शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरदाराच्या नावाने झालं रहिमतपूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:34 IST

सातारा जिल्ह्याला दीर्घ ऐतिहासिक परंपरा आहे. या परंपरेतील गावे त्यावेळच्या नावावरून आजही ओळखली जातात. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर हे असेच ...

सातारा जिल्ह्याला दीर्घ ऐतिहासिक परंपरा आहे. या परंपरेतील गावे त्यावेळच्या नावावरून आजही ओळखली जातात. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर हे असेच एक गाव. या गावाच्या नावामागील कहाणी मोठी रंजक आहे.

प्रतापगडाच्या रणसंग्रामात अफझलखानासोबत त्याचा वकील कृष्णाजी भास्कर, सय्यद बंडा यांबरोबरच आणखी एक अधिकारी होता रहिमतखान. रहिमतखानाला अफझलखानाच्या मदतीसाठी विजापूरहून वाईला सैन्यासह पाठवले गेले होते. वाटेत रहिमतखानाने कमंडलू नदीकाठावर काळीशार जमीन पाहून छावणी टाकली. याच छावणीचे पुढे छोट्या गावात रूपांतर झाले. आजही हे गाव रहिमतखानाच्या नावाने ‘रहिमतपूर’ म्हणून ओळखले जाते, अशी माहिती मिळते.

रहिमतपूर नावाच्या जनकत्वाबाबत दुसरा मतप्रवाह सांगितला जातो. तो म्हणजे ज्यावेळी साधुनी रणदुल्लाखानास दीक्षा दिली त्यावेळी त्याला अत्यानंद झाला आणि रणदुल्ला खान परमेश्वरास उद्देशून म्हणाला, ‘माझ्यावर फार मोठी दया म्हणजे राहमत केली आहे.’ रणदुल्ला खानाने या ठिकाणाला रहिमतपूर म्हणजेच रहिमतपूर नाव दिल्याचा संदर्भ आर. पी. माने यांच्या ‘रहिमतपूर नगरी’ या लेखात आढळतो.

रहिमतपूर बरीच वर्षे विजापूर सरकारच्या अधिपत्याखाली होते. शिवाजी महाराजांना पक़डण्यासाठी (सप्टेंबर १६५९) अफझलखान रहिमतपूरमार्गे वाईला जाताना त्याचा मुक्काम येथे होता. सन १६६२ मध्ये शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी शायिस्तेखानाने येथे फौजेची एक तुकडी ठेवली होती. दिनांक १० जानेवारी १६९९ रोजी धनाजी जाधव, हैबतराव निंबाळकर व राणोजी घोरपडे यांची व औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान यांची

रहिमतपूरजवळ मोठी लढाई होऊन त्यात झुल्फिकारखानाचा पराभव झाला होता. सन १७११ मध्ये हैबतराव निंबाळकराने सेनापती चंद्रसेन जाधवाचा देऊर येथे पराभव केला. त्यावेळी तो पळून रहिमतपूरला आला होता. सन १७७७ मध्ये महादजी शिंदे कोल्हापूरवर स्वारी करण्यासाठी जाताना त्याचा बरेच दिवस येथे मुक्काम होता, असे दाखले इतिहासात पाहायला मिळतात.

दुसऱ्या बाजीरावाचा पाठलाग करीत इंग्रज सेनापती जनरल स्मिथ ६ फेब्रुवारी, १८१८ रोजी येथे आला होता. शाहू महाराजांची रखेली वीरूबाई रहिमतपूरमधील कासुर्डे घराण्यातील होती. पेशव्यांच्या कारकिर्दीत त्यांची एक टांकसाळ रहिमतपूरला होती. येथे मोहरा, रुपये, चांदीची नाणी व पैसे पाडीत. रहिमतपूर गावाचे असेही काही ऐतिहासिक संदर्भ सापडतात.