शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पावसाने दिला सातारकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

सातारा : चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल तीन फुुटांनी वाढ झाली असून, ...

सातारा : चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल तीन फुुटांनी वाढ झाली असून, पाणीसाठा ११ फुटांवर पोहोचला आहे. त्यामुळे सातारकरांना यंदाचा उन्हाळा सुसह्य जाणार असून, पाणीटंचाईच्या संकटातूनही सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराला कासमधून दररोज साडेपाच लाख लीटर पाणी उपलब्ध केले जाते. पाण्याची दैनंदिन गरज पाहता २५ फूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या या तलावाची पाणीपातळी दररोज एक इंचाने कमी होत असते. शिवाय बाष्पीभवन व तलावातून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळेदेखील जलसाठा कमी होत असतो. उन्हाळा सुरू झाल्यापासून पाणीसाठा झपाट्याने खालावू लागला होता. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

शनिवार व रविवारी सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे तलावाचा साठा आठ फुटांवरून आता अकरा फुटांवर पोहचला आहे. त्यामुळे पुढील महिनाभरातील चिंता आता मिटली असून, सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पालिकेकडून प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जातो. यंदाही पाणीकपतीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, वळवाच्या पावसाने तलावात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पाणीकपातीच्या संकटातून सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

(कोट)

कासची पाणीपातळी हळूहळू खालावू लागली होती. त्यामुळे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनीदेखील प्रतिसाद दिला. तलावात समाधानकारक पाणीसाठा झाला असून, प्रशासनाचे सध्या तरी पाणीकपातीचे कोणतेही नियोजन नाही. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

- सीता हादगे, पाणीपुरवठा सभापती