शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पुणे-मुंबईकरही घेणार हातीपाटी अन् खोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:12 IST

सातारा : वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होऊन तीन आठवडे झाले असून, जिल्ह्यातील १९८ गावांमध्ये तुफान आलंया. तर आता १ ...

सातारा : वॉटर कप स्पर्धेला सुरुवात होऊन तीन आठवडे झाले असून, जिल्ह्यातील १९८ गावांमध्ये तुफान आलंया. तर आता १ मे रोजी जिल्ह्यातील चार गावांत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी आॅनलाईन नोंदणी केलेले पुणे, मुंबई, साताऱ्यासह इतर शहरातील नागरिक हातात पाटी, खोरे अन् टिकाव घेणार आहेत. यामुळे ही चळवळ आणखी गतिमान होईल.गेल्या चार वर्षांपासून राज्यात अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू झालीय. पहिल्या वर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. राज्यातील सातारा, बीड आणि अमरावती हे तीनच जिल्हे स्पर्धेत सहभागी होते. यामध्ये सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. दुसºया स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी स्पर्धेत सहभाग घेतलेला. सातारा जिल्ह्याने दुसºया वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. तर तिसºया स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील टाकेवाडी आणि भांडवली गावाने राज्यात अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेला.वॉटर कप स्पर्धेचा चौथा टप्पा दि. ८ एप्रिलपासून सुरू झाला आहे. हे काम ४५ दिवस म्हणजे दि. २२ मेपर्यंत चालणार आहे. यावर्षीही सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि कोरेगाव हे तीन तालुके सहभागी झालेत. माण आणि खटावमधील प्रत्येकी ६७ आणि कोरेगावमधील ६४ अशा मिळून १९८ गावांत जलसंधारणाचे काम सुरू झालंय. या गावांतील ग्रामस्थ दररोज सकाळी शिवारात जाऊन जलसंधारणाची कामे करत आहेत. कोणी टिकाव घेऊन खोदकाम करतंय. तर कोणी खोरे घेऊन पाट्या भरून देत आहे. यामुळे जलसंधारणाचे काम करण्यासाठी सर्वचजण आपापल्या परीने हातभार लावत आहेत. असे असतानाच आता १ मे रोजी जिल्ह्यात चार ठिकाणी महाश्रमदान होत आहे.कोरेगाव तालुक्यातील सोळशी आणि चिलेवाडी तसेच माणमधील शिंदी बुद्रुक व खटावमधील वरुडमध्ये हे महाश्रमदान होत आहे. या महाश्रमदानात पुणे, मुंबई, सातारा तसेच इतर शहरातील नागरिक येणार आहेत. या नागरिकांनी पाणी फाउंडेशनच्या ‘जलमित्र व्हा’ या आॅनलाईन लिंकवर नोंदणी केली होती. संबंधितांनी कोणत्या तालुक्यात जायचे आहे, हे नोंद केले आहे. त्यावरून त्यांना माहिती देण्यातआली.