शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
4
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
5
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
6
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
7
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
8
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
9
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
10
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
11
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
12
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
13
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
14
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
15
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
16
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
17
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
18
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
19
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
20
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 

यक्षप्रश्न... रेनकोट घ्यावा की स्वेटर?

By admin | Updated: October 27, 2014 23:43 IST

दुपारी पाऊस-रात्री थंडी : वादळी पावसाचा धोका टळला; वातावरण निवळल्यानंतर वाढणार थंडी

सातारा : गेल्या चार दिवसांपासून वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, मधूनच पावसाची भुरभूर आणि हवेत कमालीचा वाढलेला गारठा हा बदल अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे झाल्याचे सातारा हवामान विभागाकडून सांगण्यात आले. अशा संमिश्र वातावरणामुळे स्वेटर घ्यावा की रेनकोट, अशी नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले. परिणामस्वरूप आपल्याकडे वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र, अरबी समुद्रातील वादळ गुजरातकडे सरकल्यामुळे मोठा धोका टळला आहे. मात्र, अशा स्थितीमुळेच आपल्याकडे अचानक वातावरणात बदल झाला आहे. गेल्या चार दिवसात तापमान १८ ते १५ अंश सेल्सियसपर्यंत आले होते. त्यामुळे आॅक्टोबर हिटने घामेघूम होत असतानाच अचानक निर्माण झालेल्या थंडीच्या लाटेमुळे नागरिकांनी उबदार कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. थंडी, ताप, खोकला अशा आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. आज सोमवार, दि. २७ आॅक्टोबर २०१४ रोजी तापमान २४.६ ते १८.५ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. गेल्यावर्षी याच दिवशी कमाल ३३ तर किमान २२ अंश सेल्सियस तापमान होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी कमाल ९ तर किमान ४ अंश सेल्सियसने तापमान कमी झाले आहे. दि. २६ रोजी कमाल २०.८ तर किमान १५.९ तापमान होते. अजून दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गारठा कमीच...गेल्या चार दिवसात वातावरणात बदल झाला असला तरी सोमवारचे किमान तापमान हे १८.५ अंश सेल्सियस होते. हे तापमान नेहमीसारखेच आहे. मात्र, पाऊस पडत असल्यामुळे गारठा जास्त जाणवत असल्याचे तिखे यांनी सांगितले.अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. आपल्याकडे वादळी पावसाचा धोका असल्याचे हवामान खात्याने सूचना दिल्या होत्या. मात्र, हे वादळ गुजरातकडे सरकल्यामुळे तो धोका टळला आहे. मात्र, अजून दोन दिवस तरी ढगाळ वातावरण राहणार असून त्यानंतर थंडी वाढणार आहे.- व्ही. आर. तिखे,तापमान कर्मचारी,सातारानागरिकांमध्ये संभ्रमावस्था...गेल्या चार दिवसांत वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. ढगाळ वातावरणाबरोबरच बोचऱ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ढग दाटून अंधारून येत असल्यामुळे मोठा पाऊस पडतो की काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्यांना आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना अंगात स्वेटर घालावा की रेनकोट, असा प्रश्न पडत आहे.भुरभुर पाऊस पिकांसाठी घातकनागरिक आॅक्टोबर हिटने हैराण असतानाच अचानक आलेल्या थंडीच्या लाटेमुळे उबदार कपडे परिधान करून वावरताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणाबरोबरच दिवसा आणि रात्रीही बोचरी थंडी पडत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही याचा प्रतिकूल परिणाम झालेला जाणवत आहे. पावसाची भुरभूर ही पिकांसाठी रोगट वातावरण निर्माण करणारी असल्यामुळे शेतकरीही धास्तावले आहेत.