शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पावसानं मारलं; धोम-बलकवडीनं तारल

By admin | Updated: November 21, 2015 00:24 IST

खंडाळा तालुका : यावर्षी सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी तरीही अनेक गावांना वरदान, तलावांबरोबर विहिरीही भरल्यां

दशरथ ननावरे-- खंडाळा तालुक्यात दरवर्षीपेक्षा सरासरी पाऊस कमी पडला आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त इतर तालुक्यातून पाण्याची टंचाई भासत आहे. मात्र, खंडाळा तालुक्यात धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे अद्याप तरी टंचाई जाणवत नाही. त्यामुळे पावसाने जरी मारलं असलं तरी धोम-बलकवडीने तारलं आहे. खंडाळा तालुक्यासाठी धोम-बलकवडी वरदायिनी ठरत आहे. तालुक्यातील तलाव, विहिरी भरल्या आहेत.खंडाळा हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून गणला जात होता. डिसेंबर उजाडला की गावोगावी विशेषत: पूर्व भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत जात होता. मात्र, वाई तालुक्यातील धोम-बलकवडी धरणाचे पाणी कालव्याने खंडाळा तालुक्याच्या माळरानावरून वाहू लागले आणि तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाचे चित्र पालटले. धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे असवली, अजनुज, म्हावशी, वाण्याचीवाडी, खंडाळा, हरळी, धावडवाडी, अहिरे, घाटदरे, बोरी, पाडळी, सुखेड, खेड बु।।, कोपर्डे, निंबोडी या पूर्व भागातील गावांना वरदान ठरले आहे. गावोगावी असणारे तलाव, विहिरी या पाण्यामुळे भरल्या गेल्याने केवळ पिण्याच्याच पाण्याचा नाही तर शेती पाण्याचाही प्रश्न निकालात निघाला आहे. कधी काळी या भागात मूग, मटकी खेरीज काहीच पिकले जात नव्हते. तिथे उसासारखी पिकांचे उत्पादन वाढले आहे. तालुक्यातील बहुतांशी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता; मात्र आता कुठेही टँकर द्यावा लागत नाही. धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याचे रोटेशन २१ दिवसांचे असते. त्यामुळे गरजेनुसार पाणी उपलब्ध होते. ठिकठिकाणी तलाव भरल्याने शेती पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. तालुक्याचा दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी पुसून टाकण्यात धोम-बलकवडी प्रकल्पाचे उद्गाते राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार मकरंद पाटील यांचे योगदान आहे. या पाण्यामुळे शेती समृद्ध तर बनलीच आहे. पण, त्याचबरोबर उद्योगधंद्यांनाही याचा उपयोग होत आहे.खंडाळा तालुक्यातील गावोगावचा पाण्याच्या टंचाईचा प्रश्न धोम-बलकवडीमुळे मिटला आहे. योग्य वेळेत धरणाचे पाणी मिळाल्याने शेतीला फायदा झाला आहे. लोकांनी मिळालेल्या पाण्याचा वापर योग्यरीतीने आणि काटकसरीने करायला हवा.- आमदार मकरंद पाटीलधोम-बलकवडीमुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली तसेच शेतीला पाणी मिळाले. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पोटपाटाने शिवारात पाणी खेळल्याने शेती पिके जोरात आहेत.-शांतीलाल दशरथे, घाटदरेसाखर कारखान्याला धोमचे वरदान...खंडाळा तालुक्यात सहकारी साखर कारखाना उभा राहत आहे. या कारखान्यासाठी लागणारा ऊस तालुक्यातच उत्पादित होत आहे. ५० ते ७० हजार टनांवरून तालुक्यात उसाचे उत्पादन पाच लाख टनांपर्यंत वाढले आहे. याचा फायदा कारखान्याला होणार आहे. कारखान्यासाठी धोम-बलकवडी प्रकल्प वरदान ठरणार आहे.