शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

यक्षप्रश्न... रेनकोट घ्यावा की स्वेटर?

By admin | Updated: October 27, 2014 23:43 IST

दुपारी पाऊस-रात्री थंडी : वादळी पावसाचा धोका टळला; वातावरण निवळल्यानंतर वाढणार थंडी

सातारा : गेल्या चार दिवसांपासून वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, मधूनच पावसाची भुरभूर आणि हवेत कमालीचा वाढलेला गारठा हा बदल अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे झाल्याचे सातारा हवामान विभागाकडून सांगण्यात आले. अशा संमिश्र वातावरणामुळे स्वेटर घ्यावा की रेनकोट, अशी नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले. परिणामस्वरूप आपल्याकडे वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र, अरबी समुद्रातील वादळ गुजरातकडे सरकल्यामुळे मोठा धोका टळला आहे. मात्र, अशा स्थितीमुळेच आपल्याकडे अचानक वातावरणात बदल झाला आहे. गेल्या चार दिवसात तापमान १८ ते १५ अंश सेल्सियसपर्यंत आले होते. त्यामुळे आॅक्टोबर हिटने घामेघूम होत असतानाच अचानक निर्माण झालेल्या थंडीच्या लाटेमुळे नागरिकांनी उबदार कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. थंडी, ताप, खोकला अशा आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. आज सोमवार, दि. २७ आॅक्टोबर २०१४ रोजी तापमान २४.६ ते १८.५ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. गेल्यावर्षी याच दिवशी कमाल ३३ तर किमान २२ अंश सेल्सियस तापमान होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी कमाल ९ तर किमान ४ अंश सेल्सियसने तापमान कमी झाले आहे. दि. २६ रोजी कमाल २०.८ तर किमान १५.९ तापमान होते. अजून दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गारठा कमीच...गेल्या चार दिवसात वातावरणात बदल झाला असला तरी सोमवारचे किमान तापमान हे १८.५ अंश सेल्सियस होते. हे तापमान नेहमीसारखेच आहे. मात्र, पाऊस पडत असल्यामुळे गारठा जास्त जाणवत असल्याचे तिखे यांनी सांगितले.अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. आपल्याकडे वादळी पावसाचा धोका असल्याचे हवामान खात्याने सूचना दिल्या होत्या. मात्र, हे वादळ गुजरातकडे सरकल्यामुळे तो धोका टळला आहे. मात्र, अजून दोन दिवस तरी ढगाळ वातावरण राहणार असून त्यानंतर थंडी वाढणार आहे.- व्ही. आर. तिखे,तापमान कर्मचारी,सातारानागरिकांमध्ये संभ्रमावस्था...गेल्या चार दिवसांत वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. ढगाळ वातावरणाबरोबरच बोचऱ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ढग दाटून अंधारून येत असल्यामुळे मोठा पाऊस पडतो की काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्यांना आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना अंगात स्वेटर घालावा की रेनकोट, असा प्रश्न पडत आहे.भुरभुर पाऊस पिकांसाठी घातकनागरिक आॅक्टोबर हिटने हैराण असतानाच अचानक आलेल्या थंडीच्या लाटेमुळे उबदार कपडे परिधान करून वावरताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणाबरोबरच दिवसा आणि रात्रीही बोचरी थंडी पडत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही याचा प्रतिकूल परिणाम झालेला जाणवत आहे. पावसाची भुरभूर ही पिकांसाठी रोगट वातावरण निर्माण करणारी असल्यामुळे शेतकरीही धास्तावले आहेत.