शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

भाज्यांबरोबरच डाळीही महाग; मसूर, हरभरा डाळ भागवते भूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने बाजारपेठेत भाजीपाला कमी येत आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या लॉकडाऊनचाही इतर ...

सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने बाजारपेठेत भाजीपाला कमी येत आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या लॉकडाऊनचाही इतर आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भाज्यांबरोबरच डाळीही महाग झाल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, त्यांच्यावर मसूर व हरभरा डाळींवर भूक भागविण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. कोणतीही भाजी ही ४० रुपये किलोच्या आत नाही. टोमॅटो आणि कोबीचाच दर आवाक्यात आहे. काही दिवसांपूर्वी तर वाटाण्याचा दर १०० रुपये किलोच्या पुढे गेला होता. यामुळे सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागले. त्यातच मागील काही महिन्यांपासून तूर, मूग, उडीद अशा डाळींचे दरही १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. भाज्या महाग म्हणून डाळींना पसंती द्यावी तर त्याही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे थोड्या स्वस्त असणाऱ्या हरभरा व मसूर डाळींना पसंती देण्याची वेळ आली आहे.

.............................

चौकट :

डाळींचे दर (प्रति किलो)

हरभरा ८०-८५

तूर ११०-१२०

मूग १००-११०

उडीद ११०-१२०

मसूर ९०-९५

........................................

म्हणून डाळ महागली...

- कोरोनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठेला ठराविक वेळेची मर्यादा आहे. याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे डाळींचे दर अजूनही तेजीत असल्याचे दिसत आहे.

- जिल्ह्यात अजूनही डाळींची मोठ्या प्रमाणात आवक होत नाही. त्यामुळे आहे तो साठा विकावा लागत आहे. त्याचबरोबर नवीन डाळी आल्यानंतर दर उतारण्याची शक्यता आहे. पण, सद्यस्थितीत गेल्या काही महिन्यांपासून डाळींचे दर हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

................................................

भाज्यांचे भाव (प्रति किलो)

बटाटा ३० ते ४०

कांदा २० ते ३०

टोमॅटो २० ते ३०

काकडी २० ते ३०

भेंडी ४० ते ६०

गवार ६० ते ८०

वाटाणा ८० ते १००

वांगी ४० ते ६०

कारले ४० ते ६०

ढबू ४० ते ६०

..............................................

म्हणून भाज्या कडाडल्या...

जिल्ह्यात पाऊस होत आहे. त्यातच अतिवृष्टीने अनेक भागात भाज्यांचे नुकसान झाले आहे. पाण्याबाहेर भाज्या काढणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढत चालले आहेत.

........................................................

सर्वसामान्यांचे हाल...

कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षापासून आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच आता भाज्यांचे दर वाढले आहेत तसेच डाळीही महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना किचनचा मेळ घालताना कसरत करावी लागत आहे.

- सुवर्णा आटपाडकर, गृहिणी

..........

सध्या कोणतीही भाजी घ्यायला गेले तरी ४० रुपयांच्याच पुढे आहे. तर डाळींनाही किलोसाठी १००, १२० रुपये द्यावे लागतात. यामुळे किचनासाठीचा खर्च वाढतच चालला आहे. एक वर्षापासून अशी स्थिती आहे.

- रमा पवार, गृहिणी

...................................................................