शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

पावसाने दिला सातारकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

सातारा : चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल तीन फुुटांनी वाढ झाली असून, ...

सातारा : चक्रीवादळासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीसाठ्यात तब्बल तीन फुुटांनी वाढ झाली असून, पाणीसाठा ११ फुटांवर पोहोचला आहे. त्यामुळे सातारकरांना यंदाचा उन्हाळा सुसह्य जाणार असून, पाणीटंचाईच्या संकटातूनही सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

सातारा शहराला कास व शहापूर योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराला कासमधून दररोज साडेपाच लाख लीटर पाणी उपलब्ध केले जाते. पाण्याची दैनंदिन गरज पाहता २५ फूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या या तलावाची पाणीपातळी दररोज एक इंचाने कमी होत असते. शिवाय बाष्पीभवन व तलावातून वाहून जाणाऱ्या पाण्यामुळेदेखील जलसाठा कमी होत असतो. उन्हाळा सुरू झाल्यापासून पाणीसाठा झपाट्याने खालावू लागला होता. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या वळवाच्या पावसामुळे पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे.

शनिवार व रविवारी सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे तलावाचा साठा आठ फुटांवरून आता अकरा फुटांवर पोहचला आहे. त्यामुळे पुढील महिनाभरातील चिंता आता मिटली असून, सातारकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पालिकेकडून प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवला जातो. यंदाही पाणीकपतीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, वळवाच्या पावसाने तलावात समाधानकारक पाणीसाठा झाल्याने पाणीकपातीच्या संकटातून सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

(कोट)

कासची पाणीपातळी हळूहळू खालावू लागली होती. त्यामुळे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनीदेखील प्रतिसाद दिला. तलावात समाधानकारक पाणीसाठा झाला असून, प्रशासनाचे सध्या तरी पाणीकपातीचे कोणतेही नियोजन नाही. असे असले तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा.

- सीता हादगे, पाणीपुरवठा सभापती