शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

कलेच्या पंढरीत रांगोळीचे कण बनले वारकरी!

By admin | Updated: October 25, 2015 22:49 IST

रहिमतपूरमध्ये रंगोली उत्सव : राज्यभरातील ७३ कलाकारांनी साकारल्या सुंदर कलाकृती

रहिमतपूर : श्रीमंत रोकडेश्वर कोजागिरी उत्सव मंडळ व ज्ञानवर्धिनी गु्रपच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत राज्यभरातील ७३ कलाकारांनी सहभाग घेत रांगोळीतून विविध सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकला. रंगावलीकारांनी आपल्या कलाविष्कारातून मल्हार मार्तंड व म्हाळसादेवीचे दर्शन अन् पंढरीची वारीही घडविली. या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ असून सोमवारी (दि.२६) सकाळी साडेदहा वाजता स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही रहिमतपूर येथे राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई, सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, दापोली, नाशिक, पुणे, सातारा, कऱ्हाड तसेच बेळगाव येथून ७३ स्पर्धकांनी सहभाग घेऊन रांगोळीच्या माध्यमातून विविध व्यक्तिरेखा साकारल्या. बालमजुरी, बेटी बचाव अशा सामाजिक प्रश्नांवर आपल्या कलेच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्याबरोबरच अनाथांची माता सिंधुताई सपकाळ, सिनेमाचे पोस्टर, बालपण, प्रतापगड, नृत्य अशा एकापेक्षा एक सुंदर कलाकृती कलाकारांनी साकारल्या आहेत.सोमवारी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिरीष चिटणीस, प्रा. नितीन बानुगडे-पाटील, दीपक पवार, वासुदेव माने यांच्या हस्ते व चित्रलेखा माने-कदम यांच्या अध्यक्षतेखाली पारितोषिक वितरण समारंभ वीरशैव लिंगायत जंगम मठ येथे होणार आहे. सुमारे ९५ हजार रुपयांची साठ बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. (वार्ताहर) प्रदर्शन आजपासून सोमवार, दि. २६ रोजी दुपारी २ ते रात्री २, मंगळवारी सकाळी ८ ते रात्री १० व बुधवारी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. यासाठी ५ रुपये प्रवेशमूल्य आहे. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन काकासाहेब निकम यांनी केले आहे.