शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
2
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
4
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
5
दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
6
₹२००० नं महाग झालं सोनं, चांदीच्या दरातही ३ हजारांपेक्षा अधिक वाढ; अजून किती वाढ होणार?
7
प्रेयसीला गोळी मारून प्रियकरानं स्वत:वरही झाडली गोळी; ७ वर्षात प्रेमात अचानक दुरावा का आला?
8
'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
9
यूट्यूबरच्या कॅमेऱ्यात कैद झाली दिल्ली स्फोटाची ‘लाइव्ह’ घटना, पाहा धक्कादायक व्हिडिओ...
10
Video - पाकिस्तानच्या इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर कारमध्ये भीषण स्फोट; १२ जणांचा मृत्यू, २५ गंभीर जखमी
11
दिल्ली स्फोट: कोणालाही अशीच विकू नका तुमची जुनी कार; खरेदी-विक्री करताना 'हे' तीन नियम पाळाच!
12
दिल्ली लाल किल्ला कार स्फोटानंतर हाफिज सईदचं 'लोकेशन' चर्चेत; कुठे लपून बसलाय?
13
Warren Buffett News: “मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
14
Delhi Blast : कार स्फोटाने दिल्ली हादरली! मृतांचा आकडा वाढला; १२ जणांनी गमावला जीव, २५ जखमी
15
Vastu Tips: बुधवारी लावलेली 'ही' रोपं ठरतात लक्ष्मीप्राप्तीचा आणि अपयशातून मुक्तीचा राजमार्ग!
16
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
17
दिल्ली ब्लास्ट: 'माझ्याजवळ शरिराचा तुकडा पडला; रात्रभर झोप लागली नाही', प्रत्यक्षदर्शीने सांगितली आपबीती
18
Shreyas Iyer Injury Update: अय्यरबाबत जोखीम नको! वनडे मालिकेपूर्वी तब्येतीसंदर्भात मोठा खुलासा
19
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
20
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग

कडधान्यानं मारलं; शेतकऱ्यांना भातानं तारलं; मल्हारपेठ परिसरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:23 IST

मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आहे. तर कडधान्यातील मूग, उडीद, घेवडा, धना, कारळा आदी पिके ...

मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आहे. तर कडधान्यातील मूग, उडीद, घेवडा, धना, कारळा आदी पिके अतिपावसाने वाया गेली आहेत. पावसाने पिके कुचंबली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडझाप सुरू केल्यामुळे थोडे फार उत्पन्न मिळेल, असा प्रकारच्या आशा शेतकºयांमध्ये निर्माण झाल्या आहेत.शेतात घातलेला खर्च तरी निघेल, या आशेने शेतकरी वर्गातून रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर औषध फवारणीसह विविध उपाय केले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतीतून उत्पन्न मिळविण्याची धडपड शेतकºयांतून होत असल्याचे चित्र सध्या पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.चालूवर्षी पाटण तालुक्यात वेळेवर जून महिन्यात पावसाने सुरुवात केली. कशाबशा शेतकºयांनी पेरण्या केल्या. सुरुवातीस झालेल्या तुरळक पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अक्षरश: शेतकºयांना शेती मशागतीचीही कामे करता आली नाही. सततच्या पावसामुळे शिवारात पिकांभोवती तणाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर याचा परिणाम झाला आहे. तर भुईमुगाच्या आरा टोचणीची अवस्था असून, सरीवर असणाºया भुईमुगास मोठा मार बसला आहे.चालूवर्षी जादा पावसामुळे भाताची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून, सर्वात जास्त उत्पन्न भात करणाºया भात उत्पादक शेतकºयांना मिळेल, अशी अशा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. काही ठिकाणी हवामानातल्या बदलामुळे तांबेरा अशा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. नदीकाठी पाण्याची सोय असल्याने आडसाली लागणी होतात.चालू वर्षी भात उत्पादक शेतकºयांना फायदासोयाबीन, भुईमूग व कडधान्य करणाºया शेतकºयांची पिके कुचंबली असली तरी जादा पावसाचा फायदा पेरणी व रोप केलेल्या भातांना झाला असल्याने कंबरेच्या वर भात पिके आहेत. चालू वर्षी इतर पिकांच्या तुलनेत पेरणी व रोपभात केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे मत अनेक शेतकºयांनी व्यक्त केले.