शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पाऊस पेरणीपूर्व मशागतीला पूरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:40 IST

कोपर्डे हवेली : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊस कऱ्हाड तालुक्याच्या उत्तर भागातील पूर्व विभागातील खरीप पेरणीपूर्व मशागतीला ...

कोपर्डे हवेली : गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेला पाऊस कऱ्हाड तालुक्याच्या उत्तर भागातील पूर्व विभागातील खरीप पेरणीपूर्व मशागतीला पूरक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

कऱ्हाड उत्तरमधील पूर्वेकडील विभाग जिरायती म्हणून ओळखला जातो. बागायती क्षेत्राच्या तुलनेत जिरायती क्षेत्र जास्त आहे. या विभागातील शेतकरी शेतात खरीप आणि रब्बी हंगामांत अशी दोन पिके घेतात. खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीला पावसाची गरज असते. त्यासाठी पेरणीपूर्व मशागतीसाठी शेतकरी पावसाची वाट पाहत असतात.

पाऊस पडल्यानंतर फणणी, वेचणी, सरी सोडणे, आदींसह मशागतीची इतर कामे केली जातात. वेळेत मशागती पूर्ण करून वेळेत पेरणी झाली. उत्पादनात वाढ होते; शिवाय दोन्ही हंगामांतील पेरणी आणि काढणी वेळेत होत असते. खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन घेऊन रब्बी हंगामात शाळू पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. सध्या पडलेला पाऊस पेरणीपूर्व मशागतीला पूरक असल्याने जमिनीला घात आल्यांतर पेरणीपूर्व मशागतीला या विभागात सुरुवात होऊन शेतकरी मशागती करून मान्सूनची पेरणीसाठी वाट पाहत बसेल.

चौकट....

सोयाबीन पिकाची पेरणी लवकर झाल्यास त्याची काढणी लवकर होऊन शाळू पिकाची पेरणी होऊ शकते. असे झाल्यास शाळू पिकाला पाण्याची टंचाई जाणवणार नाही. पेरणी उशिरा झाल्यास जिरायती विभागातील शेतकऱ्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो.