शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रब्बीची दोन लाख हेक्टरवर पेरणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:32 IST

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र वाढले असून आतापर्यंत १ लाख ९७ हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. ...

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र वाढले असून आतापर्यंत १ लाख ९७ हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. ऐकूण क्षेत्राच्या ९० टक्के पेर पूर्णत्वाकडे गेली आहे, तर गहू ३१ आणि हरभऱ्याचे पेरणी क्षेत्र २६ हजार हेक्टरवर गेले आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १५ हजार हेक्टर होते. यंदा मात्र, क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार २ लाख १९ हजार ११९ हेक्टर क्षेत्र रब्बीचे आहे. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक १ लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर गहू क्षेत्र ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात करडई, सूर्यफूल, तीळ, जवस पिकाचेही अत्यल्प क्षेत्र आहे.

जिल्ह्यात यावर्षी पेरणीला वेळेत सुरूवात झाली. पण, दोनवेळा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला होता. असे असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९७ हजार २१ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ८९.९२ आहे, तर जिल्ह्यात रब्बीत सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे सर्वसाधारणपणे १ लाख ३९ हजार २०० हेक्टर आहे. १ लाख २६ हजार ८३६ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ९१.१२ आहे, तर जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यातही ज्वारीचे क्षेत्र आहे.

जिल्ह्यात गव्हाची आतापर्यंत ३१ हजार ६९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ९०.६१ टक्क्यांवर ही पेरणी आहे, तर मक्याची १० हजार ६३५ आणि हरभऱ्याची २६ हजार ८६४ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. मक्याची ८७ आणि हरभऱ्याची पेरणी ८८ टक्क्यांवर झालेली आहे.

माणमध्ये १०१ टक्के क्षेत्रावर पेरणी...

जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस होता, तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी झाला. त्यामुळे पेरण्यांना उशीर झालेला. तसेच रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्रही कमी होते. यंदा मात्र, वाढ झालेली आहे. माणमध्ये यंदा रब्बीच्या सर्वसाधारण क्षेत्रात ११ हजार तर फलटण तालुक्यात १२ हजार हेक्टरने वाढ झाली. तसेच खटाव तालुक्यातही ८ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र वाढलेले आहे. माणमध्ये यंदा १०१ टक्के, खटाव ८९.६५ आणि फलटण तालुक्यात ८१ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली आहे.

.....................................................