शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्त्वाचा : विश्वंभर बाबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST

कुकुडवाड: ‘निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व आपल्या गावाचा विकास आदर्शवत होण्यासाठी गावातील तरुणवर्ग व पर्यावरणप्रेमींनी संघटित होऊन वृक्षारोपण करणे गरजेचे ...

कुकुडवाड: ‘निसर्गाचा समतोल राखण्यासाठी व आपल्या गावाचा विकास आदर्शवत होण्यासाठी गावातील तरुणवर्ग व पर्यावरणप्रेमींनी संघटित होऊन वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, तसेच वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्त्वाचा आहे,’ असे प्रतिपादन कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर यांनी केले.

देवापूर (ता.माण) येथे गावातील पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थांच्या लोकसहभागातून वृक्षारोपण उपक्रम कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ, बी.एन. पवार, सरपंच शहाजी बाबर, उपसरपंच मंगल चव्हाण, ग्रामसेवक एस.डी. निकाळजे, तलाठी माधुरी चव्हाण, कृषी अधिकारी जयवंत लोखंडे, सुनील लोखंडे, पोपट बनसोडे आदी उपस्थित होते.

प्रा.बाबर म्हणाले, ‘गावातील ग्रामस्थांचे शारीरिक व मानसिक संतुलन आरोग्यदायी राखण्यासाठी व गावचे सौंदर्य सुशोभीत होण्यासाठी लोकसहभागातून आदर्शवत वृक्षारोपण उपक्रम घेणे गरजेचे आहे. वृक्षारोपण ही जरी काळाची गरज बनली असली, तरी निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे ही सर्वांनी जबाबदारी घेण्याचे आहे.’ प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व व गरज याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सर्व तरुणवर्ग, पर्यावरणप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे रावसाहेब बाबर यांनी सूत्रसंचालन केले. सागर बाबर यांनी आभार मानले.

040921\img20210903094142.jpg

वृक्षारोपणासाठी ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्वाचा:प्रा.विश्वंभर बाबर