शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पावसाने दिला सातारकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

सातारा : चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल तीन फुुटांनी वाढ झाली असून, ...

सातारा : चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल तीन फुुटांनी वाढ झाली असून, पाणीसाठा ११ फुटांवर पोहोचला आहे. त्यामुळे सातारकरांना यंदाचा उन्हाळा सुसह्य जाणार असून, पाणीटंचाईच्या संकटातूनही सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराला कासमधून दररोज साडेपाच लाख लीटर पाणी उपलब्ध केले जाते. पाण्याची दैनंदिन गरज पाहता २५ फूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या या तलावाची पाणीपातळी दररोज एक इंचाने कमी होत असते. शिवाय बाष्पीभवन व तलावातून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळेदेखील जलसाठा कमी होत असतो. उन्हाळा सुरू झाल्यापासून पाणीसाठा झपाट्याने खालावू लागला होता. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

शनिवार व रविवारी सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे तलावाचा साठा आठ फुटांवरून आता अकरा फुटांवर पोहचला आहे. त्यामुळे पुढील महिनाभरातील चिंता आता मिटली असून, सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पालिकेकडून प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जातो. यंदाही पाणीकपतीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, वळवाच्या पावसाने तलावात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पाणीकपातीच्या संकटातून सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

(कोट)

कासची पाणीपातळी हळूहळू खालावू लागली होती. त्यामुळे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनीदेखील प्रतिसाद दिला. तलावात समाधानकारक पाणीसाठा झाला असून, प्रशासनाचे सध्या तरी पाणीकपातीचे कोणतेही नियोजन नाही. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

- सीता हादगे, पाणीपुरवठा सभापती