शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

जिल्ह्यात रब्बीची दोन लाख हेक्टरवर पेरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र वाढले असून आतापर्यंत १ लाख ९७ हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. ...

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र वाढले असून आतापर्यंत १ लाख ९७ हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. ऐकूण क्षेत्राच्या ९० टक्के पेर पूर्णत्वाकडे गेली आहे, तर गहू ३१ आणि हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र २६ हजार हेक्टरवर गेले आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १५ हजार हेक्टर होते. यंदा मात्र, क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार २ लाख १९ हजार ११९ हेक्टर क्षेत्र रब्बीचे आहे. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर गहू क्षेत्र ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात करडई, सूर्यफूल, तीळ, जवस पिकाचेही अत्यल्प क्षेत्र आहे.

जिल्ह्यात यावर्षी पेरणीला वेळेत सुरूवात झाली. पण, दोनवेळा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला होता. असे असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९७ हजार २१ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ८९.९२ आहे, तर जिल्ह्यात रब्बीत सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे सर्वसाधारणपणे १ लाख ३९ हजार २०० हेक्टर आहे. १ लाख २६ हजार ८३६ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ९१.१२ आहे, तर जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यातही ज्वारीचे क्षेत्र आहे.

जिल्ह्यात गव्हाची आतापर्यंत ३१ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ९०.६१ टक्क्यांवर ही पेरणी आहे, तर मक्याची १० हजार ६३५ आणि हरभऱ्याची २६ हजार ८६४ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. मक्याची ८७ आणि हरभऱ्याची पेरणी ८८ टक्क्यांवर झालेली आहे.

माणमध्ये १०१ टक्के क्षेत्रावर पेरणी...

जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस होता, तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी झाला. त्यामुळे पेरण्यांना उशीर झालेला. तसेच रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्रही कमी होते. यंदा मात्र, वाढ झालेली आहे. माणमध्ये यंदा रब्बीच्या सर्वसाधारण क्षेत्रात ११ हजार तर फलटण तालुक्यात १२ हजार हेक्टरने वाढ झाली. तसेच खटाव तालुक्यातही ८ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र वाढलेले आहे. माणमध्ये यंदा १०१ टक्के, खटाव ८९.६५ आणि फलटण तालुक्यात ८१ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली आहे.

.....................................................