शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

लोकशाहीच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

वडूज : ‘केंद्र सरकारकडून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक दिली जात आहे, आपल्या हक्कासाठी न्याय ...

वडूज : ‘केंद्र सरकारकडून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक दिली जात आहे, आपल्या हक्कासाठी न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, गोळीबार केला जात असेल तर देशात लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे,’ असे प्रतिपादन स्वाभिमानी युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी केले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, राज्याचे प्रवक्ते अनिल पवार, अशोक गोडसे, डॉ. विवेक देशमुख, मानाजी घाडगे, विजय शिंदे, सूर्यकांत भुजबळ, भरत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘गेले ७० दिवस शेतकरी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता रस्त्यावर बसून कृषी विधेयके माघार घ्यावीत, अशी मागणी करत असताना जवळजवळ १६० शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. तरीही केंद्र सरकारने केलेली कृषी विधेयके शेतकऱ्यांना मान्य नसतील तर ती हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांवर का लादली जात आहेत. केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी देशाच्या शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय, तर ही लाजिरवाणी बाब आहे.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन जाहीर केले. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात केंद्र सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वडूज येथे केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत एक तासाचा लाक्षणिक रास्ता रोको केला. या आंदोलनात महेश गुरव, जाकीर पठाण, परेश जाधव, डॉ. संतोष गोडसे, अमित देशमुख, ईश्वर जाधव, भीमराव खिलारे, राहुल सजगणे, ज्ञानेश्वर इंगवले, स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष सचिन पवार, तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, भुरकवडी, भोसरे, कातरखटाव उंबर्डेचे शेतकरी व तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०६वडूज

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसने वडूज तहसील कार्यालयाबाहेर चक्काजाम आंदोलन केले.