शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

पाऊस आला धावून... बळीराजा गेला सुखावून!

By admin | Updated: September 13, 2015 22:18 IST

धरणी आईची माया, कशी जाईल वाया

खटाव : सातारा जिल्हा हा पावसाळी म्हणून ओळखला जातो. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, पाटण, कोयना, बामणोली, नवजा अशी एक नाही अनेक गावांची नावे मुसळधार पावसांच्या यादीत घेतली जातात. या जिल्ह्याच्या पूर्वीचा खटाव मात्र कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच दुष्काळी पट्ट्यावर वरुणराजा चांगलाच खूश झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शनिवारी भरपावसात बळीराजाची पावले शेताकडे वळाली आहेत.खटाव, माण तालुक्यांतील शेतकरी परिस्थितीनं ग्रासला आहे. कितीही नैसर्गिक संकटं आली तरी तो कधीच खचला नाही. पुन्हा जिद्दीनं उभारत परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी उभा राहत असतो. खटाव तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुसळधार पाऊस पडला. यामुळे येरळा नदीला पाणी आले. बळीराजा सुखावला आहे.पाऊस पडतोय, म्हणून घरात बसून राहणं या बळीराजाला परवडणारं नाही. लहरी पावसाने या पूर्वीच खरीप पिके वाया गेली आहेत. त्यातच थोडीफार हाताला लागणारी पिके काढण्याचे कामात शेतकरीवर्ग व्यस्त असताना मुसळधार पावसाने शनिवारी हजेरी लावल्यामुळे या मुसळधार पावसातही बळीराजाने आपली जिद्द न सोडता आपल्या सर्जा-राजाच्या जोडीला गाडीला जुंपून शेतात काढलेले पीक सुरक्षितपणे आणण्याची गडबडीत शेतकरीवर्ग दिसून येत होता. प्लास्टिक कागदाचे अच्छादन देऊन काढलेले पीक सुरक्षित ठेवण्याची देखील गडबड करताना शेतकरी दिसून येत आहे. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर बळीराजासह जिल्ह्यावर आलेले दुष्काळाचे सावट सहज दूर होणार आहे. त्यामुळेच भर पावसात शेतीची कामे करण्यात बळीराजा मग्न आहे. त्याच्या साथ देण्यासाठी सर्जा-राजाही आहेच. (वार्ताहर)धरणी आईची माया, कशी जाईल वायामुसळधार पावसामुळे खटावमधील भर बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. प्रत्येक वाहनस्वार गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधत होता. मिळेल त्या दुकानात जाऊन थांबत होता. पण, याच वेळी रिपरिप पावसाच्या आवाजात खडखडाटाचा सूर मिसळत एक बैलगाडी धावत सुटली होती. पावसात भिजण्याने आजारी पडण्याची भीती नव्हती की लवकर घर जाण्याची त्यांची धडपड नव्हती. ते निघाले होते काळ्या आईची सेवा करण्यासाठी शेताकडे. पावसात भिजण्याचा आनंद बळीराजाप्रमाणेच त्याच्या सर्जा-राजाही झाला होता. कारण बळीराजाच्या ओठावर कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेतील ‘लय दिवसानं, लय नवसानं लागलंय आभाळ गाया... धरणी आईची माया, कशी जाईल वाया,’ या ओळी सहज आल्या होत्या.