शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

राजे... तुमचं काम निम्मंच बोललं!

By admin | Updated: October 20, 2014 22:35 IST

शिवेंद्रराजेंच्या हातात दगड : शिशे के घर में रहनेवाले अब बाहर आ जाव!

सचिन जवळकोटे- सातारा  ‘शिशे के घर में रहनेवाले कभी दुसरों के घर पे पत्थर नहीं फेका करते,’ हा डायलॉग राजकुमारच्या तोंडून ऐकताना लई भारी वाटायचा राऽऽव. पण हाच संवाद जेव्हा सातारच्या लाडक्या बाबाराजेंनी फेकला, तेव्हा अनेकांच्या हृदयातून म्हणे ‘खळऽऽ खट्याऽऽक’ आव्वाज आला. दगाबाजीचा फटका बसल्यानं संतप्त राजे हातात दगड घेऊन आक्रमक बनलेत अन् हे ‘शिशों के घर’वाले कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या पाठीमागं लपलेत, असंच काही-बाही चित्रविचित्र दृश्य आम्हा पामराच्या डोळ्यांसमोर तरळून गेलं.यंदा सातारा शहरात मतदानच कमी झालं. ‘आपल्या नेत्याला भरभरून मतं द्यावीत,’ अशी भावना खूप कमी ठिकाणी जाणवली. लोकांना बाहेर काढण्यात शहरातली टीमही कमी पडली. पालिकेच्या प्रत्येक कामात ‘टक्का’ शोधणाऱ्या काही ‘मेहरबान’ मंडळींना ‘नजराणा’ न मिळाल्यानं त्यांची गाडी घरासमोरच थांबली. नैवेद्य-प्रसाद मिळणार नाही म्हणून गाभाऱ्यातल्या पुजाऱ्यांनी देवाची पूजाच टाळली. म्हणूनच बघू या आता... बाबांच्या हातातली दगडं खरंच अंगावर पडतात की पुन्हा फुलं बनतात?सातारा-जावळीच्या विकासासाठी शिवेंद्रराजेंनी आजपर्यंत सातत्यानं वेगवेगळे प्रयोग केलेले. भरभरून कामही केलेलं. ‘मी नाही, माझं कामच बोलतं’ अशी मस्त टॅगलाईन घेऊन त्यांचा प्रचार रंगलेला. या वाक्याचे फ्लेक्स मिरवत गाड्याही फिरलेल्या. तरीही त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा निम्मं मताधिक्य यंदा मिळालं. याचा अर्थ, ‘त्यांचं काम कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत निम्मंच पोहोचविलं,’... असो. ज्या शाहूपुरीत त्यांनी आजपावेतो प्रचंड कामं केलेली, तिथलीही मतांची आकडेवारी अत्यंत धक्कादायक. कदाचित, ‘मोदी’ लाटेचाही मोठा प्रभाव असावा. मात्र, तरुण वर्गाला सोबत घेऊन जाण्यासाठी बाबाराजेंना यापुढं अधिक काम करावं लागणार. आजूबाजूची तीच ती जुनी धेंडं थोडीशी बाजूला सारून नव्या ताकदीची दमदार फळी बनवावी लागणार, तरच त्यांच्या हातातल्या दगडांनाही दोन वर्षांनंतरच्या पालिका निवडणुकीत ‘वजन’ प्राप्त होणार!उदयनराजे मनापासून सोबत; पण कार्यकर्ते...शिवेंद्रराजे तसे खूप शांत. संयमी. पण काल ते प्रथमच चिडले. ‘आजपर्यंत माझा हात दगडाखाली होता. आता मी मोकळा झालोय. माझ्याही हातात आता दगड आहे!’ असा सज्जड दम त्यांनी ‘खंजीर’वाल्यांना दिला. झालं. मीडियाला ‘ब्रेकिंग न्यूज’ मिळाली. मात्र, हे ‘खंजीर’वाले काही मीडियाला शेवटपर्यंत सापडलेच नाहीत. कारण, बाबाराजेंनी बोलताना स्पष्टपणे कुणाचंच नाव घेतलं नव्हतं. किती नगरसेविका प्रचारासाठी बाहेर पडल्या, असा सवालही त्यांनी केला नव्हता किंवा ‘सदर बझार’मध्ये ‘रात्रीचा दिवस’ करून ‘निशांत’नं भाजपचा कसा ‘दीपक’ उजळविला, हेही उलगडून सांगितलं नव्हतं. निकालानंतर रस्त्यांवर अभिनंदनाचा फ्लेक्स लावणाऱ्यांपैकी कितीजण मनापासून प्रचारात होते, हेही स्पष्ट होत नव्हतं. खरंतर, गांधी मैदानावरच्या सांगता सभेत उदयनराजेंनी ‘बाबाराजेंना प्रचंड मतांनी विजयी करा,’ असं मनापासून सांगितलं होतं; मात्र काही मेंबरनी म्हणे फक्त ‘विजयी करा,’ एवढाच मेसेज फिरविला. ‘प्रचंड’ शब्दच गायब केला!