शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

वाईतील जलतरण तलावाच्या संरक्षक भिंती झुडपांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST

वाई : अनेक अडचणींतून मार्ग काढत वाई नगरपालिकेचा जलतरण तलाव पूर्ण झाल्याने वाईकरांना पोहण्यासाठी एक पर्वणी निर्माण झाली; परंतु ...

वाई : अनेक अडचणींतून मार्ग काढत वाई नगरपालिकेचा जलतरण तलाव पूर्ण झाल्याने वाईकरांना पोहण्यासाठी एक पर्वणी निर्माण झाली; परंतु या जलतरण तलावाला समस्यांचे ग्रहण लागले आहे. तलावाच्या भिंतींवर झाडा-झुडपांचे साम्राज्य वाढले असून, या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

राज्यातील ३८४ नगरपालिकांपैकी वाई नगरपालिकेकडून सेमी ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव तयार करण्यात आला. कोरोना काळात हा जलतरण तलाव बंद राहिल्याने तो पुन्हा सुरू करताना अनेक समस्या निर्माण झाल्या. जलतरण तलावाच्या संरक्षक भिंतीवर विविध प्रकारच्या झाडा-झुडपांचे साम्राज्य वाढल्याने संपूर्ण तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या झुडपांमुळे भिंतीला तडे जाऊन भेगा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शहरात इतर कुठेही पोहण्याची व्यवस्था नसल्याने सर्व मदार याच जलतरण तलावावर आहे. कृष्णेच्या पाण्यात पूर्वी पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असे. आता या नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे त्यात पोहण्याचे धाडस कोणी करत नाही. त्यामुळे प्रशासनाने भिंतीवर वाढलेली झाडे त्वरित हटवून जलतरण तलावाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

(कोट)

जलतरण तलाव वाई शहराच्या वैभवात भर घालत आहे. प्रशासनाकडून तलाव व संरक्षक भिंतीची पाहणी करण्यात आली आहे. दुरुस्ती व स्वच्छतेबाबत पालिकेकडून योग्य ते नियोजन केले जाईल.

- विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी

फोटो : १२ वाई

वाई येथील जलतरण तलावाच्या भिंतीवर झाडा-झुडपांचे साम्राज्य वाढले असून, भिंतीला धोका निर्माण झाला आहे. (छाया : पांडुरंग भिलारे)