शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

कडधान्यानं मारलं; शेतकऱ्यांना भातानं तारलं; मल्हारपेठ परिसरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 23:23 IST

मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आहे. तर कडधान्यातील मूग, उडीद, घेवडा, धना, कारळा आदी पिके ...

मल्हारपेठ : सतत पडणारा जादा पाऊस व हवामानातील बदलामुळे खरीप हंगामातील कडधान्य व विविध पिकांवर तांबेरा, करपा, पाने खाणारी अळी आदी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. धूळवाफेवर पेरणी केलेली भात शेती ही जोमात आहे. कारण भात पिकास भरपूर प्रमाणात पाणी मिळालेले आहे. तर कडधान्यातील मूग, उडीद, घेवडा, धना, कारळा आदी पिके अतिपावसाने वाया गेली आहेत. पावसाने पिके कुचंबली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडझाप सुरू केल्यामुळे थोडे फार उत्पन्न मिळेल, असा प्रकारच्या आशा शेतकºयांमध्ये निर्माण झाल्या आहेत.शेतात घातलेला खर्च तरी निघेल, या आशेने शेतकरी वर्गातून रोगांचा प्रादुर्भाव झालेल्या पिकांवर औषध फवारणीसह विविध उपाय केले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतीतून उत्पन्न मिळविण्याची धडपड शेतकºयांतून होत असल्याचे चित्र सध्या पाटण तालुक्यातील ग्रामीण भागात दिसत आहे.चालूवर्षी पाटण तालुक्यात वेळेवर जून महिन्यात पावसाने सुरुवात केली. कशाबशा शेतकºयांनी पेरण्या केल्या. सुरुवातीस झालेल्या तुरळक पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अक्षरश: शेतकºयांना शेती मशागतीचीही कामे करता आली नाही. सततच्या पावसामुळे शिवारात पिकांभोवती तणाची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकावर याचा परिणाम झाला आहे. तर भुईमुगाच्या आरा टोचणीची अवस्था असून, सरीवर असणाºया भुईमुगास मोठा मार बसला आहे.चालूवर्षी जादा पावसामुळे भाताची वाढ मोठ्या प्रमाणात झाली असून, सर्वात जास्त उत्पन्न भात करणाºया भात उत्पादक शेतकºयांना मिळेल, अशी अशा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. काही ठिकाणी हवामानातल्या बदलामुळे तांबेरा अशा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. नदीकाठी पाण्याची सोय असल्याने आडसाली लागणी होतात.चालू वर्षी भात उत्पादक शेतकºयांना फायदासोयाबीन, भुईमूग व कडधान्य करणाºया शेतकºयांची पिके कुचंबली असली तरी जादा पावसाचा फायदा पेरणी व रोप केलेल्या भातांना झाला असल्याने कंबरेच्या वर भात पिके आहेत. चालू वर्षी इतर पिकांच्या तुलनेत पेरणी व रोपभात केलेल्या शेतकºयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे मत अनेक शेतकºयांनी व्यक्त केले.