शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

मधमाश्यांच्या हल्ल्यामागे खोडसाळपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 23:22 IST

दिलीप पाडळे । लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : अलीकडच्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत चवताळलेल्या आगे मोहोळच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटना ...

दिलीप पाडळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपाचगणी : अलीकडच्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत चवताळलेल्या आगे मोहोळच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटना अनेक घडल्या आहेत, याचे प्रमाण खूपच वाढले आहे. शनिवारी पाचगणीच्या टेबललँडवर पर्यटकांवर मधमाश्यांनी पुन्हा हल्ला केला; पण स्थानिकांच्या मते एखादा खोडसाळ पर्यटक दगड मारत असल्यानेच असे हल्ले होत असावेत.सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी परिसरात घनदाट झाडी, खोल दरी यामुळे मोठ्या प्रमाणावर मोहोळ बसत असते. मधुमक्षिका पालन हाही येथील एक प्रमुख उद्योग बनला आहे. या परिस्थितीत गेल्या काही दिवसांमध्ये मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटक जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. ही घटना अधिकच तीव्र झाल्याने एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या पर्यटन हंगामावर त्याचा परिणाम होऊ नये. पाचगणी परिसरात टेबललँड, कड्या कपारीत व झाडे झुडपात अनेक ठिकाणी आगे मोहोळची पोळी आहेत. पर्यटक व स्थानिक व्यावसायिकांच्या दृष्टीने मानवी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित प्रशासनाने भयमुक्त टेबललँड पॉर्इंट करण्याकरिता वेळीच पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.काही दिवसांपूर्वी जावळी तालुक्यातील सुलेवाडी येथे शेतात काम करण्यास गेलेल्या शांताराम रांजणे या शेतकऱ्यांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता. यामध्ये या शेतकºयाला आपला नाहक जीव गमवावा लागला आहे. ही घटना ताजी असतानाच रामवाडी, टोपेवाडी येथे रक्षाविसर्जन, अंत्यसंस्कारावेळी या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित लोकांवर मधमाश्यांनी हल्ला केला होता.सगळीकडे नवीन पानांफुलांचे प्रमाण जास्त आहे. या फुलांमधून परागकण गोळा करण्यासाठी मधमाश्या एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी प्रवास करीत असतात. सुरक्षित ठिकाण पाहून मधमाश्या मोहोळ तयार करतात. सामान्यपणे मधमाश्यांचे मोहोळ मानवी संपर्क येऊ नये, अशा ठिकाणीच असतात. परंतु एखादेवेळी मनुष्य मोहोळाजवळ आल्यास माश्यांना धोक्याची जाणीव होते. मोहोळास धोका आहे, असा इशारा राणीमाशी आपल्या सैनिकी माश्यांना देत. या माश्या फक्त हालचालींवर लक्ष ठेवून धोका संभावित असल्यास या माश्या आक्रमक होत तुटून पडतात. त्यानंतर कामगार माश्या त्यांच्या मोहोळाजवळ असलेल्या मनुष्यांवर हल्ला करतात, अशी माहिती वन्यजीव संशोधक अभ्यासक दीपक चिकने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.सुगंध, तेलाच्या वासांनीही हल्लामधमाश्यांची घ्राणेंद्रिये अत्यंत संवेदनशील असतात. तीव्र स्वरुपाचा सुगंध आल्यास माश्या विचलित होतात. मोहोळ असलेल्या ठिकाणी तीव्र सुगंध किंवा तेल लावलेली व्यक्ती गेल्यास मधमाश्या अशा व्यक्तीवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते.मधमाश्यांची सीमारेषा निश्चितमधमाश्या या संवेदनशील असण्यासोबतच त्यांची विशिष्ट सीमारेषा ठरलेली असते. एका मोहोळावरील मधमाश्या या त्यांनी निश्चित केलेल्या परिघातच राहतात. साधारपणे मधमाश्या या परिघाचे उल्लंघन करीत नाहीत.धूर निघाल्यासमधमाश्यांच्या परिघात धूर झाल्यास त्या दिशेने धोक्याची तीव्रता ओळखून या माश्या अतिक्रमण करतात.काही मध व मधमाश्या खाणारे पक्षी पोळ्यास इजा पोहोचवतात. त्यामुळे आक्रमक झालेल्या मधमाश्या त्यावेळेस त्यांच्या समोर येणाºयावर हल्ला करतात.हल्ला झाला तर वेळीच काळजी घ्यावीआगी मोहोळच्या मधमाश्यांनी हल्ल्यात जखमी झालेल्यांनी प्रथम माशी चावलेल्या ठिकाणची कूस (नांगी) काढावी. ज्या ठिकाणी आग होत आहे, त्याठिकाणी बर्फ लावावा म्हणजे आग शांत होते. जास्तच त्रास होत असल्यास डॉक्टरी उपचार द्यावेत.मधमाशी चावली असता जागेवर कोणतीही हालचाल न करता स्थब्ध उभे राहावे, तसेच मपलेर, टॉवेलनी तोंड झाकून घेणे. अन्यथा त्यांच्या एक किलोमीटरच्या परिक्षेत्रा बाहेर वाºयाच्या विरुद्ध दिशेने पाळावे. म्हणजे माश्या त्यांच्या परिक्षेत्राबाहेर येत नाहीत.