शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

पश्चिम भागात पाऊस वाढू लागला; महाबळेश्वरला ४२ मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवस तुरळक पाऊस होत होता. मात्र, बुधवारपासून जोर वाढू लागला आहे. गुरुवारी ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवस तुरळक पाऊस होत होता. मात्र, बुधवारपासून जोर वाढू लागला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर कोयना धरणात ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार आठवड्यांपूर्वी धो-धो पाऊस कोसळत होता. अवघ्या तीन दिवसांत पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोलीसह इतर भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रस्ते तुटले होते, पूल वाहून गेलेले. त्यामुळे अनेक गावेही संपर्कहीन झालेली. तर या अतिवृष्टीत शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच पश्चिम भागातील पावसामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर विक्रमी पाणीसाठा झाला होता. कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यांसारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. असे असतानाच तीन आठवड्यांपासून पश्चिम भागात तुरळक पाऊस होत होता. यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली होती. परिणामी कोयनावगळता इतर धरणांतील विसर्ग बंद करण्यात आलेला. पण, दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा वाढू लागला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ११ मिलिमीटर पाऊस झाला. नवजा येथे २६ आणि महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जूनपासून कोयनेला ३५१८, नवजा ४५४८ आणि महाबळेश्वर येथे ४७३० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास २१०० क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच होता. धरणात ९२.५९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.

चौकट :

प्रमुख धरणांत ८० टक्क्यांवर पाणीसाठा...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम आणि बलकवडी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांची साठवण क्षमता १४६ टीएमसीवर आहे. सध्या पाऊस कमी असला तरी सर्वच धरणांत ८० टक्क्यांच्या वर पाणीसाठा झालेला आहे. कोयना धरणात तर जवळपास ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. धोम आणि कण्हेर धरणात ८६ टक्के, उरमोडीत ८३ टक्क्यांवर आणि तारळी धरणात जवळपास ९० टक्के पाणीसाठा झालेला आहे.

..............................................................