शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

पावसाने द्राक्षबागा संकटात

By admin | Updated: October 26, 2014 00:07 IST

फुलोऱ्यातील बागांना फटका : तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यातील चित्र

सांगली : आज, शनिवारी सकाळी आठपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने तासगाव, मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा तालुक्यातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका फुलोऱ्यातील बागांना बसणार आहे. उर्वरित बागांवरही भुरी, करपा, दावण्या या रोगांचे आक्रमण होणार असल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला. रात्री किरकोळ पाऊसही झाला; परंतु आज सकाळपासून मात्र पावसाची रिपरिप सुरू आहे. हे वातावरण सध्या फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागांसाठी अत्यंत धोकादायक आहे. आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तिन्ही महिन्यांत छाटणी घेणारे उत्पादक जिल्ह्यात आहेत. जवळजवळ सर्व क्षेत्रांतील छाटण्या उरकल्या आहेत. आगाप छाटण्या घेतलेल्या क्षेत्रात द्राक्षाचे घडही दिसू लागले आहेत. मात्र सप्टेंबर छाटणीच्या बागांना आज सुरू झालेल्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण याच बागा फुलोऱ्यात आहेत. या बागांच्या द्राक्षमण्यांत पाणी साचून राहिल्यास घडांमध्ये कुज सुरू होण्याची शक्यता आहे. पाऊस दोन दिवस राहिल्यास द्राक्षघड कुजून पूर्ण खराब होऊ शकतात. त्यामुळे सर्व उत्पादकांचे लक्ष हवामानाच्या अंदाजाकडे आहे. संकेतस्थळावरून दाखवण्यात आलेला पाऊस, आर्द्रता याचा अभ्यास करून छाटणीचा काळ, बागेची स्थिती याचा अभ्यास करून उपाययोजनांचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.काही उत्पादकांनी पावसाच्या रिपरिपीतच औषध फवारणी सुरू केली. मात्र, अशा फवारणीचे औषध पावसाच्या पाण्यात वाहून जाऊन त्या औषधाची मात्रा लागू होत नाही. त्यामुळे बहुतांश उत्पादक पाऊस थांबण्याची वाट पहात आहेत. पाऊस थांबल्यानंतर द्राक्षबागेची पाहणी करून औषधाची निवड, मात्रा निश्चित करून सर्वच द्राक्षबागायतदारांना औषध फवारणी करावी लागणार आहे.