शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

पाऊस तर पळालाच; उन्हानं जळतंय पीक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 21:30 IST

कोरेगाव : घेवडा उत्पादक शेतकऱ्यांची केविलवाणी परिस्थिती

वाठार स्टेशन : रब्बी हंगामाच्या प्रारंभालाच मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या व कोरेगाव तालुक्यात सर्वत्र पेरणी प्रक्रिया गतिमान झाली; परंतु पेरणी नंतर पावसाने दडी मारल्याने आता शेतकरीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. वाढत्या उन्हामुळे शेतातील पिके धोक्यात आली आहेत. एकवेळ काही दिवस पाऊस नाही पडला तरी चालेल; पण ढगाळ वातावरण तरी राहावे अशीच मागणी आता कोरेगाव तालुक्यातील घेवडा उत्पादक शेतकरी करू लागला आहे. कोरेगावच्या घेवड्यास आंतरराष्ट्रीय मानांकनाचा दर्जा प्राप्त झाल्याने यावर्षी घेवडा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून तालुक्यात घेवड्याची ७ हजार ८७३ हेक्टर या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. घेवड्यासाठी पोषक हवामान व व रिमझिम पाऊस असे वातावरण राहिल्यास पीक चांगले मिळते. यामुळे घेवडा हे कोरेगाव तालुक्याचे हुकमी पीक बनले आहे. घेवड्यास एकवेळ कमी पाऊस असला तरी चालतो; पण उन्हाचा तडाखा चालत नसल्याने घेवडा पिकास आता उन्हापासून धोका निर्माण झाला आहे. एका बाजूने कोरेगावचा घेवडा जगाच्या बाजारपेठेत पोहोचला असताना या घेवड्याचा समावेश मात्र अद्याप शासनाच्या पीक विम्यात झाला नाही. त्यामुळे या घेवडा उत्पादक शेतकऱ्यावर हे दुहेरी संकट कोसळले आहे. त्यासाठी शासनाने या पिकाचा समावेश विम्यात करावा ही अनेक दिवसांपासूनची शेतकऱ्यांची मागणी आहे. सद्य:स्थितीत उन्हामुळे घेवड्याचे पीक वाया जाण्याचा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे. खरीप हंगामाच्या प्रारंभी दमदार पाऊस पडलाच नसता तर किमान शेतकऱ्याचा पेरणीसाठी पैसा तरी वाया गेला नसता; पण आता मात्र पावसाची वाट पाहण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नाही. कोरेगाव तालुक्यातील घेवडा संकटात सापडला आहे. पावसाने अगदी अजून महिनाभर दडी मारली तरी शेतातील असलेल्या ओलीवर पीक व्यवस्था जिवंत राहील; परंतु उन्हाच्या तडाख्यातून पिकांचे संरक्षण कोण करणार? हा प्रश्न आहे. (वार्ताहर)कोरेगाव तालुक्याची शान असलेला वाघ्या घेवड्याच्या क्षेत्रात यावर्षी वाढ झाली आहे. भविष्यात या घेवड्यास मोठा लाभ होणार आहे. दिल्लीमध्ये शासनाच्या एका कार्यक्रमात कोरेगावच्या घेवड्यास अंतरराष्ट्रीय जी. आय. मानांकनाचा दर्जा मिळाल्याने एका बाजूने शेतकऱ्यांच्या या पिकाबाबत आशा पल्लवित झाल्या. तर आता सध्याच्या वाढत्या उन्हामुळे घेवड्याचे पीक हाती लागणे अवघड वाटू लागले आहे.- मनोज कदम, शेतकरी देऊरघेवडा वाचविण्यासाठी धडपड...गतवर्षी कोरेगाव तालुक्यात ६ हजार ६७४ हेक्टर क्षेत्रात घेवड्याची पेरणी झाली होती. मात्र, बाजारपेठेतील अस्थिर दरामुळे घेवड्यास योग्य बाजारभाव मिळाला नव्हता. या हंगामात ९६ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, जवळपास ७ हजार ८७३ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. यावर्षी वरुण घेवड्याचे बी ५० ते ६० रुपये तर वाघा घेवड्याचे बी ८० ते १०० रुपयांपर्यंत खरेदी करून या भागातील शेतकऱ्यांनी घेवड्याची पेरणी केली आहे. मात्र आज ज्यांच्याकडे पाणी आहे, असेच शेतकरी घेवडा वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.