शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

लोकशाहीच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

वडूज : ‘केंद्र सरकारकडून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक दिली जात आहे, आपल्या हक्कासाठी न्याय ...

वडूज : ‘केंद्र सरकारकडून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना वागणूक दिली जात आहे, आपल्या हक्कासाठी न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, गोळीबार केला जात असेल तर देशात लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे,’ असे प्रतिपादन स्वाभिमानी युवा जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख यांनी केले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, रणजितसिंह देशमुख, राज्याचे प्रवक्ते अनिल पवार, अशोक गोडसे, डॉ. विवेक देशमुख, मानाजी घाडगे, विजय शिंदे, सूर्यकांत भुजबळ, भरत जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘गेले ७० दिवस शेतकरी ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता रस्त्यावर बसून कृषी विधेयके माघार घ्यावीत, अशी मागणी करत असताना जवळजवळ १६० शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. तरीही केंद्र सरकारने केलेली कृषी विधेयके शेतकऱ्यांना मान्य नसतील तर ती हुकूमशाही पद्धतीने शेतकऱ्यांवर का लादली जात आहेत. केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी देशाच्या शेतकऱ्यांचा बळी दिला जातोय, तर ही लाजिरवाणी बाब आहे.

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेत्यांनी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन जाहीर केले. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण राज्यात केंद्र सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून वडूज येथे केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करत एक तासाचा लाक्षणिक रास्ता रोको केला. या आंदोलनात महेश गुरव, जाकीर पठाण, परेश जाधव, डॉ. संतोष गोडसे, अमित देशमुख, ईश्वर जाधव, भीमराव खिलारे, राहुल सजगणे, ज्ञानेश्वर इंगवले, स्वाभिमानीचे युवा तालुकाध्यक्ष सचिन पवार, तालुकाध्यक्ष दत्तूकाका घार्गे, भुरकवडी, भोसरे, कातरखटाव उंबर्डेचे शेतकरी व तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०६वडूज

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेसने वडूज तहसील कार्यालयाबाहेर चक्काजाम आंदोलन केले.