शहरं
Join us  
Trending Stories
1
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
2
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
3
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
4
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
5
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
6
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
7
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
8
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
9
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
10
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
11
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
12
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
13
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
14
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
15
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
16
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
17
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
18
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
19
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
20
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम भागात पाऊस वाढू लागला; महाबळेश्वरला ४२ मिलिमीटरची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:45 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवस तुरळक पाऊस होत होता. मात्र, बुधवारपासून जोर वाढू लागला आहे. गुरुवारी ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील काही दिवस तुरळक पाऊस होत होता. मात्र, बुधवारपासून जोर वाढू लागला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर कोयना धरणात ९२.५९ टीएमसी पाणीसाठा झाला होता.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार आठवड्यांपूर्वी धो-धो पाऊस कोसळत होता. अवघ्या तीन दिवसांत पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोलीसह इतर भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. रस्ते तुटले होते, पूल वाहून गेलेले. त्यामुळे अनेक गावेही संपर्कहीन झालेली. तर या अतिवृष्टीत शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच पश्चिम भागातील पावसामुळे प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर विक्रमी पाणीसाठा झाला होता. कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यांसारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. असे असतानाच तीन आठवड्यांपासून पश्चिम भागात तुरळक पाऊस होत होता. यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली होती. परिणामी कोयनावगळता इतर धरणांतील विसर्ग बंद करण्यात आलेला. पण, दोन दिवसांपासून पाऊस पुन्हा वाढू लागला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला ११ मिलिमीटर पाऊस झाला. नवजा येथे २६ आणि महाबळेश्वरला सकाळपर्यंत ४२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. जूनपासून कोयनेला ३५१८, नवजा ४५४८ आणि महाबळेश्वर येथे ४७३० मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. कोयना धरणात सकाळच्या सुमारास २१०० क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच होता. धरणात ९२.५९ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता.

चौकट :

प्रमुख धरणांत ८० टक्क्यांवर पाणीसाठा...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना, कण्हेर, तारळी, उरमोडी, धोम आणि बलकवडी ही प्रमुख धरणे आहेत. या धरणांची साठवण क्षमता १४६ टीएमसीवर आहे. सध्या पाऊस कमी असला तरी सर्वच धरणांत ८० टक्क्यांच्या वर पाणीसाठा झालेला आहे. कोयना धरणात तर जवळपास ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. धोम आणि कण्हेर धरणात ८६ टक्के, उरमोडीत ८३ टक्क्यांवर आणि तारळी धरणात जवळपास ९० टक्के पाणीसाठा झालेला आहे.

..............................................................