शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

पाऊस आला धावून... बळीराजा गेला सुखावून!

By admin | Updated: September 13, 2015 22:18 IST

धरणी आईची माया, कशी जाईल वाया

खटाव : सातारा जिल्हा हा पावसाळी म्हणून ओळखला जातो. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, पाटण, कोयना, बामणोली, नवजा अशी एक नाही अनेक गावांची नावे मुसळधार पावसांच्या यादीत घेतली जातात. या जिल्ह्याच्या पूर्वीचा खटाव मात्र कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच दुष्काळी पट्ट्यावर वरुणराजा चांगलाच खूश झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शनिवारी भरपावसात बळीराजाची पावले शेताकडे वळाली आहेत.खटाव, माण तालुक्यांतील शेतकरी परिस्थितीनं ग्रासला आहे. कितीही नैसर्गिक संकटं आली तरी तो कधीच खचला नाही. पुन्हा जिद्दीनं उभारत परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी उभा राहत असतो. खटाव तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुसळधार पाऊस पडला. यामुळे येरळा नदीला पाणी आले. बळीराजा सुखावला आहे.पाऊस पडतोय, म्हणून घरात बसून राहणं या बळीराजाला परवडणारं नाही. लहरी पावसाने या पूर्वीच खरीप पिके वाया गेली आहेत. त्यातच थोडीफार हाताला लागणारी पिके काढण्याचे कामात शेतकरीवर्ग व्यस्त असताना मुसळधार पावसाने शनिवारी हजेरी लावल्यामुळे या मुसळधार पावसातही बळीराजाने आपली जिद्द न सोडता आपल्या सर्जा-राजाच्या जोडीला गाडीला जुंपून शेतात काढलेले पीक सुरक्षितपणे आणण्याची गडबडीत शेतकरीवर्ग दिसून येत होता. प्लास्टिक कागदाचे अच्छादन देऊन काढलेले पीक सुरक्षित ठेवण्याची देखील गडबड करताना शेतकरी दिसून येत आहे. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर बळीराजासह जिल्ह्यावर आलेले दुष्काळाचे सावट सहज दूर होणार आहे. त्यामुळेच भर पावसात शेतीची कामे करण्यात बळीराजा मग्न आहे. त्याच्या साथ देण्यासाठी सर्जा-राजाही आहेच. (वार्ताहर)धरणी आईची माया, कशी जाईल वायामुसळधार पावसामुळे खटावमधील भर बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. प्रत्येक वाहनस्वार गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधत होता. मिळेल त्या दुकानात जाऊन थांबत होता. पण, याच वेळी रिपरिप पावसाच्या आवाजात खडखडाटाचा सूर मिसळत एक बैलगाडी धावत सुटली होती. पावसात भिजण्याने आजारी पडण्याची भीती नव्हती की लवकर घर जाण्याची त्यांची धडपड नव्हती. ते निघाले होते काळ्या आईची सेवा करण्यासाठी शेताकडे. पावसात भिजण्याचा आनंद बळीराजाप्रमाणेच त्याच्या सर्जा-राजाही झाला होता. कारण बळीराजाच्या ओठावर कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेतील ‘लय दिवसानं, लय नवसानं लागलंय आभाळ गाया... धरणी आईची माया, कशी जाईल वाया,’ या ओळी सहज आल्या होत्या.