शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कडधान्यानं मारलं; शेतकऱ्यांना भातानं तारलं; मल्हारपेठ परिसरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:23 IST

मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आहे. तर कडधान्यातील मूग, उडीद, घेवडा, धना, कारळा आदी पिके ...

मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आहे. तर कडधान्यातील मूग, उडीद, घेवडा, धना, कारळा आदी पिके अतिपावसाने वाया गेली आहेत. पावसाने पिके कुचंबली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडझाप सुरू केल्यामुळे थोडे फार उत्पन्न मिळेल, असा प्रकारच्या आशा शेतकºयांमध्ये निर्माण झाल्या आहेत.शेतात घातलेला खर्च तरी निघेल, या आशेने शेतकरी वर्गातून रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर औषध फवारणीसह विविध उपाय केले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतीतून उत्पन्न मिळविण्याची धडपड शेतकºयांतून होत असल्याचे चित्र सध्या पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.चालूवर्षी पाटण तालुक्यात वेळेवर जून महिन्यात पावसाने सुरुवात केली. कशाबशा शेतकºयांनी पेरण्या केल्या. सुरुवातीस झालेल्या तुरळक पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अक्षरश: शेतकºयांना शेती मशागतीचीही कामे करता आली नाही. सततच्या पावसामुळे शिवारात पिकांभोवती तणाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर याचा परिणाम झाला आहे. तर भुईमुगाच्या आरा टोचणीची अवस्था असून, सरीवर असणाºया भुईमुगास मोठा मार बसला आहे.चालूवर्षी जादा पावसामुळे भाताची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून, सर्वात जास्त उत्पन्न भात करणाºया भात उत्पादक शेतकºयांना मिळेल, अशी अशा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. काही ठिकाणी हवामानातल्या बदलामुळे तांबेरा अशा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. नदीकाठी पाण्याची सोय असल्याने आडसाली लागणी होतात.चालू वर्षी भात उत्पादक शेतकºयांना फायदासोयाबीन, भुईमूग व कडधान्य करणाºया शेतकºयांची पिके कुचंबली असली तरी जादा पावसाचा फायदा पेरणी व रोप केलेल्या भातांना झाला असल्याने कंबरेच्या वर भात पिके आहेत. चालू वर्षी इतर पिकांच्या तुलनेत पेरणी व रोपभात केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे मत अनेक शेतकºयांनी व्यक्त केले.