शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी ज्वारीच्या पीक स्पर्धेत जावळीचा राज्यात डंका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : जावळीचा भाग हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पर्जन्यमानानुसार वेगवेगळी पिके ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कुडाळ : जावळीचा भाग हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पर्जन्यमानानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. आज भागातील शेतकरी हा आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. अधिकचे उत्पादनवाढीसाठी यामुळे प्रयत्न होत आहेत. याची प्रचिती रब्बीच्या हंगामात पाहायला मिळाली. सन २०२०-२१ रब्बी ज्वारीच्या पीक स्पर्धेत तालुक्यातील सोनगावच्या साहेबराव मन्याबा चिकणे यांनी आपल्या शेतात ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवत जावळीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कृषिदिनी यांचा मुंबई या ठिकाणी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहेबराब चिकणे यांच्या वतीने त्यांचा मुलगा संदीप चिकणे यांनी हा सन्मान स्वीकारला. चिकणे यांनी सोनगाव या ठिकाणच्या आपल्या शेतीमध्ये फुले रेवती या ज्वारीच्या वाणाचा वापर केला. याकरिता प्रतिएकरी चार किलो बियाण्यांवर रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करून शेतात पेरणी केली. पेरणीकरिता पाच बैलगाड्या शेणखत, १०० किलो निंबोळी पेंड या जैविक खताबरोबरच, १०:२६:२६ १५० किलो, सिलिकॉन, मॅग्नेशियम सल्फेट प्रत्येकी पाच किलो, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट प्रत्येकी आठ किलो आदी खतांचा पेरणीवेळी योग्य वापर करण्यात आला.

पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० किलो युरिया डोस देऊन पाणी देण्यात आले. पिकांच्या योग्य वाढीसाठी तण, कीड व रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना केल्या. वेळोवेळी फवारणी केली गेली. याचबरोबर पेरणीनंतर २१ दिवसांनी विरळणी करून दाट झालेली रोपे उपटून काढण्यात आली. पिकाला पाणी देताना प्रत्येक वेळी जीवांमृताचाही वापर करण्यात आला. विद्राव्य खतांची २१,३०,४० आणि ६० दिवसांनी फवारणी केली. अगदी सुरुवातीपासून पाण्याचा सुयोग्य पद्धतीने वापर करण्यात आला. शेती शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले. याचाच परिपाक म्हणून एका एकरामधून ४०.४ इतके विक्रमी उत्पादन मिळाल्याचे साहेबराव चिकणे यांनी सांगितले. याकरिता कृषी विभागाचे सुरुवातीपासून मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

(कोट)

रब्बी हंगाम सन २०२०-२१ च्या ज्वारीच्या पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले. सुरुवातीपासून याकरिता तालुका कृषी अधिकारी देशमुख, कृषी सहायक भानुदास चोरगे यांच्याकडून मार्गदर्शक होत राहिले. बीजप्रक्रिया करण्यापासून ते कापणीपर्यंत योग्य नियोजन आणि वेळेत आवश्यक बाबी पिकासाठी दिल्या गेल्या. यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले.

-साहेबराव चिकणे, प्रगतशील शेतकरी

कोट: रब्बी ज्वारीकरिता चिकणे यांच्या शेतात बीजप्रक्रियेपासून सूक्ष्म नियोजन करण्यात आले. अगदी छोट्या छोट्या घटकांचाही बारकाईने समावेश करण्यात आला. पाण्याचा सुयोग्य व संरक्षित वापर करून खतांचा डोस, तसेच जैविक फवारणी याचे नियोजन केले. ज्वारीचा उत्पादनाचा तालुका नसतानाही सुरुवातीपासूनच पिकाच्या गरजेनुसार पाणी व इतर घटकांचा पुरवठा झाल्याने जावळीसारख्या दुर्गम भागातील रब्बीच्या ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेण्यात शेतकऱ्याला यश मिळाले.

-रमेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी जावळी

जावळी

फोटो: कृषिदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते साहेबराव चिकणे यांच्या वतीने त्यांचा मुलगा संदीप चिकणे यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला.