शहरं
Join us  
Trending Stories
1
पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच भाजपाने तीन ठिकाणी उधळला गुलाल
2
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
3
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
4
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
5
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
6
सावधान! ChatGPT वर तुमची माहिती गुप्तपणे सेव्ह होते; टाळायचे असेल तर या ५ स्टेप्स फॉलो करा
7
अर्ज दाखल करताच अजित पवारांच्या उमेदवाराचा मृत्यू, ३ जणांना रात्री प्रवेश, सकाळी तिकीट; काँग्रेसचे २६ उमेदवार गेले कुठे...?
8
VHT 2025 : महाराष्ट्र संघासाठी 'संकटमोचक' ठरला ऋतुराज! शतकी खेळीसह टीम इंडियातील जागेवरही टाकला रुमाल
9
झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट
10
“राज ठाकरेंच्या जास्त जागा जिंकून याव्यात ही आमची इच्छा, आम्ही बहुमत मिळवू”: संजय राऊत
11
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
12
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
13
Nashik Municipal Corporation Election : आयारामांची चांदी! भाजपचे २२, शिंदेसेनेचे १९; निष्ठावंतांच्या नशिबी सतरंज्या उचलण्याचीच वेळ
14
'ताज'चे नाव आता 'जीव्हीके' हॉटेल्सवरून हटणार; टाटा समुहाने संपूर्ण हिस्सा विकला, कोण आहे खरेदीदार?
15
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
16
जिभेचे चोचले की निसर्गाचा चमत्कार? जगातला असा एकमेव बेट, जिथे चक्क माती खातात लोक!
17
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
18
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
19
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
20
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस जास्त तरीही धरणातील पाणीसाठा मात्र कमी!

By admin | Updated: July 27, 2016 00:31 IST

जोर मंदावला : गेल्या वर्षीच्या बरोबरीसाठी सात टीएमसीची गरज; थेंब-थेंब पाण्याने कोयना धरण लागले भरू

सातारा/पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पाठ फिरवल्याने धरणांतील पाण्यात म्हणावी अशी वाढ होत नाही. त्यामुळे ‘थेंबे-थेंबे कोयना भरे’ अशी अवस्था कोयना धरणाची झाली आहे. धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टीएमसीने पाणी कमी आहे. राज्याच्या सर्वच भागात वेळेपूर्वी आणि पर्जन्यमानाच्या सरासरी १०५ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यामुळे दुष्काळी जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पावसाने लहरीपणा दाखविण्याची संधी यंदाही सोडली नाही. जिल्ह्यात सरासरी ७ जूनपासून पावसाला सुरुवात होते. जिल्ह्याचा पश्चिम भाग असलेल्या महाबळेश्वर, पाटण, नवजा, कोयना येथे विक्रमी पाऊस पडत असतो. यातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वरमध्ये शंभर मिलिमीटर पाऊस चोवीस तासांत पडला तरी विशेष वाटत नाही; पण यंदा चक्क जून महिना कोरडा गेला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. काही दिवसांमध्येच कोयनेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली. पाणी पातळीतवाढ होण्याचे प्रमाणही आश्चर्यकारक होते. चोवीस तासांत दोन टीएमसी, पाच टीएमसीने वाढ होत होती. त्यामुळे महिनाभरात कोयना भरेल, अशी शक्यता होती. शंभर-दीडशे मिलिमीटर पाऊस चोवीस तासांत पडणाऱ्या महाबळेश्वर, कोयना अन् नवजामध्ये गेल्या काही दिवसांपासून दहा मिलिमीटरच्या आतच पाऊस पडत आहे. (प्रतिनिधी) केवळ ५६.५४ टीएमसी पाणी ४कोयना धरण क्षेत्रात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालाच नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत सात टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत धरणात केवळ ५६.५४ टीएमसी होता. तर गतवर्षी याच दिवशी तो ६३.८८ होता. ४मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : कोयना २, नवजा ७, महाबळेश्वर ५. गेले पाणी कुणीकडे? ४गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. तरीही धरणातील पाणी कमी आहे. त्यामुळे एवढ्या पडलेल्या पावसाचे पाणी कुणीकडे गेले हा प्रश्न आहे. धरण क्षेत्रात पडलेला एकूण पाऊस कंसात गेल्यावर्षी पडलेला मिलिमीटरमध्ये असा : कोयना २२९० (१,७५५), नवजा : २,९३१ (१,९१८), महाबळेश्वर २,३०३ (१,९३६) ४जिल्ह्यातील चार धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा झाला आहे. यामध्ये कोयना, कण्हेर, मोरणा-गुरेघर, तारळी यांचा समावेश आहे.