शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या नंदनवनात वाहतूक कोंडीचा प्रश्न

By admin | Updated: May 29, 2015 00:06 IST

प्रशासन सुस्त : ऐन हंगामात वाढली लाखो प्रवाशांची दगदग

महाबळेश्वर : महाबळेश्वरातील वाहतुकीचा होणाऱ्या कोंडीचा गचाळपणाची जवाबदारी पालिका प्रशासन व पोलीस खाते यांच्यामुळे होत आहे, असा संताप स्थानिक नागरिकांमधून होत आहे. दि. १ मे ते ५ मे पर्यंत सलग सुट्या होत्या व याचवेळी राज्यपालांचा दौरा होता. यावेळी तर प्रचंड प्रमाणात गर्दी होती. या दरम्यान वाहतूक कोंडी झाली नाही. पालिका प्रशासन व पोलीस खाते एकदम शिस्तबध्दतेने काम करत होती राज्यपालाचा दौरा संपल्यानंतर बोटावर मोजण्याइतकेच पोलीस कर्मचारी का ठेवले, असा प्रश्न जनततून निर्माण होत आहे .उन्हाळी हंगामामुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून गेले असून वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडीच्या व्यवस्थेचा गचाळपणा पुन्हा एकदा डोक्यावर बसलेले आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे शहर परिसर हाऊस फूल झाला आहे. महाबळेश्वर हे जागतिक पर्यटन स्थळ असल्यामुळे देश विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे भेट देतात. विशेषत: उन्हाळी हंगामामध्ये पर्यटकाची संख्या लक्षणीय राहते. सध्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल मोठ्या प्रमाणात चालू आहे. शहरात रस्त्यावर अलिशान गाड्यांच्या व असंख्य वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूक व्यवस्था पूर्णत: विस्कळीत होवू लागली आहे. त्याचा फटका पर्यटकांसह स्थानिक टॅक्सीवाले व नागरिकांना बसत आहे. पाचगणी दांडेघर येथील टोल नाक्यापासूनच वाहनाच्या रांगा लागलेल्या आहेत, तेथून पुढे मॅप्रो गार्डन येथे जास्त वाहने बसतील, अशा प्रमाणाचे वाहतळ नसल्यामुळे पर्यटक खरेदी करताना वाहने वाकडी तिकडी लावून जातात, त्यामुळे येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे वाईकडून येणाऱ्या वाहनांना तासतास एका जागेवर थांबावे लागते .हीच परिस्थिती वेण्णालेकजवळ वेण्णालेक येथून बाजार पेठेत येण्यासाठी तब्बल दोन तास मोजावे लागतात. वाहनतळ पुरेसे नसल्यामुळे पर्यटक खरेदी करताना वाहने वाकडी तिकडी लावून जातात, अशीच परिस्थिती माखरिया गार्डन, बाळासाहेब ठाकरे चौक, मसजीद रोड, शिवाजी चौक व सुभाषचौक या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहेमहाबळेश्वरात वाहतुकीचा होणारा गचाळपणा थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक व स्थानिक नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)शहरातील वाहतुकीस बेशिस्तपणा आला असून बारा महिने पर्यटकाची आवक असते त्या संर्दभात नियाजन पोलिस खात्याकडून केले जात नाही. नो पार्किंग, एकेरी मार्ग, दुहेरी मार्ग हे वाहतुकीचे नियम सर्व ढाब्यावर कोणी पाळताना दिसत नाही. पालिकेतून नो पार्किग, ऐकेरी मार्ग, दुहेरी मार्ग, चे फलक ही दिले गेले नाही. हंगाम पूर्वी वाहतुक व्यवस्थेसाठी नगरपालिकेत मिटीग आयोजित केली जाते पंरतु यामिटीगला प्रांत अधिकारी , तहसलिदार , मुख्याधिकारी ,पोलिस निरीक्षक उपस्थित असतात पण ही मिटीग घेतली गेली नाही.ट्रॅफिक नियोजनाबात दरवर्षी पालिका व पोलीस प्रशासनाची नियोजन बैठक होते. यंदा ही बैठक होऊ शकली नाही. ट्रॅफिक समस्येबाबत पोलीस अधीक्षकांशी अनेकदा संपर्क साधला. यानंत महाबळेश्वरात दहा पोलिसांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे पालिकेने ट्रॅफिक निवारणासाठी पालिका कर्मचारी व काही मुलांची हंगामी स्वरूपात नियुक्ती केली आहे.- उज्ज्वला तोष्णीवाल, नगराध्यक्षा, महाबळेश्वर, न. पा.