शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

पावसाच्या रौद्ररूपाने दाणादाण! धूळधाण : वादळी वार्‍यामुळे रहिमतपूर परिसरात झाडे कोसळून रस्ते बंद

By admin | Updated: May 19, 2014 00:13 IST

सातारा : सातारा शहरासह कोरेगाव परिसरात रविवारी रात्री आठ-साडेआठ या वेळेत वादळी वार्‍यासह पाऊस झाला. सातारा शहरात विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहिल्याने निसर्गाचे रौद्ररूप

सातारा : सातारा शहरासह कोरेगाव परिसरात रविवारी रात्री आठ-साडेआठ या वेळेत वादळी वार्‍यासह पाऊस झाला. सातारा शहरात विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहिल्याने निसर्गाचे रौद्ररूप अनेकांनी ‘याची देही, याची डोळा’ पाहिले. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने शहरात पाणी-पाणी केले. रविवारी सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. सकाळी काही काळ पावसाचा शिडकावाही झाला. दिवसभर उकाड्यामुळे सातारकरांची घामाघूम झाली. रात्री आठच्या सुमारास शहरात जोरदार वारे वाहू लागले. या वार्‍यामुळे मोठ-मोठाली झाडेही वाकत होती. आकाशात जोरदार विजा कडकडाटत होत्या. वार्‍यामुळे रस्त्यावरील धूळ सर्वत्र उडू लागली. चक्रीवादळाचा अनुभवच जणू सातारकरांनी यानिमित्ताने घेतला. रात्री आठनंतर वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा भयानक कडकडाट सुरू झाला. तसा पावसाचा जोरही वाढला. सुमारे तासभर हा पाऊस सुरू राहिला. या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी-पाणी झाले. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साठून राहिले होते. डोंगरउतारावरून मुख्य रस्त्यांवर दगड-धोंडे व इतर कचरा वाहून आला. काही ठिकाणी रस्तेही खचले. काही परिसरात तर चिखल साठून राहिला होता. या चिखलातूनच वाहने ये-जा करत होती. जोराच्या पावसामुळे शहरात नाले तुंबल्याने रस्त्यावर पाणी साठले. वादळी वार्‍यामुळे वीज गायब झाली. या पावसात आंब्याचेही मोठे नुकसान झाले. जागोजागी आंबे जमिनीवर पडलेले पाहायला मिळत होते. सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान होते. हे वातावरण वळिवाप्रमाणे नसून चक्क पावसाळा सुरू झाल्याचा भास होत होता. अंदमानबरोबरच पावसाळा सातार्‍यात आला की काय, असेही चेष्टेने बोलले जात होते. दिवसभर ढगांमुळे उकाडा प्रचंड प्रमाणात वाढला होता. परंतु पाऊस पडत नव्हता. सायंकाळच्या वेळी सोसाट्याचा वारा सुटला आणि विजांचा कडकडाट होऊन रात्री पावणेआठच्या सुमारास प्रचंड पावसास सुरुवात झाली. दरम्यान, पावसाळी हवा आणि वीजपुरवठा गायब होणे हे समीकरण रविवारीही कायम राहिले. सायंकाळी सातच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागताच वीजपुरवठा खंडित झाला. जीवन प्राधिकरणाकडून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम अजूनही अनेक ठिकाणी सुरूच आहे. त्यासाठी खणलेले रस्ते अनेक ठिकाणी नुसते मुरूम टाकून मुजविण्यात आले आहेत. पाऊस सुरू होताच या रस्त्यांवर चिखलाचा थर पसरला. त्यावरून वाहने घसरू लागली. तसेच चालतानाही कसरत करावी लागत होती. त्यातच वीजपुरवठा गायब होऊन अंधार झाल्याने सातारकरांचे अतोनात हाल झाले. सायंकाळच्या पावसाने उकाड्याचा त्रास कमी झाला असला, तरी त्याबरोबरीने खराब रस्ते आणि वीजपुरवठ्यातील व्यत्यय यामुळे नागरिकांना या गारव्याचा आनंद लुटता आला नाही. (प्रतिनिधी)