शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पावसाने द्राक्षबागा संकटात

By admin | Updated: October 26, 2014 00:07 IST

फुलोऱ्यातील बागांना फटका : तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, पलूस तालुक्यातील चित्र

सांगली : आज, शनिवारी सकाळी आठपासून पावसाची रिपरिप सुरू झाल्याने तासगाव, मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, पलूस, वाळवा तालुक्यातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. पावसाचा सर्वाधिक फटका फुलोऱ्यातील बागांना बसणार आहे. उर्वरित बागांवरही भुरी, करपा, दावण्या या रोगांचे आक्रमण होणार असल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळपासून वातावरणात अचानक बदल झाला. रात्री किरकोळ पाऊसही झाला; परंतु आज सकाळपासून मात्र पावसाची रिपरिप सुरू आहे. हे वातावरण सध्या फुलोऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागांसाठी अत्यंत धोकादायक आहे. आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या तिन्ही महिन्यांत छाटणी घेणारे उत्पादक जिल्ह्यात आहेत. जवळजवळ सर्व क्षेत्रांतील छाटण्या उरकल्या आहेत. आगाप छाटण्या घेतलेल्या क्षेत्रात द्राक्षाचे घडही दिसू लागले आहेत. मात्र सप्टेंबर छाटणीच्या बागांना आज सुरू झालेल्या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण याच बागा फुलोऱ्यात आहेत. या बागांच्या द्राक्षमण्यांत पाणी साचून राहिल्यास घडांमध्ये कुज सुरू होण्याची शक्यता आहे. पाऊस दोन दिवस राहिल्यास द्राक्षघड कुजून पूर्ण खराब होऊ शकतात. त्यामुळे सर्व उत्पादकांचे लक्ष हवामानाच्या अंदाजाकडे आहे. संकेतस्थळावरून दाखवण्यात आलेला पाऊस, आर्द्रता याचा अभ्यास करून छाटणीचा काळ, बागेची स्थिती याचा अभ्यास करून उपाययोजनांचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.काही उत्पादकांनी पावसाच्या रिपरिपीतच औषध फवारणी सुरू केली. मात्र, अशा फवारणीचे औषध पावसाच्या पाण्यात वाहून जाऊन त्या औषधाची मात्रा लागू होत नाही. त्यामुळे बहुतांश उत्पादक पाऊस थांबण्याची वाट पहात आहेत. पाऊस थांबल्यानंतर द्राक्षबागेची पाहणी करून औषधाची निवड, मात्रा निश्चित करून सर्वच द्राक्षबागायतदारांना औषध फवारणी करावी लागणार आहे.