शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस आला धावून... बळीराजा गेला सुखावून!

By admin | Updated: September 13, 2015 22:18 IST

धरणी आईची माया, कशी जाईल वाया

खटाव : सातारा जिल्हा हा पावसाळी म्हणून ओळखला जातो. महाबळेश्वर, पाचगणी, वाई, सातारा, पाटण, कोयना, बामणोली, नवजा अशी एक नाही अनेक गावांची नावे मुसळधार पावसांच्या यादीत घेतली जातात. या जिल्ह्याच्या पूर्वीचा खटाव मात्र कायम दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच दुष्काळी पट्ट्यावर वरुणराजा चांगलाच खूश झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शनिवारी भरपावसात बळीराजाची पावले शेताकडे वळाली आहेत.खटाव, माण तालुक्यांतील शेतकरी परिस्थितीनं ग्रासला आहे. कितीही नैसर्गिक संकटं आली तरी तो कधीच खचला नाही. पुन्हा जिद्दीनं उभारत परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी उभा राहत असतो. खटाव तालुक्यात गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुसळधार पाऊस पडला. यामुळे येरळा नदीला पाणी आले. बळीराजा सुखावला आहे.पाऊस पडतोय, म्हणून घरात बसून राहणं या बळीराजाला परवडणारं नाही. लहरी पावसाने या पूर्वीच खरीप पिके वाया गेली आहेत. त्यातच थोडीफार हाताला लागणारी पिके काढण्याचे कामात शेतकरीवर्ग व्यस्त असताना मुसळधार पावसाने शनिवारी हजेरी लावल्यामुळे या मुसळधार पावसातही बळीराजाने आपली जिद्द न सोडता आपल्या सर्जा-राजाच्या जोडीला गाडीला जुंपून शेतात काढलेले पीक सुरक्षितपणे आणण्याची गडबडीत शेतकरीवर्ग दिसून येत होता. प्लास्टिक कागदाचे अच्छादन देऊन काढलेले पीक सुरक्षित ठेवण्याची देखील गडबड करताना शेतकरी दिसून येत आहे. हा पाऊस आणखी काही दिवस असाच राहिला तर बळीराजासह जिल्ह्यावर आलेले दुष्काळाचे सावट सहज दूर होणार आहे. त्यामुळेच भर पावसात शेतीची कामे करण्यात बळीराजा मग्न आहे. त्याच्या साथ देण्यासाठी सर्जा-राजाही आहेच. (वार्ताहर)धरणी आईची माया, कशी जाईल वायामुसळधार पावसामुळे खटावमधील भर बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. प्रत्येक वाहनस्वार गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून पावसापासून बचाव करण्यासाठी आसरा शोधत होता. मिळेल त्या दुकानात जाऊन थांबत होता. पण, याच वेळी रिपरिप पावसाच्या आवाजात खडखडाटाचा सूर मिसळत एक बैलगाडी धावत सुटली होती. पावसात भिजण्याने आजारी पडण्याची भीती नव्हती की लवकर घर जाण्याची त्यांची धडपड नव्हती. ते निघाले होते काळ्या आईची सेवा करण्यासाठी शेताकडे. पावसात भिजण्याचा आनंद बळीराजाप्रमाणेच त्याच्या सर्जा-राजाही झाला होता. कारण बळीराजाच्या ओठावर कवी विठ्ठल वाघ यांच्या कवितेतील ‘लय दिवसानं, लय नवसानं लागलंय आभाळ गाया... धरणी आईची माया, कशी जाईल वाया,’ या ओळी सहज आल्या होत्या.