शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञानाचे जनक : जगदाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:38 IST

मसूर : ‘भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाचे खरे जनक दिवंगत राजीव गांधी आहेत. भारत बलशाली, स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच भारताला ...

मसूर : ‘भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाचे खरे जनक दिवंगत राजीव गांधी आहेत. भारत बलशाली, स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनविण्याबरोबरच भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी राजीव गांधी यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे यांनी केले.

मसूर येथे दिवंगत राजीव गांधी यांचा स्मृतिदिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

जगदाळे म्हणाले, ‘द्वेषाचे राजकारण देश एकसंध बांधू शकत नाही. त्यासाठी राजकारण विसरून समाजकारण करा, असा विधायक सल्ला देणारे तसेच आधुनिकतेची कास धरून भारताला प्रगतिपथावर चालण्याची प्रेरणा देणारे दिवंगत राजीव गांधी यांच्यामुळे संगणक व दूरसंचार क्षेत्रात भारताचे नाव अग्रस्थानी पोहोचले. शेतकरी, कामगार सबल झाला पाहिजे हे त्यांचे स्वप्न होते. अहिंसेचे पालन हे हिंसेपेक्षा कितीतरी धाडसाचे असते हे त्यांचे म्हणणे होते. स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्तीचा निधी मिळून त्यांचे सबलीकरण व्हावे यासाठी नेहमीच ते प्रयत्नशील होते.’

यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिग्विजयसिंह जगदाळे, सावळाराम कांबळे, माजी उपसरपंच शांताराम मोरे, गणेश मोरे, शकील शेख, काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. सावळाराम कांबळे यांनी प्रास्ताविक केले.