शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

प्रेम, एकात्मतेचा संदेश देणारा रमजान ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

ईदचा अर्थ आनंद व फितर म्हणजे दान करणे. हे दान अन्नाच्या स्वरूपात असावे, असा नियम आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम ...

ईदचा अर्थ आनंद व फितर म्हणजे दान करणे. हे दान अन्नाच्या स्वरूपात असावे, असा नियम आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव संपूर्ण

महिनाभर रोजे ठेवतात. ईद जवळ येऊ लागते तसा मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. रमजानच्या पवित्र

महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. सूर्य उगवण्यापूर्वी अन्नाचे ग्रहण करायचे आणि संपूर्ण दिवस सूर्यास्त होईपर्यंत उपवास

पाळायचा. सूर्यास्त झाल्यानंतर उपवास सोडून नमाज (प्रार्थना) करायची, असा हा नियम संपूर्ण महिनाभर पाळायचा. या पवित्र दिवसांमध्ये कुराण शरीफ ग्रंथाचे

वाचन दररोज करायचे. वाचन केल्यानंतर चिंतन, मनन केले जावे असा नियम आहे.

बंधुभावाचा हा सण शत्रूलही जवळ करा असा संदेश प्रवाहित करतो. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह वा मशिदीत नमाज अदा करण्याकरता एकत्र येतात. अल्लाहा प्रती नमाज अदा केली जाते व त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देतात. नवे कपडे परिधान केले जातात. या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ आणि सुकामेव्याची सगळीकडे रेलचेल पहायला मिळते. शेजारी आणि नातेवाइकांकडे मिठाईची ताटे पाठविण्याचा देखील प्रघात आहे.

लहान

मुलं आपल्यापेक्षा मोठ्यांकडे ‘ईदी’ मागतात. मोठी मंडळीही वस्तू, पैसे, मिठाई, कपडे या स्वरूपात ‘ईदी’ देत लहानग्यांना खूश करतात. गरिबांची मुलंही श्रीमंतांकडे ईदी मागतात. या ईदीला भीक समजले जात नाही, तर तो लहानांचा हक्क समजला जातो. त्यांना या दिवशी नाराज केले जात नाही.

ईदच्या

पावन पर्वावर मुस्लिम बांधव मोठया वस्तूंची खरेदी करणे शुभ समजतात.

त्यामुळे नवीन गाडी, नवे घर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी या दिवशी मोठ्या प्रमाणात केली जाते.

ईद का चांद

रमजान महिन्यात तिसावा रोजा झाल्यानंतर चंद्र दिसतो. त्याला ईद का चाँद मानले जाते. इस्लामी कॅलेंडरप्रमाणे ईद वर्षातून दोन वेळेस येते. चंद्र दिसल्यानंतर नवा महिना सुरू होतो. पूर्ण जगात एकाच वेळी ईद साजरी व्हावी म्हणून चंद्र दिसल्यानंतरच रमजान ईद साजरी करण्यात येते. महिलांची तयारी तर फार आधीपासून सुरू झालेली दिसते. एखाद‌्दुसरा रोजा झाल्यानंतर घराघरांतून शेवया तयार केल्या जातात. वाढत्या शहरीकरणामुळे किंवा अतिव्यस्ततेमुळे आता हे चित्र केवळ ग्रामीण भागातूनच दिसते. शहरांमधून या वस्तू आता रेडीमेड मिळत असल्याने येथील स्त्रियांची मेहनत कमी झालेली दिसते. घर सजवले जाते. रंगरंगोटी करून आप्तस्वकीयांना आपल्या घरी शिरखुर्मा खाण्याकरता आमंत्रित केले जाते.

ईदच्या दिवशी तळागाळातील व्यक्तीही सणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना मदत करण्यास सांगितले आहे; कारण जर गरीब व्यक्ती या दिवशी

चांगल्या गोष्टींपासून वंचित राहत असेल तर ही गोष्ट मुस्लिम धर्माकरता योग्य समजली जात नाही. म्हणून गरीब माणसांना ईदपूर्वी जकात दिली जाते ; जेणेकरून ही वंचित मंडळीही वर्षातील एक दिवस आनंदाने साजरा करू शकतील.

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांनी आपल्या जीवनकाळात संपूर्ण मानवजातीला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. सामाजिक न्याय, समता, उदारता,

समरसता यांचे महत्व विशद केले आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य वाहून घेतले. महंमद पैगंबरांची शिकवण एका विशिष्ट जातिधर्मापुरती मर्यादीत नव्हती तर समस्त विश्वाचे कल्याण व्हावे असे त्यांच्या शिकवणीतून प्रदर्शित होते.

सगळ्या जातिधर्मांतील सण-उत्सवांनी आपल्याला विश्वबंधुत्वाचीच शिकवण दिली आहे. ती आपण अंगिकारायला हवी आणि आपण एक आहोत,

आपली संस्कृती आपली मातृभूमी ही एक आहे; त्यामुळे एकमेकांच्या कल्याणार्थ जे जे करता येईल ते आपण करायला हवे. हाच या सर्व सणांचा संदेश आहे.

- नसीर शिकलगार, फलटण