शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

खंडोबाचा मिरवणूक मार्ग पुरात

By admin | Updated: January 6, 2017 23:05 IST

लाखो रुपये पाण्यात : पालीच्या यात्रेसाठी वाळवंटात थाटलेल्या राहुट्यांवर जलसंकट

उंब्रज : पालच्या खंडोबाची यात्रा चार दिवसांवर आली आहे. यात्रेसाठी राज्यभरातून नऊ ते दहा लाख भाविक येतात. मिरवणूक मार्ग हा पात्रातून असतो. यात्रेसाठी लाखो रुपये खर्चून मिरवणूक मार्ग तयार केला आहे. तारळी धरणाचा दरवाजाचा पत्रा शुक्रवारी अचानक तुटल्यामुळे तारळी नदीपात्रातील पाणी पातळी वाढ झाली. या पुरात मिरवणूक मार्ग वाहून गेला. तर वाळवंटात नदीपात्रालगतची दुकाने हलवण्यास सांगितली आहेत.तारळी धरणाच्या दरवाजाचा पत्रा शुक्रवारी अचानक तुटला. त्यामुळे तारळे, पाल परिसरात घबराट पसरली. नदीपात्रातील प्रवाह वाढला. पालच्या खंडोबा यात्रेतील मिरवणुकीसाठी तयार केलेला मिरवणूक मार्ग पाण्याच्या प्रवाहात काही क्षणात वाहून गेला. तसेच वाळवंटातील काही दुकाने नदीपात्राजवळ होती ती दुकाने हलविण्यास प्रशासनाने सांगितले आहे. मोठ्या कष्टातून आणलेले साहित्य पाण्यात वाहून गेले तर काही हाती लागणार नाही. या भीतीने येथील व्यापाऱ्यांनी वाहनातून साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)नदीत जाण्यापासून पोलिसांनी रोखलेउंब्रज पोलिस ठाण्यातील लक्ष्मण जगदन्ने, विकास घोरपडे, कुंभार यांनी दिवसभर पालमधील यात्रास्थळावर थांबून दुकानदार, ग्रामस्थांना सावधानतेच्या सूचना देत होते. तसेच नदी पात्र व पाण्याच्या जाण्यापासून रोखत होते.आढावा बैठकीतही गाजला होता विषयपालमध्ये दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल यांनी यात्रा नियोजन बैठक घेतली होती. यावेळीही जिल्हाधिकारी मुदगल यांनी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना ‘नदी पात्रात प्रवाह जास्त का आहे?,’ असा प्रश्न विचारला होता. तेव्हा ‘धरणाला गळती आहे. ती काढण्यासाठी वरिष्ठांना कळविले आहे,’ असे उत्तर दिले होते. यावेळी यात्रा कालावधीत नदीपात्रातील पाण्यात वाढ होणार नाही, असे लेखी देऊ शकता का? असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला. त्यावेळी त्यांनी गप्प राहून ‘गळती काढण्यासाठी प्रयत्न करू,’ असे उत्तर दिले होते. पण शुक्रवारी नको तेच घडले. दरवाजाच्या व्हॉल्व्हचा पत्रा तुटला, धरण व्यवस्थापन अधिकारी वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष देत नाहीत. मनमानी कारभार करतात हे या घटनेवरून अधोरेखीत झाले.