शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

‘कमळा’वर कोणते औषध फवारायचे हे ठरवावे--राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:33 IST

सातारा/कºहाड : ‘ऊसदराच्या एफआरपीबाबत हे ‘कमळा’चे सरकार शेतकºयांचा विश्वासघात करणार म्हणून आम्ही एक महिना अगोदर सांगितले होते. ते नंतर खरे झाले. आता शेतकºयांची घोर फसवणूक करणाºया भाजपच्या कमळावर कोणते तणनाशक फवारायचे हे शेतकºयांनी ठरवावे,’ असे मत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी व्यक्त केले.‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर येथे ...

ठळक मुद्दे येणाऱ्या निवडणुकीत भाजप विरोधी बाकावर बसेल; हा तर ऐतिहासिक विजय

सातारा/कºहाड : ‘ऊसदराच्या एफआरपीबाबत हे ‘कमळा’चे सरकार शेतकºयांचा विश्वासघात करणार म्हणून आम्ही एक महिना अगोदर सांगितले होते. ते नंतर खरे झाले. आता शेतकºयांची घोर फसवणूक करणाºया भाजपच्या कमळावर कोणते तणनाशक फवारायचे हे शेतकºयांनी ठरवावे,’ असे मत स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी व्यक्त केले.‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर येथे जात असताना जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी कºहाड येथे त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते माध्यमप्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, अनिल घराळ, योगेश झांबरे, प्रदीप पाटील आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शेट्टी म्हणाले, ‘दूधदरवाढ आंदोलनाचे यश हे दूध उत्पादक शेतकरी बांधवांचे आहे. हा ऐतिहासिक विजय म्हणावा लागले. ‘स्वाभिमानी’च्या दूधदरवाढ आंदोलनात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. काही शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतले. या घटनेचा सरकारमधील काही लोक निषेध करताहेत. खरंतर त्यांनी हे समजून घ्यावं की, या सरकारच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झालाय. तो धुऊन काढण्यासाठी शेतकºयांनी रस्त्यावर दूध ओतले आहे. शेतकºयांनी जसे दूध रस्त्यावर ओतलं आहे, तसं त्याचा चांगलाही वापर केला आहे. पंढरपूरकडे जाणाºया वारकºयांना, शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांनाही शेतकºयांनी दूध वाटलं आहे. १ कोटी ३५ लाख लिटर दूध हे शेतकºयांनी चांगल्या कामासाठी वापरलं आहे.’

‘राज्यातील राज्यकर्त्यांनी रस्त्यामध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार केलाय, पैसा खाल्लाय. शेतकºयांनी दुधाचे अभिषेक घालून पवित्र केलं असल्याचं म्हणावं लागेल. इशारा देऊनही सरकारने जे करायचे होते तेच केले. एका बाजूला साडेपंचवीसची एफआरपी २७५० केली. म्हणून स्वत:चीच पाठ स्वत: थोपटून घ्यायची आणि दुसºया बाजूला साडेनऊ टक्के रिकव्हरी फेस दहा टक्के करून टनाला १४५ रुपये शेतकºयांचा तोटा करायचा. कारण आत्ताची जी एफआरपी आहे. ही साडेसत्ताविसशे रुपये दहा टक्के रिकव्हरीला आहे. आणि त्यानंतरच्या रिकव्हरीला २८९ रुपये आहे. एफआरपी वाढली ती फक्त ५५ रुपये. मग अशा प्रकारे हिशोबात घोळ करून असा विश्वासघात करायचा अधिकार सरकारला कोणी दिला आहे? असा प्रश्न विचारत, हे सरकारने जाणीवपूर्वक केले आहे. हे सरकार शेतकºयांच्या विरोधी सरकार आहे. भाजपने अविश्वासाचा ठराव जिंकला तरी ते २०१९ नंतर भाजप विरोधी बाकावर छोट्या मतात बसलेला दिसेल.’शेतकºयांच्या सहभागामुळे आंदोलन यशस्वीसातारा येथील वाढे फाट्यावर खासदार राजू शेट्टी यांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. सातारी कंदी पेढा भरवून त्यांचे कौतुक करण्यात आले. दरम्यान, शेतकºयांनी या आंदोलनात मोठा सहभाग नोंदविला. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुण्यासह उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यांतील दूध उत्पादक शेतकºयांनी नुकसानीचा विचार न करता दूधदर आंदोलनात कायदा हातात घेऊन सहभाग नोंदविल्यानेच सरकारला नमते घेत दुधाचा दर वाढवावा लागला आहे.