शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

मधमाश्यांच्या हल्ल्यामागे खोडसाळपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:22 IST

दिलीप पाडळे । लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : अलीकडच्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत चवताळलेल्या आगे मोहोळच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटना ...

दिलीप पाडळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचगणी : अलीकडच्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत चवताळलेल्या आगे मोहोळच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटना अनेक घडल्या आहेत, याचे प्रमाण खूपच वाढले आहे. शनिवारी पाचगणीच्या टेबललँडवर पर्यटकांवर मधमाश्यांनी पुन्हा हल्ला केला; पण स्थानिकांच्या मते एखादा खोडसाळ पर्यटक दगड मारत असल्यानेच असे हल्ले होत असावेत.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी परिसरात घनदाट झाडी, खोल दरी यामुळे मोठ्या प्रमाणावर मोहोळ बसत असते. मधुमक्षिका पालन हाही येथील एक प्रमुख उद्योग बनला आहे. या परिस्थितीत गेल्या काही दिवसांमध्ये मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटक जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. ही घटना अधिकच तीव्र झाल्याने एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या पर्यटन हंगामावर त्याचा परिणाम होऊ नये. पाचगणी परिसरात टेबललँड, कड्या कपारीत व झाडे झुडपात अनेक ठिकाणी आगे मोहोळची पोळी आहेत. पर्यटक व स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टीने मानवी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने भयमुक्त टेबललँड पॉर्इंट करण्याकरिता वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.काही दिवसांपूर्वी जावळी तालुक्यातील सुलेवाडी येथे शेतात काम करण्यास गेलेल्या शांताराम रांजणे या शेतकऱ्यांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता. यामध्ये या शेतकºयाला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. ही घटना ताजी असतानाच रामवाडी, टोपेवाडी येथे रक्षाविसर्जन, अंत्यसंस्कारावेळी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित लोकांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता.सगळीकडे नवीन पानांफुलांचे प्रमाण जास्त आहे. या फुलांमधून परागकण गोळा करण्यासाठी मधमाश्या एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी प्रवास करीत असतात. सुरक्षित ठिकाण पाहून मधमाश्या मोहोळ तयार करतात. सामान्यपणे मधमाश्यांचे मोहोळ मानवी संपर्क येऊ नये, अशा ठिकाणीच असतात. परंतु एखादेवेळी मनुष्य मोहोळाजवळ आल्यास माश्यांना धोक्याची जाणीव होते. मोहोळास धोका आहे, असा इशारा राणीमाशी आपल्या सैनिकी माश्यांना देत. या माश्या फक्त हालचालींवर लक्ष ठेवून धोका संभावित असल्यास या माश्या आक्रमक होत तुटून पडतात. त्यानंतर कामगार माश्या त्यांच्या मोहोळाजवळ असलेल्या मनुष्यांवर हल्ला करतात, अशी माहिती वन्यजीव संशोधक अभ्यासक दीपक चिकने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सुगंध, तेलाच्या वासांनीही हल्लामधमाश्यांची घ्राणेंद्रिये अत्यंत संवेदनशील असतात. तीव्र स्वरुपाचा सुगंध आल्यास माश्या विचलित होतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुगंध किंवा तेल लावलेली व्यक्ती गेल्यास मधमाश्या अशा व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते.मधमाश्यांची सीमारेषा निश्चितमधमाश्या या संवेदनशील असण्यासोबतच त्यांची विशिष्ट सीमारेषा ठरलेली असते. एका मोहोळावरील मधमाश्या या त्यांनी निश्चित केलेल्या परिघातच राहतात. साधारपणे मधमाश्या या परिघाचे उल्लंघन करीत नाहीत.धूर निघाल्यासमधमाश्यांच्या परिघात धूर झाल्यास त्या दिशेने धोक्याची तीव्रता ओळखून या माश्या अतिक्रमण करतात.काही मध व मधमाश्या खाणारे पक्षी पोळ्यास इजा पोहोचवतात. त्यामुळे आक्रमक झालेल्या मधमाश्या त्यावेळेस त्यांच्या समोर येणाºयावर हल्ला करतात.हल्ला झाला तर वेळीच काळजी घ्यावीआगी मोहोळच्या मधमाश्यांनी हल्ल्यात जखमी झालेल्यांनी प्रथम माशी चावलेल्या ठिकाणची कूस (नांगी) काढावी. ज्या ठिकाणी आग होत आहे, त्याठिकाणी बर्फ लावावा म्हणजे आग शांत होते. जास्तच त्रास होत असल्यास डॉक्टरी उपचार द्यावेत.मधमाशी चावली असता जागेवर कोणतीही हालचाल न करता स्थब्ध उभे राहावे, तसेच मपलेर, टॉवेलनी तोंड झाकून घेणे. अन्यथा त्यांच्या एक किलोमीटरच्या परिक्षेत्रा बाहेर वाºयाच्या विरुद्ध दिशेने पाळावे. म्हणजे माश्या त्यांच्या परिक्षेत्राबाहेर येत नाहीत.