शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:26 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयनाला ५२, नवजा ९९ आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयनाला ५२, नवजा ९९ आणि महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात ४६ टीएमसीच्या वर पाणीसाठा झाला आहे. धरणात पाण्याची आवकही वाढत चालली आहे.

जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस झाला होता. विशेषकरून पश्चिम भागात धुवाधार पाऊस झाला. यामुळे पश्चिमेकडील प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरुवात झाली होती. तर शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली होती. असे असतानाच पावसाने दडी मारली होती. जवळपास २० दिवसांनंतर पावसाला सुरुवात झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सुरू झाला. पण, या पावसात जोर नव्हता. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा आणि महाबळेश्वरलाही अल्प प्रमाणात पावसाची हजेरी होती. असे असतानाच तीन दिवसांपासून पावसाचा हळूहळू जोर वाढू लागला आहे. यामुळे पश्चिम भागातील धरणसाठ्यात वाढ होत आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५२ मिलिमीटर पाऊस झाला. तर जूनपासून कोयनानगरला ११७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला ९९ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर आतापर्यंत १५२६ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. महाबळेश्वरला ५७ मिलिमीटर तर जूनपासून १६०९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास ४६.०३ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. तर १६८७४ क्युसेक वेगाने पाणी आवक होत होती.

दरम्यान, पूर्व दुष्काळी तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे.

.......................................................