शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

खंडोबाचा मिरवणूक मार्ग पुरात

By admin | Updated: January 6, 2017 23:05 IST

लाखो रुपये पाण्यात : पालीच्या यात्रेसाठी वाळवंटात थाटलेल्या राहुट्यांवर जलसंकट

उंब्रज : पालच्या खंडोबाची यात्रा चार दिवसांवर आली आहे. यात्रेसाठी राज्यभरातून नऊ ते दहा लाख भाविक येतात. मिरवणूक मार्ग हा पात्रातून असतो. यात्रेसाठी लाखो रुपये खर्चून मिरवणूक मार्ग तयार केला आहे. तारळी धरणाचा दरवाजाचा पत्रा शुक्रवारी अचानक तुटल्यामुळे तारळी नदीपात्रातील पाणी पातळी वाढ झाली. या पुरात मिरवणूक मार्ग वाहून गेला. तर वाळवंटात नदीपात्रालगतची दुकाने हलवण्यास सांगितली आहेत.तारळी धरणाच्या दरवाजाचा पत्रा शुक्रवारी अचानक तुटला. त्यामुळे तारळे, पाल परिसरात घबराट पसरली. नदीपात्रातील प्रवाह वाढला. पालच्या खंडोबा यात्रेतील मिरवणुकीसाठी तयार केलेला मिरवणूक मार्ग पाण्याच्या प्रवाहात काही क्षणात वाहून गेला. तसेच वाळवंटातील काही दुकाने नदीपात्राजवळ होती ती दुकाने हलविण्यास प्रशासनाने सांगितले आहे. मोठ्या कष्टातून आणलेले साहित्य पाण्यात वाहून गेले तर काही हाती लागणार नाही. या भीतीने येथील व्यापाऱ्यांनी वाहनातून साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)नदीत जाण्यापासून पोलिसांनी रोखलेउंब्रज पोलिस ठाण्यातील लक्ष्मण जगदन्ने, विकास घोरपडे, कुंभार यांनी दिवसभर पालमधील यात्रास्थळावर थांबून दुकानदार, ग्रामस्थांना सावधानतेच्या सूचना देत होते. तसेच नदी पात्र व पाण्याच्या जाण्यापासून रोखत होते.आढावा बैठकीतही गाजला होता विषयपालमध्ये दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल यांनी यात्रा नियोजन बैठक घेतली होती. यावेळीही जिल्हाधिकारी मुदगल यांनी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना ‘नदी पात्रात प्रवाह जास्त का आहे?,’ असा प्रश्न विचारला होता. तेव्हा ‘धरणाला गळती आहे. ती काढण्यासाठी वरिष्ठांना कळविले आहे,’ असे उत्तर दिले होते. यावेळी यात्रा कालावधीत नदीपात्रातील पाण्यात वाढ होणार नाही, असे लेखी देऊ शकता का? असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला. त्यावेळी त्यांनी गप्प राहून ‘गळती काढण्यासाठी प्रयत्न करू,’ असे उत्तर दिले होते. पण शुक्रवारी नको तेच घडले. दरवाजाच्या व्हॉल्व्हचा पत्रा तुटला, धरण व्यवस्थापन अधिकारी वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष देत नाहीत. मनमानी कारभार करतात हे या घटनेवरून अधोरेखीत झाले.