शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पावसाळ्यात पाणी; उन्हाळ्यात ठणठणाट!

By admin | Updated: December 17, 2014 23:04 IST

घोलपवाडी तलाव : गळतीमुळे पाणी जातेय वाया

मसूर : घोलपवाडी, ता. कराड येथे गावच्या पूर्वेस असणाऱ्या व घोलपवाडी, निगडी, हणबरवाडी या आरफळ कॅनॉलच्या पूर्वेच्या गावांना वरदान असणाऱ्या एक नंबर पाझर तलावाच्या व्हॉल्व्हची गळती काढावी; अन्यथा येथे ‘यमाई डॅम’ पद्धतीचा दुसराच पाझर तलाव बांधावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.हा पाझर तलाव हा १९७२ साली दुष्काळ पडला होता. त्यावेळी रोजगार हमी योजनेत तयार केला होता. तलावाची मधली भिंत सोडून दोन्ही बाजूने तयार करण्यात आला होता. त्यावेळी त्याला रोलिंग केलेले नाही. तसेच पाणी अडवण्याची मधली भिंत १९९४-१९९५ सालच्या दरम्यान तत्कालीन शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुधीर जोशी यांनी या तलावाची पाहणी करून त्यावेळी हिवाळी अधिवेशनात या तलावाचा तारांकित प्रश्न उपस्थित करून याला मंजुरी मिळविली व त्यावेळेसच मधली भिंत बांधण्याचे काम पूर्ण झाले. या कामाला पिचिंग व रोलिंग मिळाले असल्याने ते काम मजबूत झाले आहे; परंतु पूर्वी दोन्ही बाजूंला पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या मोठ्या बांधांना रोलिंग झाले नाही. त्यामुळे या पाझर तलावातून व व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. हा तलाव यावर्षीच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरला होता; परंतु आता या तलावात चाळीस टक्केच पाणीसाठा राहिला आहे. त्यामुळे या गावची परिस्थिती ‘पावसाळ्यात पाणीच पाणी व उन्हाळ्यात ठणठणाट,’ अशीच होत आहे. या तलावात चर काढून व्हॉल्व्हची पाणी गळती काढण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाकडे अनेकवेळा ग्रामस्थांनी मागणी केली. या विभागाचे उपअभियंता भंडारे यांनीही ग्रामस्थांच्या मागणीनुसार पाठपुरावा केला; परंतु याला निधी मिळत नसल्यामुळे काम होत नसल्याचे त्यांनीही ग्रामस्थांना सांगितले. ग्रामस्थांनी या विभागात पूर्वी होत असलेल्या जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व अधिकारी यांच्या होत असलेल्या संयुक्त प्रभाग सभांपैकी एक सभा या तलावातच घेऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यालाही यश आले नाही. सुमारे पाचशे लोकवस्ती असलेल्या गावाला पाण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. (वार्ताहर)निगडी व घोलपवाडी दरम्यान येथील पाणीप्रश्न संपुष्टात यावा म्हणून शासनाच्या वतीने ओढ्यावर सुमारे १५ ते २० पृथ्वी बंधारे बांधले आहेत; परंतु या एक नंबरच्या पाझर तलावातील पाणी आटून तो कोरडा पडल्यास या बंधाऱ्यातही पाणी राहणार नाही. व सगळीकडेच ठणठणाट होणार आहे. तेव्हा शासनाने या तलावाची पहाणी करून येथे ‘यमाईडॅम’ पद्धतीचा तलाव बांधावा व कायमचा पाणीप्रश्न मिटवावा.- बंडा घोलप, घोलपवाडी, शिवसेना प्रमुख कोपर्डे विभाग1 डॅम बांधण्याची मागणी एखाद्या गावात अशा प्रकारे ‘यमाईडॅम’ पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी शासनाने परवानगी दिली तर त्याठिकाणी जमीन संपादित करण्यापासून अनेक अडचणींना सामोरे जावे लागते; परंतु या गावात आहे. याच तलावाच्या ठिकाणी नवीन तलाव मंजूर केल्यास गावचा, शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 2 डोंगर कुशीत वसलेल्या या गावाला पाणी मिळावे, म्हणून शासनाने ठोस उपाययोजना करून याठिकाणी यमाई पद्धतीचा डॅम बांधावा, अशी मागणी जोर धरत आहे. 3 नवीन यमाई पद्धतीचा डॅम झाल्यास तो पूर्ण क्षमतेने भरल्यास त्यामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून राहील, त्यामुळे मसूरच्या पूर्वेची घोलपवाडी, निगडी , हणबरवाडी या गावांची सुमारे दोन हजार एकर जमिनीचे क्षेत्र ओलिताखाली येईल.