शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

पावसाच्या रौद्ररूपाने दाणादाण! धूळधाण : वादळी वार्‍यामुळे रहिमतपूर परिसरात झाडे कोसळून रस्ते बंद

By admin | Updated: May 19, 2014 00:13 IST

सातारा : सातारा शहरासह कोरेगाव परिसरात रविवारी रात्री आठ-साडेआठ या वेळेत वादळी वार्‍यासह पाऊस झाला. सातारा शहरात विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहिल्याने निसर्गाचे रौद्ररूप

सातारा : सातारा शहरासह कोरेगाव परिसरात रविवारी रात्री आठ-साडेआठ या वेळेत वादळी वार्‍यासह पाऊस झाला. सातारा शहरात विजांचा कडकडाट व जोरदार वारे वाहिल्याने निसर्गाचे रौद्ररूप अनेकांनी ‘याची देही, याची डोळा’ पाहिले. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने शहरात पाणी-पाणी केले. रविवारी सकाळपासूनच हवेत उकाडा जाणवत होता. सकाळी काही काळ पावसाचा शिडकावाही झाला. दिवसभर उकाड्यामुळे सातारकरांची घामाघूम झाली. रात्री आठच्या सुमारास शहरात जोरदार वारे वाहू लागले. या वार्‍यामुळे मोठ-मोठाली झाडेही वाकत होती. आकाशात जोरदार विजा कडकडाटत होत्या. वार्‍यामुळे रस्त्यावरील धूळ सर्वत्र उडू लागली. चक्रीवादळाचा अनुभवच जणू सातारकरांनी यानिमित्ताने घेतला. रात्री आठनंतर वादळी वार्‍यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा भयानक कडकडाट सुरू झाला. तसा पावसाचा जोरही वाढला. सुमारे तासभर हा पाऊस सुरू राहिला. या पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी-पाणी झाले. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साठून राहिले होते. डोंगरउतारावरून मुख्य रस्त्यांवर दगड-धोंडे व इतर कचरा वाहून आला. काही ठिकाणी रस्तेही खचले. काही परिसरात तर चिखल साठून राहिला होता. या चिखलातूनच वाहने ये-जा करत होती. जोराच्या पावसामुळे शहरात नाले तुंबल्याने रस्त्यावर पाणी साठले. वादळी वार्‍यामुळे वीज गायब झाली. या पावसात आंब्याचेही मोठे नुकसान झाले. जागोजागी आंबे जमिनीवर पडलेले पाहायला मिळत होते. सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान होते. हे वातावरण वळिवाप्रमाणे नसून चक्क पावसाळा सुरू झाल्याचा भास होत होता. अंदमानबरोबरच पावसाळा सातार्‍यात आला की काय, असेही चेष्टेने बोलले जात होते. दिवसभर ढगांमुळे उकाडा प्रचंड प्रमाणात वाढला होता. परंतु पाऊस पडत नव्हता. सायंकाळच्या वेळी सोसाट्याचा वारा सुटला आणि विजांचा कडकडाट होऊन रात्री पावणेआठच्या सुमारास प्रचंड पावसास सुरुवात झाली. दरम्यान, पावसाळी हवा आणि वीजपुरवठा गायब होणे हे समीकरण रविवारीही कायम राहिले. सायंकाळी सातच्या सुमारास सोसाट्याचा वारा वाहू लागताच वीजपुरवठा खंडित झाला. जीवन प्राधिकरणाकडून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम अजूनही अनेक ठिकाणी सुरूच आहे. त्यासाठी खणलेले रस्ते अनेक ठिकाणी नुसते मुरूम टाकून मुजविण्यात आले आहेत. पाऊस सुरू होताच या रस्त्यांवर चिखलाचा थर पसरला. त्यावरून वाहने घसरू लागली. तसेच चालतानाही कसरत करावी लागत होती. त्यातच वीजपुरवठा गायब होऊन अंधार झाल्याने सातारकरांचे अतोनात हाल झाले. सायंकाळच्या पावसाने उकाड्याचा त्रास कमी झाला असला, तरी त्याबरोबरीने खराब रस्ते आणि वीजपुरवठ्यातील व्यत्यय यामुळे नागरिकांना या गारव्याचा आनंद लुटता आला नाही. (प्रतिनिधी)