शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीची दोन लाख हेक्टरवर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र वाढले असून, आतापर्यंत दोन लाख एक हजार हेक्टर पेरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र वाढले असून, आतापर्यंत दोन लाख एक हजार हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. एकूण क्षेत्राच्या जवळपास ९२ टक्के पेर पूर्णत्वाकडे गेली आहे. त्याचबरोबर यावर्षी गहू आणि हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ झालेली आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र दोन लाख १५ हजार हेक्टर होते. यंदा मात्र, क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार दोन लाख १९ हजार ११९ हेक्टर क्षेत्र रब्बीचे आहे. यामध्ये ज्वारीचे सर्वाधिक एक लाख ३९ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. यानंतर गहू क्षेत्र ३४ हजार ९७३, मका १२ हजार १७७ तर हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३० हजार ४८९ हेक्टर आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात करडई, सूर्यफूल, तीळ, जवस पीकही काही प्रमाणात घेण्यात येते.

जिल्ह्यात गेल्यावर्षी पेरणीला वेळेत सुरुवात झाली. पण, दोनवेळा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पेरणीला ब्रेक लागला होता. असे असलेतरी नंतर पेरणीने वेग घेतला. जिल्ह्यातील ज्वारीची पेरणी नोव्हेंबरपूर्वीच पूर्ण झाली. त्यानंतर गहू आणि हरभऱ्याची पेरणी करण्यात आली. राने उपलब्ध होतील तसतशी पेरणी वाढली. सद्य:स्थितीत जिल्ह्यात दोन लाख एक हजार १०३ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ९१.७८ आहे, तर जिल्ह्यात रब्बीत सर्वाधिक क्षेत्र ज्वारीचे सर्वसाधारणपणे एक लाख ३९ हजार २०० हेक्टर आहे. एक लाख २७ हजार ३५७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. टक्केवारीत हे प्रमाण ९१.४९ आहे, तर जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक सर्वसाधारण क्षेत्र माण तालुक्यात ३२ हजार ५४५ हेक्टर असून, त्यानंतर फलटणला २१ हजार ५६४ आणि खटावला २० हजार ८५५ हेक्टर आहे. तसेच कोरेगाव, खंडाळा, वाई, कऱ्हाड, सातारा, जावळी या तालुक्यातही ज्वारीचे क्षेत्र आहे.

जिल्ह्यात गव्हाची आतापर्यंत ३३ हजार ४८१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ९५.७३ टक्क्यांवर ही पेरणी आहे तर मक्क्याची ११ हजार ७१७ आणि हरभऱ्याची २७ हजार ४७७ हेक्टरवर पेरणी झालेली आहे. मक्क्याची ९६ आणि हरभऱ्याची पेरणी ९० टक्क्यांवर झालेली आहे.

चौकट :

माणमधील पेरणी पूर्ण...

जिल्ह्यात गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस होता, तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी झाला. त्यामुळे पेरण्यांना उशीर झाला. तसेच रब्बी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्रही कमी होते. यंदा मात्र, वाढ झालेली आहे. माणमध्ये आतापर्यंत १०१ टक्के, खटाव ८९.६५ आणि फलटण तालुक्यात ८७ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली आहे.

...