शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

चाकोरी सोडलेल्यांना जनताच जागा दाखवते

By admin | Updated: November 25, 2015 00:34 IST

शरद पवार : आष्टा नगरपरिषदेच्या काकासाहेब शिंदे भाजी मार्केट, मच्छी मार्केटचे उद्घाटन

आष्टा : लोकांचा चिरकाल पाठिंबा गृहित धरू नका. चाकोरी सोडून गेल्यानंतर लोक नेत्यांना त्यांची जागा दाखवितात. लोकशाहीत जे सत्ता देतात, तेच सत्ता काढून घेतात. बांग्लादेश युद्धानंतर इंदिरा गांधींच्या कॉँग्रेसला प्रचंड मताधिक्याने विजय मिळाला; मात्र आणीबाणीनंतर त्याच जनतेने त्यांचा पराभव केला, असे प्रतिपादन खा. शरद पवार यांनी केले. आष्टा (ता. वाळवा) येथे आष्टा नगरपरिषदेच्या शतकोत्तर हीरकमहोत्सव सांगता समारंभानिमित्त पहिले थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष काकासाहेब शिंदे भाजी मार्केट व अद्ययावत मच्छी मार्केटच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. प्रभाकर घार्गे, आ. जयंतराव पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. प्रभाकर घार्गे, आ. सुमनताई पाटील. आ. मानसिंगभाऊ नाईक, माजी आ. विलासराव शिंदे, नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, जि. प. अध्यक्ष रेश्माक्का होर्तीकर, इलियास नायकवडी, अरूण लाड, विजय सगरे, विश्वासराव पाटील, उपनगराध्यक्षा सुनीता वारे आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, ऊस कारखादारीत केंद्राचे धोरण अडचणीचे ठरत आहे. साखरेचा दर २४१० पर्यंत खाली आला आहे. दिवाळीतही दर खाली घसरले. देशाला कर्तृत्ववान नेतृत्व लाभले तरी, साखर उद्योगाबाबत देशाची नीती ठीक नसल्याने साखरेचे दर घसरले आहेत. त्याची झळ शेतकऱ्यांना बसत आहे.हे चित्र बदलण्यासाठी शासनाने उपाययोजना केल्या पाहिजेत. निर्मितीची नवीन साधने तयार केली पाहिजेत. विलासराव शिंदे यांनी एकहाती सत्ता मिळवून शहरात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे. राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्थांना मदत क रीत नसल्याने त्याचा विकासावर परिणाम होत आहे. त्याचा २ वर्षात परिणाम दिसेल. ५० वर्षांचा विकास करण्याच्या दूरदृष्टीचा अभाव जाणवत आहे. जिल्हा, राज्य, देश बदलण्यासाठी शेतीबरोबरच शिक्षण व अन्य क्षेत्रात कर्तृत्व दाखविणारी पिढी निर्माण केली पाहिजे, असेही ते म्हणाले. आ. जयंतराव पाटील म्हणाले, आष्टा पालिकेने राज्यातील सर्व विकास योजना राबविल्या आहेत. ‘आदर्श शहर’ म्हणून आष्टा नावारूपाला आले आहे. पतंगराव कदम म्हणाले, वसंतरावदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण यांनी वाढविलेल्या सहकारी सस्था वाढतात की मोडतात, अशी स्थिती असताना, सावधपणे काम करण्याची गरज आहे. यासाठी आता शासनाने प्रयत्न करावेत. अण्णासाहेब डांगे म्हणाले, आष्टा पालिकेने १६१ वर्षात उत्कृष्टपणे काम केले आहे. विकास मंदिर त्यांनी उभारले आहे. डांगे शिक्षण संकुल आष्ट्याच्या वैभवात भर घालेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.विलासराव शिंदे म्हणाले की, आष्टा शहर लवकरच राज्यातील पहिले शौचालययुक्त शहर होईल. आष्टा नगरपालिकेला चांगला निधी मिळाला आहे. यावरुन यापुढेही विकास करण्यात येईल. मंगलादेवी शिंदे म्हणाल्या की, खा. शरद पवार यांच्यामुळेच महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळाले आहे. ते विधानसभा, विधानपरिषदेतही मिळावे. मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्षा सौ. मंगलादेवी शिंदे, झुंझारराव शिंदे, सौ. रंजना शेळके, सौ. झिनत आत्तार, सुखदेव भंडारे, रमेश जन्नर, अरूण, मोटकट्टे, आक्काताई कोळी, सज्जन मोहिते, अभियंता चंद्रकांत पाटील, बाजीराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.माजी खा. निवेदिता माने, प्रणव चौगले, मयूर धनवडे, विजय मोरे, के. टी. वग्याणी, बाळासाहेब वाडकर, अनिल बोडे, सुनील बोडे, जमिलाबी लतीफ, प्रकाश रुकडे, अर्जुन माने, माणिक शेळके, नंदकुमार बसुगडे, प्रकाश मिरजकर, शेरनवाब देवळे, इंद्रजित चव्हाण, बी. एस. संकपाळ, प्रभाकर जाधव, उदय कुशिरे, सतीश माळी, झुंझारराव पाटील, वैभव शिंदे, अशोक पाटील, शैलेश सावंत उपस्थित होते. (वार्ताहर)सहकार चळवळ टिकवण्याचे आव्हान पतंगराव कदम म्हणाले, वसंतरावदादा पाटील, शरद पवार, शंकरराव चव्हाण यांनी वाढविलेल्या सहकारी सस्था वाढतात की मोडतात, अशी स्थिती असताना, सावधपणे काम करण्याची गरज आहे. राज्यात सहकारी संस्थांना घरघर लागली आहे. सहकार चळवळीत राजकारण शिरले आहे. याचा परिणाम गंभीर होत आहे. सहकार चळवळ टिकवण्याचे मोठे आव्हान आता सर्वासमोर उभे राहिले आहे. ते पेलण्याची आज गरज आहे. सहकार चळवळ टिकलीतरच ग्रामीण भागाचा विकास शक्य आहे.