शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात पाणी; उन्हाळ्यात ठणठणाट!

By admin | Updated: December 17, 2014 23:04 IST

घोलपवाडी तलाव : गळतीमुळे पाणी जातेय वाया

मसूर : घोलपवाडी, ता. कराड येथे गावच्या पूर्वेस असणाऱ्या व घोलपवाडी, निगडी, हणबरवाडी या आरफळ कॅनॉलच्या पूर्वेच्या गावांना वरदान असणाऱ्या एक नंबर पाझर तलावाच्या व्हॉल्व्हची गळती काढावी; अन्यथा येथे ‘यमाई डॅम’ पद्धतीचा दुसराच पाझर तलाव बांधावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.हा पाझर तलाव हा १९७२ साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी रोजगार हमी योजनेत तयार केला होता. तलावाची मधली भिंत सोडून दोन्ही बाजूने तयार करण्यात आला होता. त्यावेळी त्याला रोलिंग केलेले नाही. तसेच पाणी अडवण्याची मधली भिंत १९९४-१९९५ सालच्या दरम्यान तत्कालीन शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुधीर जोशी यांनी या तलावाची पाहणी करून त्यावेळी हिवाळी अधिवेशनात या तलावाचा तारांकित प्रश्न उपस्थित करून याला मंजुरी मिळविली व त्यावेळेसच मधली भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले. या कामाला पिचिंग व रोलिंग मिळाले असल्याने ते काम मजबूत झाले आहे; परंतु पूर्वी दोन्ही बाजूंला पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या मोठ्या बांधांना रोलिंग झाले नाही. त्यामुळे या पाझर तलावातून व व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. हा तलाव यावर्षीच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरला होता; परंतु आता या तलावात चाळीस टक्केच पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे या गावची परिस्थिती ‘पावसाळ्यात पाणीच पाणी व उन्हाळ्यात ठणठणाट,’ अशीच होत आहे. या तलावात चर काढून व्हॉल्व्हची पाणी गळती काढण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाकडे अनेकवेळा ग्रामस्थांनी मागणी केली. या विभागाचे उपअभियंता भंडारे यांनीही ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाठपुरावा केला; परंतु याला निधी मिळत नसल्यामुळे काम होत नसल्याचे त्यांनीही ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांनी या विभागात पूर्वी होत असलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व अधिकारी यांच्या होत असलेल्या संयुक्त प्रभाग सभांपैकी एक सभा या तलावातच घेऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यालाही यश आले नाही. सुमारे पाचशे लोकवस्ती असलेल्या गावाला पाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)निगडी व घोलपवाडी दरम्यान येथील पाणीप्रश्न संपुष्टात यावा म्हणून शासनाच्या वतीने ओढ्यावर सुमारे १५ ते २० पृथ्वी बंधारे बांधले आहेत; परंतु या एक नंबरच्या पाझर तलावातील पाणी आटून तो कोरडा पडल्यास या बंधाऱ्यातही पाणी राहणार नाही. व सगळीकडेच ठणठणाट होणार आहे. तेव्हा शासनाने या तलावाची पहाणी करून येथे ‘यमाईडॅम’ पद्धतीचा तलाव बांधावा व कायमचा पाणीप्रश्न मिटवावा.- बंडा घोलप, घोलपवाडी, शिवसेना प्रमुख कोपर्डे विभाग1 डॅम बांधण्याची मागणी एखाद्या गावात अशा प्रकारे ‘यमाईडॅम’ पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी शासनाने परवानगी दिली तर त्याठिकाणी जमीन संपादित करण्यापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागते; परंतु या गावात आहे. याच तलावाच्या ठिकाणी नवीन तलाव मंजूर केल्यास गावचा, शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 2 डोंगर कुशीत वसलेल्या या गावाला पाणी मिळावे, म्हणून शासनाने ठोस उपाययोजना करून याठिकाणी यमाई पद्धतीचा डॅम बांधावा, अशी मागणी जोर धरत आहे. 3 नवीन यमाई पद्धतीचा डॅम झाल्यास तो पूर्ण क्षमतेने भरल्यास त्यामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून राहील, त्यामुळे मसूरच्या पूर्वेची घोलपवाडी, निगडी , हणबरवाडी या गावांची सुमारे दोन हजार एकर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येईल.