24 IST

पृथ्वीराज चव्हाण : नाव न घेता रामराजेंवर टीका; लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याच्या पहिल्या गळित हंगामाचा शुभारंभ

फलटण : ‘डोंगरात कोठे साखर कारखाना असतो का? अशी टिंगलटवाळी करणाऱ्यांना रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रामराजे यांचे नाव न घेता लगावला. तसेच ‘एफआरपी कायद्याची पुनर्रचना प्राधान्याने करणे गरजेचे आहे,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले. स्वराज उद्योग समूहाचे प्रमुख रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी उपळवे, ता. फलटण येथे उभारलेल्या लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याच्या प्रथम गळित हंगामाच्या शुभारंभ व सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर होते. विक्रमी जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात यावेळी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आ. आनंदराव पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. भारत भालके, आयडीबीआय बँकेचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर एस. के. वी. श्रीनिवास, स्रेहल बँकेचे जनरल मॅनेजर नरेंंद्रसिंग, वालचंदनगर इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डायरेक्टर जी. के. पिल्ले, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, विठ्ठल शुगरचे अध्यक्ष संजय शिंदे, वसंतराव काळे, कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सुभाषराव बेडके, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, समशेरसिंह नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, जयकुमार शिंदे, नाईक-निंबाळकर कुटुंबीय उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, रणजितसिंहांनी उपळवेसारख्या दुष्काळी भागात डोंगरावर मोठ्या जिद्दीने रेकॉर्डब्रेक विक्रमी वेळेत साखर कारखाना उभारला आहे. स्वराज दूध प्रकल्पाची ज्या पद्धतीने उभारणी करून त्याचे नाव देशात उंचावले, तसेच नाव साखर कारखान्याचे देशात उंचावून हा कारखाना रणजितसिंह देशात एक नंबरचा करतील,’. सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे. साखरेचे दर उतरल्याने कारखानदार एफआरपी पण देऊ शकत नाहीत. मात्र एफआरपीचा कायदा असल्याने यातून कारखानदार अडचणीत येऊ नये व ऊसउत्पादकांनाही न्याय मिळावा, ही भावना मनात ठेवूनच एफआरपी कायद्याची पुनर्रचना व्हावी, अशी अपेक्षा आहे. साखर उद्योगाला वारंवार कर्ज देऊन कारखानदारांवर कर्जाचा बोजा टाकण्यापेक्षा केंद्र सरकारने कर्जाऐवजी अनुदान देऊन कारखान्यांना मदत करावी. शुगर डेव्हलपमेंट फंडात सुधारणा करून हा फंड बँकेत रूपांतर करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. राज्यात दुष्काळाचे तीव्र सावट आहे. यावर सरकार काय करणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यांनी तातडीने जनतेला दिलासा देणारे निर्णय घ्यावेत. प्रत्यक्ष जागेवर जाऊन सरकारने उपाययोजना करावी. लोकप्रियतेपायी दुष्काळग्रस्तांची चेष्टा करू नये, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच रणजितसिंहांनी उभारलेला कारखाना फलटणचा भाग्यविधाता ठरणारा व यातून तालुक्यात परिवर्तनाची नांदी होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. रणजितसिंहांनी दीड वर्षापूर्वी आम्हाला भूमिपूजनला बोलावले होते, व आज उद्घाटनाला बोलावून प्रत्यक्ष साखर कारखाना सुरू केला. हे आठवे आश्चर्य असून, तालुक्यातील ऊसउत्पादकांना वरदान ठरणारा हा कारखाना होणार आहे. असे स्पष्ट करतानाच नवीन तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ठ वापरामुळे या कारखान्याला उज्ज्वल भविष्य असल्याचे गौरवोद्गार हर्षवर्धन पाटील यांनी काढले. ज्यांना दुसऱ्याचे चांगले झालेले बघवत नाही. अशा तालुक्यातील सत्ताधारी राजेगटांनी रणजितसिंहांची कारखाना उभारताना टिंगलटवाळी केली. त्यांना प्रत्यक्ष कारखाना उभारून रणजिसिंहांनी जोरदार लगावली आहे. ज्यांनी तालुक्यातील साखर कारखानदारी, दूध संघ, बँका मोडून खाल्या त्यांनी साखर कारखानदारीवर बोलू नये. माण-खटावला पृथ्वीच्या अस्तापर्यंत पाणी येणार नाही, असे सांगणाऱ्यांनी माण तालुक्यात येऊन पाणी बघावे. वाढत असलेला ऊस बघावा, अशी जोरदार टीका आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजे यांचे नाव न घेता केली. माझ्या वडिलांनी तालुक्याच्या विकासासाठी सतत संघर्ष केलाय. त्यांचा संघर्ष बघूनच येथील जनतेसाठी स्वराज्य निर्माण करण्याचा आपण चंग बांधला आहे. मी दिवसरात्र तालुक्याच्या जनतेच्या चेहऱ्यावर सुख बघण्यासाठी झटले असून, तालुक्यातील ऊसउत्पादकांना उच्चांकी दर देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे. जनतेच्या हितासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवून त्यांना कर्जमुक्त करणार असल्याचे रणजितसिंहांनी यावेळी स्पष्ट केले. उपळवे येथील या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.