शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

भाज्यांबरोबरच डाळीही महाग; मसूर, हरभरा डाळ भागवते भूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने बाजारपेठेत भाजीपाला कमी येत आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या लॉकडाऊनचाही इतर ...

सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने बाजारपेठेत भाजीपाला कमी येत आहे तर दुसरीकडे कोरोनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या लॉकडाऊनचाही इतर आवकेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भाज्यांबरोबरच डाळीही महाग झाल्या आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, त्यांच्यावर मसूर व हरभरा डाळींवर भूक भागविण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. कोणतीही भाजी ही ४० रुपये किलोच्या आत नाही. टोमॅटो आणि कोबीचाच दर आवाक्यात आहे. काही दिवसांपूर्वी तर वाटाण्याचा दर १०० रुपये किलोच्या पुढे गेला होता. यामुळे सर्वसामान्यांना महागाईला सामोरे जावे लागले. त्यातच मागील काही महिन्यांपासून तूर, मूग, उडीद अशा डाळींचे दरही १०० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. भाज्या महाग म्हणून डाळींना पसंती द्यावी तर त्याही सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. यामुळे थोड्या स्वस्त असणाऱ्या हरभरा व मसूर डाळींना पसंती देण्याची वेळ आली आहे.

.............................

चौकट :

डाळींचे दर (प्रति किलो)

हरभरा ८०-८५

तूर ११०-१२०

मूग १००-११०

उडीद ११०-१२०

मसूर ९०-९५

........................................

म्हणून डाळ महागली...

- कोरोनाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठेला ठराविक वेळेची मर्यादा आहे. याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे डाळींचे दर अजूनही तेजीत असल्याचे दिसत आहे.

- जिल्ह्यात अजूनही डाळींची मोठ्या प्रमाणात आवक होत नाही. त्यामुळे आहे तो साठा विकावा लागत आहे. त्याचबरोबर नवीन डाळी आल्यानंतर दर उतारण्याची शक्यता आहे. पण, सद्यस्थितीत गेल्या काही महिन्यांपासून डाळींचे दर हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

................................................

भाज्यांचे भाव (प्रति किलो)

बटाटा ३० ते ४०

कांदा २० ते ३०

टोमॅटो २० ते ३०

काकडी २० ते ३०

भेंडी ४० ते ६०

गवार ६० ते ८०

वाटाणा ८० ते १००

वांगी ४० ते ६०

कारले ४० ते ६०

ढबू ४० ते ६०

..............................................

म्हणून भाज्या कडाडल्या...

जिल्ह्यात पाऊस होत आहे. त्यातच अतिवृष्टीने अनेक भागात भाज्यांचे नुकसान झाले आहे. पाण्याबाहेर भाज्या काढणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी होत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढत चालले आहेत.

........................................................

सर्वसामान्यांचे हाल...

कोरोनामुळे गेल्या सव्वा वर्षापासून आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच आता भाज्यांचे दर वाढले आहेत तसेच डाळीही महागल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांना किचनचा मेळ घालताना कसरत करावी लागत आहे.

- सुवर्णा आटपाडकर, गृहिणी

..........

सध्या कोणतीही भाजी घ्यायला गेले तरी ४० रुपयांच्याच पुढे आहे. तर डाळींनाही किलोसाठी १००, १२० रुपये द्यावे लागतात. यामुळे किचनासाठीचा खर्च वाढतच चालला आहे. एक वर्षापासून अशी स्थिती आहे.

- रमा पवार, गृहिणी

...................................................................