शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

प्रेम, एकात्मतेचा संदेश देणारा रमजान ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:38 IST

ईदचा अर्थ आनंद व फितर म्हणजे दान करणे. हे दान अन्नाच्या स्वरूपात असावे, असा नियम आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम ...

ईदचा अर्थ आनंद व फितर म्हणजे दान करणे. हे दान अन्नाच्या स्वरूपात असावे, असा नियम आहे. रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव संपूर्ण

महिनाभर रोजे ठेवतात. ईद जवळ येऊ लागते तसा मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहताना दिसतो. रमजानच्या पवित्र

महिन्यात चंद्रदर्शन होईपर्यंत रोज उपवास केले जातात. सूर्य उगवण्यापूर्वी अन्नाचे ग्रहण करायचे आणि संपूर्ण दिवस सूर्यास्त होईपर्यंत उपवास

पाळायचा. सूर्यास्त झाल्यानंतर उपवास सोडून नमाज (प्रार्थना) करायची, असा हा नियम संपूर्ण महिनाभर पाळायचा. या पवित्र दिवसांमध्ये कुराण शरीफ ग्रंथाचे

वाचन दररोज करायचे. वाचन केल्यानंतर चिंतन, मनन केले जावे असा नियम आहे.

बंधुभावाचा हा सण शत्रूलही जवळ करा असा संदेश प्रवाहित करतो. या दिवशी मुस्लिम बांधव ईदगाह वा मशिदीत नमाज अदा करण्याकरता एकत्र येतात. अल्लाहा प्रती नमाज अदा केली जाते व त्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छा देतात. नवे कपडे परिधान केले जातात. या दिवशी गोडाधोडाचे पदार्थ आणि सुकामेव्याची सगळीकडे रेलचेल पहायला मिळते. शेजारी आणि नातेवाइकांकडे मिठाईची ताटे पाठविण्याचा देखील प्रघात आहे.

लहान

मुलं आपल्यापेक्षा मोठ्यांकडे ‘ईदी’ मागतात. मोठी मंडळीही वस्तू, पैसे, मिठाई, कपडे या स्वरूपात ‘ईदी’ देत लहानग्यांना खूश करतात. गरिबांची मुलंही श्रीमंतांकडे ईदी मागतात. या ईदीला भीक समजले जात नाही, तर तो लहानांचा हक्क समजला जातो. त्यांना या दिवशी नाराज केले जात नाही.

ईदच्या

पावन पर्वावर मुस्लिम बांधव मोठया वस्तूंची खरेदी करणे शुभ समजतात.

त्यामुळे नवीन गाडी, नवे घर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी या दिवशी मोठ्या प्रमाणात केली जाते.

ईद का चांद

रमजान महिन्यात तिसावा रोजा झाल्यानंतर चंद्र दिसतो. त्याला ईद का चाँद मानले जाते. इस्लामी कॅलेंडरप्रमाणे ईद वर्षातून दोन वेळेस येते. चंद्र दिसल्यानंतर नवा महिना सुरू होतो. पूर्ण जगात एकाच वेळी ईद साजरी व्हावी म्हणून चंद्र दिसल्यानंतरच रमजान ईद साजरी करण्यात येते. महिलांची तयारी तर फार आधीपासून सुरू झालेली दिसते. एखाद‌्दुसरा रोजा झाल्यानंतर घराघरांतून शेवया तयार केल्या जातात. वाढत्या शहरीकरणामुळे किंवा अतिव्यस्ततेमुळे आता हे चित्र केवळ ग्रामीण भागातूनच दिसते. शहरांमधून या वस्तू आता रेडीमेड मिळत असल्याने येथील स्त्रियांची मेहनत कमी झालेली दिसते. घर सजवले जाते. रंगरंगोटी करून आप्तस्वकीयांना आपल्या घरी शिरखुर्मा खाण्याकरता आमंत्रित केले जाते.

ईदच्या दिवशी तळागाळातील व्यक्तीही सणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना मदत करण्यास सांगितले आहे; कारण जर गरीब व्यक्ती या दिवशी

चांगल्या गोष्टींपासून वंचित राहत असेल तर ही गोष्ट मुस्लिम धर्माकरता योग्य समजली जात नाही. म्हणून गरीब माणसांना ईदपूर्वी जकात दिली जाते ; जेणेकरून ही वंचित मंडळीही वर्षातील एक दिवस आनंदाने साजरा करू शकतील.

प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबरांनी आपल्या जीवनकाळात संपूर्ण मानवजातीला विश्वबंधुत्वाची शिकवण दिली. सामाजिक न्याय, समता, उदारता,

समरसता यांचे महत्व विशद केले आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य वाहून घेतले. महंमद पैगंबरांची शिकवण एका विशिष्ट जातिधर्मापुरती मर्यादीत नव्हती तर समस्त विश्वाचे कल्याण व्हावे असे त्यांच्या शिकवणीतून प्रदर्शित होते.

सगळ्या जातिधर्मांतील सण-उत्सवांनी आपल्याला विश्वबंधुत्वाचीच शिकवण दिली आहे. ती आपण अंगिकारायला हवी आणि आपण एक आहोत,

आपली संस्कृती आपली मातृभूमी ही एक आहे; त्यामुळे एकमेकांच्या कल्याणार्थ जे जे करता येईल ते आपण करायला हवे. हाच या सर्व सणांचा संदेश आहे.

- नसीर शिकलगार, फलटण