शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
3
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
4
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
5
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
6
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
7
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
8
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
9
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
10
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
11
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
13
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
14
प्रेमासाठी काय पण...! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
15
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
16
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
17
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
18
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
19
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
20
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!

पावसानं मारलं; धोम-बलकवडीनं तारल

By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST

खंडाळा तालुका : यावर्षी सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी तरीही अनेक गावांना वरदान, तलावांबरोबर विहिरीही भरल्यां

दशरथ ननावरे-- खंडाळा तालुक्यात दरवर्षीपेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त इतर तालुक्यातून पाण्याची टंचाई भासत आहे. मात्र, खंडाळा तालुक्यात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे अद्याप तरी टंचाई जाणवत नाही. त्यामुळे पावसाने जरी मारलं असलं तरी धोम-बलकवडीने तारलं आहे. खंडाळा तालुक्यासाठी धोम-बलकवडी वरदायिनी ठरत आहे. तालुक्यातील तलाव, विहिरी भरल्या आहेत.खंडाळा हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून गणला जात होता. डिसेंबर उजाडला की गावोगावी विशेषत: पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत जात होता. मात्र, वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरणाचे पाणी कालव्याने खंडाळा तालुक्याच्या माळरानावरून वाहू लागले आणि तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाचे चित्र पालटले. धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे असवली, अजनुज, म्हावशी, वाण्याचीवाडी, खंडाळा, हरळी, धावडवाडी, अहिरे, घाटदरे, बोरी, पाडळी, सुखेड, खेड बु।।, कोपर्डे, निंबोडी या पूर्व भागातील गावांना वरदान ठरले आहे. गावोगावी असणारे तलाव, विहिरी या पाण्यामुळे भरल्या गेल्याने केवळ पिण्याच्याच पाण्याचा नाही तर शेती पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला आहे. कधी काळी या भागात मूग, मटकी खेरीज काहीच पिकले जात नव्हते. तिथे उसासारखी पिकांचे उत्पादन वाढले आहे. तालुक्यातील बहुतांशी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता; मात्र आता कुठेही टँकर द्यावा लागत नाही. धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याचे रोटेशन २१ दिवसांचे असते. त्यामुळे गरजेनुसार पाणी उपलब्ध होते. ठिकठिकाणी तलाव भरल्याने शेती पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. तालुक्याचा दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्यात धोम-बलकवडी प्रकल्पाचे उद्गाते राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार मकरंद पाटील यांचे योगदान आहे. या पाण्यामुळे शेती समृद्ध तर बनलीच आहे. पण, त्याचबरोबर उद्योगधंद्यांनाही याचा उपयोग होत आहे.खंडाळा तालुक्यातील गावोगावचा पाण्याच्या टंचाईचा प्रश्न धोम-बलकवडीमुळे मिटला आहे. योग्य वेळेत धरणाचे पाणी मिळाल्याने शेतीला फायदा झाला आहे. लोकांनी मिळालेल्या पाण्याचा वापर योग्यरीतीने आणि काटकसरीने करायला हवा.- आमदार मकरंद पाटीलधोम-बलकवडीमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली तसेच शेतीला पाणी मिळाले. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पोटपाटाने शिवारात पाणी खेळल्याने शेती पिके जोरात आहेत.-शांतीलाल दशरथे, घाटदरेसाखर कारखान्याला धोमचे वरदान...खंडाळा तालुक्यात सहकारी साखर कारखाना उभा राहत आहे. या कारखान्यासाठी लागणारा ऊस तालुक्यातच उत्पादित होत आहे. ५० ते ७० हजार टनांवरून तालुक्यात उसाचे उत्पादन पाच लाख टनांपर्यंत वाढले आहे. याचा फायदा कारखान्याला होणार आहे. कारखान्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्प वरदान ठरणार आहे.