शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबाचा मिरवणूक मार्ग पुरात

By admin | Updated: January 6, 2017 23:05 IST

लाखो रुपये पाण्यात : पालीच्या यात्रेसाठी वाळवंटात थाटलेल्या राहुट्यांवर जलसंकट

उंब्रज : पालच्या खंडोबाची यात्रा चार दिवसांवर आली आहे. यात्रेसाठी राज्यभरातून नऊ ते दहा लाख भाविक येतात. मिरवणूक मार्ग हा पात्रातून असतो. यात्रेसाठी लाखो रुपये खर्चून मिरवणूक मार्ग तयार केला आहे. तारळी धरणाचा दरवाजाचा पत्रा शुक्रवारी अचानक तुटल्यामुळे तारळी नदीपात्रातील पाणी पातळी वाढ झाली. या पुरात मिरवणूक मार्ग वाहून गेला. तर वाळवंटात नदीपात्रालगतची दुकाने हलवण्यास सांगितली आहेत.तारळी धरणाच्या दरवाजाचा पत्रा शुक्रवारी अचानक तुटला. त्यामुळे तारळे, पाल परिसरात घबराट पसरली. नदीपात्रातील प्रवाह वाढला. पालच्या खंडोबा यात्रेतील मिरवणुकीसाठी तयार केलेला मिरवणूक मार्ग पाण्याच्या प्रवाहात काही क्षणात वाहून गेला. तसेच वाळवंटातील काही दुकाने नदीपात्राजवळ होती ती दुकाने हलविण्यास प्रशासनाने सांगितले आहे. मोठ्या कष्टातून आणलेले साहित्य पाण्यात वाहून गेले तर काही हाती लागणार नाही. या भीतीने येथील व्यापाऱ्यांनी वाहनातून साहित्य हलविण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)नदीत जाण्यापासून पोलिसांनी रोखलेउंब्रज पोलिस ठाण्यातील लक्ष्मण जगदन्ने, विकास घोरपडे, कुंभार यांनी दिवसभर पालमधील यात्रास्थळावर थांबून दुकानदार, ग्रामस्थांना सावधानतेच्या सूचना देत होते. तसेच नदी पात्र व पाण्याच्या जाण्यापासून रोखत होते.आढावा बैठकीतही गाजला होता विषयपालमध्ये दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी डॉ. अश्विन मुदगल यांनी यात्रा नियोजन बैठक घेतली होती. यावेळीही जिल्हाधिकारी मुदगल यांनी धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांना ‘नदी पात्रात प्रवाह जास्त का आहे?,’ असा प्रश्न विचारला होता. तेव्हा ‘धरणाला गळती आहे. ती काढण्यासाठी वरिष्ठांना कळविले आहे,’ असे उत्तर दिले होते. यावेळी यात्रा कालावधीत नदीपात्रातील पाण्यात वाढ होणार नाही, असे लेखी देऊ शकता का? असा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केला. त्यावेळी त्यांनी गप्प राहून ‘गळती काढण्यासाठी प्रयत्न करू,’ असे उत्तर दिले होते. पण शुक्रवारी नको तेच घडले. दरवाजाच्या व्हॉल्व्हचा पत्रा तुटला, धरण व्यवस्थापन अधिकारी वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष देत नाहीत. मनमानी कारभार करतात हे या घटनेवरून अधोरेखीत झाले.