शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

यक्षप्रश्न... रेनकोट घ्यावा की स्वेटर?

By admin | Updated: October 27, 2014 23:43 IST

दुपारी पाऊस-रात्री थंडी : वादळी पावसाचा धोका टळला; वातावरण निवळल्यानंतर वाढणार थंडी

सातारा : गेल्या चार दिवसांपासून वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, मधूनच पावसाची भुरभूर आणि हवेत कमालीचा वाढलेला गारठा हा बदल अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळामुळे झाल्याचे सातारा हवामान विभागाकडून सांगण्यात आले. अशा संमिश्र वातावरणामुळे स्वेटर घ्यावा की रेनकोट, अशी नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.गेल्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले. परिणामस्वरूप आपल्याकडे वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. मात्र, अरबी समुद्रातील वादळ गुजरातकडे सरकल्यामुळे मोठा धोका टळला आहे. मात्र, अशा स्थितीमुळेच आपल्याकडे अचानक वातावरणात बदल झाला आहे. गेल्या चार दिवसात तापमान १८ ते १५ अंश सेल्सियसपर्यंत आले होते. त्यामुळे आॅक्टोबर हिटने घामेघूम होत असतानाच अचानक निर्माण झालेल्या थंडीच्या लाटेमुळे नागरिकांनी उबदार कपडे परिधान करण्यास सुरुवात केली आहे. वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. थंडी, ताप, खोकला अशा आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. आज सोमवार, दि. २७ आॅक्टोबर २०१४ रोजी तापमान २४.६ ते १८.५ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. गेल्यावर्षी याच दिवशी कमाल ३३ तर किमान २२ अंश सेल्सियस तापमान होते. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत आजच्या दिवशी कमाल ९ तर किमान ४ अंश सेल्सियसने तापमान कमी झाले आहे. दि. २६ रोजी कमाल २०.८ तर किमान १५.९ तापमान होते. अजून दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरण राहणार थंडीची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)गारठा कमीच...गेल्या चार दिवसात वातावरणात बदल झाला असला तरी सोमवारचे किमान तापमान हे १८.५ अंश सेल्सियस होते. हे तापमान नेहमीसारखेच आहे. मात्र, पाऊस पडत असल्यामुळे गारठा जास्त जाणवत असल्याचे तिखे यांनी सांगितले.अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाचा हा परिणाम आहे. आपल्याकडे वादळी पावसाचा धोका असल्याचे हवामान खात्याने सूचना दिल्या होत्या. मात्र, हे वादळ गुजरातकडे सरकल्यामुळे तो धोका टळला आहे. मात्र, अजून दोन दिवस तरी ढगाळ वातावरण राहणार असून त्यानंतर थंडी वाढणार आहे.- व्ही. आर. तिखे,तापमान कर्मचारी,सातारानागरिकांमध्ये संभ्रमावस्था...गेल्या चार दिवसांत वातावरणात प्रचंड बदल झाला आहे. ढगाळ वातावरणाबरोबरच बोचऱ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ढग दाटून अंधारून येत असल्यामुळे मोठा पाऊस पडतो की काय, अशी स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्यांना आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना अंगात स्वेटर घालावा की रेनकोट, असा प्रश्न पडत आहे.भुरभुर पाऊस पिकांसाठी घातकनागरिक आॅक्टोबर हिटने हैराण असतानाच अचानक आलेल्या थंडीच्या लाटेमुळे उबदार कपडे परिधान करून वावरताना दिसत आहेत. ढगाळ वातावरणाबरोबरच दिवसा आणि रात्रीही बोचरी थंडी पडत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही याचा प्रतिकूल परिणाम झालेला जाणवत आहे. पावसाची भुरभूर ही पिकांसाठी रोगट वातावरण निर्माण करणारी असल्यामुळे शेतकरीही धास्तावले आहेत.