शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

सेंद्रिय शेतीसाठी लोकचळवळ उभारा

By admin | Updated: October 9, 2016 00:43 IST

सदाभाऊ खोत : दुष्काळी भागात केलेले काम कौतुकास्पद

दहिवडी : ‘पांढरवाडी, गोडसेवाडी, दिवडी, कोळेवाडी या चारही गावांनी एकत्र येऊन मोठे जलसंधारणाचे काम केले आहे. हे काम लोकचळवळीमुळे साध्य झाले आहे. या एकीचा उपयोग सेंद्रिय शेतीसाठी करा,’ असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. पांढरवाडी, गोडसेवाडी, कोळेवाडी, दिवडी या गावांत जलयुक्तमधून झालेल्या कामाची पाहणी व शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमामध्ये सेवासूर्य आश्रम, जाधववाडी येथे ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, विभागीय कृषी अधिकारी धुमाळ उपस्थित होते. मंत्री खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या कामाचे मोल त्यांना मिळावे, यासाठी शासन प्रयत्न करत आहे. शेतीमाल गटाने पिकवा, सेंद्रिय शेतीचा प्रयोग केल्यास खर्च कमी होणार असून, शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील.’ डॉ. येळगावकर यांनी पांढरवाडीसह चार गावाला कन्हेरचे पाणी कृष्णा नदीतून कॅनॉलने मिळावे, या योजनेत या गावांचा समावेश करावा, अशी मागणी केली. यावेळी गावच्या वतीने जलसंधारणमधून केलेल्या कामाची माहिती देण्यात आली. यानंतर खोत यांनी या कामाची पाहणी केली. ५० एकरांमध्ये उभारलेल्या वनराईची पाहणी केली व लोकचळवळीचे आणि शासकीय विभागाचे कौतुक केले. माण-खटावचे प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)