शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाच्या रौद्ररूपाने दाणादाण! धूळधाण : वादळी वार्‍यामुळे रहिमतपूर परिसरात झाडे कोसळून रस्ते बंद

By admin | Updated: May 19, 2014 00:13 IST

सातारा : सातारा शहरासह कोरेगाव परिसरात रविवारी रात्री आठ-साडेआठ या वेळेत वादळी वार्‍यासह पाऊस झाला. सातारा शहरात विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहिल्याने निसर्गाचे रौद्ररूप

सातारा : सातारा शहरासह कोरेगाव परिसरात रविवारी रात्री आठ-साडेआठ या वेळेत वादळी वार्‍यासह पाऊस झाला. सातारा शहरात विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहिल्याने निसर्गाचे रौद्ररूप अनेकांनी ‘याची देही, याची डोळा’ पाहिले. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने शहरात पाणी-पाणी केले. रविवारी सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. सकाळी काही काळ पावसाचा शिडकावाही झाला. दिवसभर उकाड्यामुळे सातारकरांची घामाघूम झाली. रात्री आठच्या सुमारास शहरात जोरदार वारे वाहू लागले. या वार्‍यामुळे मोठ-मोठाली झाडेही वाकत होती. आकाशात जोरदार विजा कडकडाटत होत्या. वार्‍यामुळे रस्त्यावरील धूळ सर्वत्र उडू लागली. चक्रीवादळाचा अनुभवच जणू सातारकरांनी यानिमित्ताने घेतला. रात्री आठनंतर वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा भयानक कडकडाट सुरू झाला. तसा पावसाचा जोरही वाढला. सुमारे तासभर हा पाऊस सुरू राहिला. या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी-पाणी झाले. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साठून राहिले होते. डोंगरउतारावरून मुख्य रस्त्यांवर दगड-धोंडे व इतर कचरा वाहून आला. काही ठिकाणी रस्तेही खचले. काही परिसरात तर चिखल साठून राहिला होता. या चिखलातूनच वाहने ये-जा करत होती. जोराच्या पावसामुळे शहरात नाले तुंबल्याने रस्त्यावर पाणी साठले. वादळी वार्‍यामुळे वीज गायब झाली. या पावसात आंब्याचेही मोठे नुकसान झाले. जागोजागी आंबे जमिनीवर पडलेले पाहायला मिळत होते. सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान होते. हे वातावरण वळिवाप्रमाणे नसून चक्क पावसाळा सुरू झाल्याचा भास होत होता. अंदमानबरोबरच पावसाळा सातार्‍यात आला की काय, असेही चेष्टेने बोलले जात होते. दिवसभर ढगांमुळे उकाडा प्रचंड प्रमाणात वाढला होता. परंतु पाऊस पडत नव्हता. सायंकाळच्या वेळी सोसाट्याचा वारा सुटला आणि विजांचा कडकडाट होऊन रात्री पावणेआठच्या सुमारास प्रचंड पावसास सुरुवात झाली. दरम्यान, पावसाळी हवा आणि वीजपुरवठा गायब होणे हे समीकरण रविवारीही कायम राहिले. सायंकाळी सातच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागताच वीजपुरवठा खंडित झाला. जीवन प्राधिकरणाकडून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम अजूनही अनेक ठिकाणी सुरूच आहे. त्यासाठी खणलेले रस्ते अनेक ठिकाणी नुसते मुरूम टाकून मुजविण्यात आले आहेत. पाऊस सुरू होताच या रस्त्यांवर चिखलाचा थर पसरला. त्यावरून वाहने घसरू लागली. तसेच चालतानाही कसरत करावी लागत होती. त्यातच वीजपुरवठा गायब होऊन अंधार झाल्याने सातारकरांचे अतोनात हाल झाले. सायंकाळच्या पावसाने उकाड्याचा त्रास कमी झाला असला, तरी त्याबरोबरीने खराब रस्ते आणि वीजपुरवठ्यातील व्यत्यय यामुळे नागरिकांना या गारव्याचा आनंद लुटता आला नाही. (प्रतिनिधी)