शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

रब्बी ज्वारीच्या पीक स्पर्धेत जावळीचा राज्यात डंका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुडाळ : जावळीचा भाग हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पर्जन्यमानानुसार वेगवेगळी पिके ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कुडाळ : जावळीचा भाग हा डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे. तालुक्याच्या पश्चिम आणि पूर्व भागात पर्जन्यमानानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. आज भागातील शेतकरी हा आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. अधिकचे उत्पादनवाढीसाठी यामुळे प्रयत्न होत आहेत. याची प्रचिती रब्बीच्या हंगामात पाहायला मिळाली. सन २०२०-२१ रब्बी ज्वारीच्या पीक स्पर्धेत तालुक्यातील सोनगावच्या साहेबराव मन्याबा चिकणे यांनी आपल्या शेतात ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यात प्रथम क्रमांक मिळवत जावळीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कृषिदिनी यांचा मुंबई या ठिकाणी त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहेबराब चिकणे यांच्या वतीने त्यांचा मुलगा संदीप चिकणे यांनी हा सन्मान स्वीकारला. चिकणे यांनी सोनगाव या ठिकाणच्या आपल्या शेतीमध्ये फुले रेवती या ज्वारीच्या वाणाचा वापर केला. याकरिता प्रतिएकरी चार किलो बियाण्यांवर रासायनिक व जैविक बीजप्रक्रिया करून शेतात पेरणी केली. पेरणीकरिता पाच बैलगाड्या शेणखत, १०० किलो निंबोळी पेंड या जैविक खताबरोबरच, १०:२६:२६ १५० किलो, सिलिकॉन, मॅग्नेशियम सल्फेट प्रत्येकी पाच किलो, फेरस सल्फेट, झिंक सल्फेट प्रत्येकी आठ किलो आदी खतांचा पेरणीवेळी योग्य वापर करण्यात आला.

पेरणीनंतर ३० दिवसांनी ५० किलो युरिया डोस देऊन पाणी देण्यात आले. पिकांच्या योग्य वाढीसाठी तण, कीड व रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना केल्या. वेळोवेळी फवारणी केली गेली. याचबरोबर पेरणीनंतर २१ दिवसांनी विरळणी करून दाट झालेली रोपे उपटून काढण्यात आली. पिकाला पाणी देताना प्रत्येक वेळी जीवांमृताचाही वापर करण्यात आला. विद्राव्य खतांची २१,३०,४० आणि ६० दिवसांनी फवारणी केली. अगदी सुरुवातीपासून पाण्याचा सुयोग्य पद्धतीने वापर करण्यात आला. शेती शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देऊन मार्गदर्शन केले. याचाच परिपाक म्हणून एका एकरामधून ४०.४ इतके विक्रमी उत्पादन मिळाल्याचे साहेबराव चिकणे यांनी सांगितले. याकरिता कृषी विभागाचे सुरुवातीपासून मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

(कोट)

रब्बी हंगाम सन २०२०-२१ च्या ज्वारीच्या पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे ठरवले. सुरुवातीपासून याकरिता तालुका कृषी अधिकारी देशमुख, कृषी सहायक भानुदास चोरगे यांच्याकडून मार्गदर्शक होत राहिले. बीजप्रक्रिया करण्यापासून ते कापणीपर्यंत योग्य नियोजन आणि वेळेत आवश्यक बाबी पिकासाठी दिल्या गेल्या. यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले.

-साहेबराव चिकणे, प्रगतशील शेतकरी

कोट: रब्बी ज्वारीकरिता चिकणे यांच्या शेतात बीजप्रक्रियेपासून सूक्ष्म नियोजन करण्यात आले. अगदी छोट्या छोट्या घटकांचाही बारकाईने समावेश करण्यात आला. पाण्याचा सुयोग्य व संरक्षित वापर करून खतांचा डोस, तसेच जैविक फवारणी याचे नियोजन केले. ज्वारीचा उत्पादनाचा तालुका नसतानाही सुरुवातीपासूनच पिकाच्या गरजेनुसार पाणी व इतर घटकांचा पुरवठा झाल्याने जावळीसारख्या दुर्गम भागातील रब्बीच्या ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेण्यात शेतकऱ्याला यश मिळाले.

-रमेश देशमुख, तालुका कृषी अधिकारी जावळी

जावळी

फोटो: कृषिदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते साहेबराव चिकणे यांच्या वतीने त्यांचा मुलगा संदीप चिकणे यांनी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारला.