शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

महाराष्ट्राच्या नंदनवनात वाहतूक कोंडीचा प्रश्न

By admin | Updated: May 29, 2015 00:06 IST

प्रशासन सुस्त : ऐन हंगामात वाढली लाखो प्रवाशांची दगदग

महाबळेश्वर : महाबळेश्वरातील वाहतुकीचा होणाऱ्या कोंडीचा गचाळपणाची जवाबदारी पालिका प्रशासन व पोलीस खाते यांच्यामुळे होत आहे, असा संताप स्थानिक नागरिकांमधून होत आहे. दि. १ मे ते ५ मे पर्यंत सलग सुट्या होत्या व याचवेळी राज्यपालांचा दौरा होता. यावेळी तर प्रचंड प्रमाणात गर्दी होती. या दरम्यान वाहतूक कोंडी झाली नाही. पालिका प्रशासन व पोलीस खाते एकदम शिस्तबध्दतेने काम करत होती राज्यपालाचा दौरा संपल्यानंतर बोटावर मोजण्याइतकेच पोलीस कर्मचारी का ठेवले, असा प्रश्न जनततून निर्माण होत आहे .उन्हाळी हंगामामुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेले असून वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीच्या व्यवस्थेचा गचाळपणा पुन्हा एकदा डोक्यावर बसलेले आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे शहर परिसर हाऊस फूल झाला आहे. महाबळेश्वर हे जागतिक पर्यटन स्थळ असल्यामुळे देश विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. विशेषत: उन्हाळी हंगामामध्ये पर्यटकाची संख्या लक्षणीय राहते. सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात चालू आहे. शहरात रस्त्यावर अलिशान गाड्यांच्या व असंख्य वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत होवू लागली आहे. त्याचा फटका पर्यटकांसह स्थानिक टॅक्सीवाले व नागरिकांना बसत आहे. पाचगणी दांडेघर येथील टोल नाक्यापासूनच वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत, तेथून पुढे मॅप्रो गार्डन येथे जास्त वाहने बसतील, अशा प्रमाणाचे वाहतळ नसल्यामुळे पर्यटक खरेदी करताना वाहने वाकडी तिकडी लावून जातात, त्यामुळे येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे वाईकडून येणाऱ्या वाहनांना तासतास एका जागेवर थांबावे लागते .हीच परिस्थिती वेण्णालेकजवळ वेण्णालेक येथून बाजार पेठेत येण्यासाठी तब्बल दोन तास मोजावे लागतात. वाहनतळ पुरेसे नसल्यामुळे पर्यटक खरेदी करताना वाहने वाकडी तिकडी लावून जातात, अशीच परिस्थिती माखरिया गार्डन, बाळासाहेब ठाकरे चौक, मसजीद रोड, शिवाजी चौक व सुभाषचौक या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहेमहाबळेश्वरात वाहतुकीचा होणारा गचाळपणा थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक व स्थानिक नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)शहरातील वाहतुकीस बेशिस्तपणा आला असून बारा महिने पर्यटकाची आवक असते त्या संर्दभात नियाजन पोलिस खात्याकडून केले जात नाही. नो पार्किंग, एकेरी मार्ग, दुहेरी मार्ग हे वाहतुकीचे नियम सर्व ढाब्यावर कोणी पाळताना दिसत नाही. पालिकेतून नो पार्किग, ऐकेरी मार्ग, दुहेरी मार्ग, चे फलक ही दिले गेले नाही. हंगाम पूर्वी वाहतुक व्यवस्थेसाठी नगरपालिकेत मिटीग आयोजित केली जाते पंरतु यामिटीगला प्रांत अधिकारी , तहसलिदार , मुख्याधिकारी ,पोलिस निरीक्षक उपस्थित असतात पण ही मिटीग घेतली गेली नाही.ट्रॅफिक नियोजनाबात दरवर्षी पालिका व पोलीस प्रशासनाची नियोजन बैठक होते. यंदा ही बैठक होऊ शकली नाही. ट्रॅफिक समस्येबाबत पोलीस अधीक्षकांशी अनेकदा संपर्क साधला. यानंत महाबळेश्वरात दहा पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पालिकेने ट्रॅफिक निवारणासाठी पालिका कर्मचारी व काही मुलांची हंगामी स्वरूपात नियुक्ती केली आहे.- उज्ज्वला तोष्णीवाल, नगराध्यक्षा, महाबळेश्वर, न. पा.