शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाईतील जलतरण तलावाच्या संरक्षक भिंती झुडपांच्या गर्तेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST

वाई : अनेक अडचणींतून मार्ग काढत वाई नगरपालिकेचा जलतरण तलाव पूर्ण झाल्याने वाईकरांना पोहण्यासाठी एक पर्वणी निर्माण झाली; परंतु ...

वाई : अनेक अडचणींतून मार्ग काढत वाई नगरपालिकेचा जलतरण तलाव पूर्ण झाल्याने वाईकरांना पोहण्यासाठी एक पर्वणी निर्माण झाली; परंतु या जलतरण तलावाला समस्यांचे ग्रहण लागले आहे. तलावाच्या भिंतींवर झाडा-झुडपांचे साम्राज्य वाढले असून, या तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

राज्यातील ३८४ नगरपालिकांपैकी वाई नगरपालिकेकडून सेमी ऑलिंपिक दर्जाचा जलतरण तलाव तयार करण्यात आला. कोरोना काळात हा जलतरण तलाव बंद राहिल्याने तो पुन्हा सुरू करताना अनेक समस्या निर्माण झाल्या. जलतरण तलावाच्या संरक्षक भिंतीवर विविध प्रकारच्या झाडा-झुडपांचे साम्राज्य वाढल्याने संपूर्ण तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या झुडपांमुळे भिंतीला तडे जाऊन भेगा पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शहरात इतर कुठेही पोहण्याची व्यवस्था नसल्याने सर्व मदार याच जलतरण तलावावर आहे. कृष्णेच्या पाण्यात पूर्वी पोहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असे. आता या नदीत सांडपाणी सोडण्यात येत असल्याने पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे त्यात पोहण्याचे धाडस कोणी करत नाही. त्यामुळे प्रशासनाने भिंतीवर वाढलेली झाडे त्वरित हटवून जलतरण तलावाचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

(कोट)

जलतरण तलाव वाई शहराच्या वैभवात भर घालत आहे. प्रशासनाकडून तलाव व संरक्षक भिंतीची पाहणी करण्यात आली आहे. दुरुस्ती व स्वच्छतेबाबत पालिकेकडून योग्य ते नियोजन केले जाईल.

- विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी

फोटो : १२ वाई

वाई येथील जलतरण तलावाच्या भिंतीवर झाडा-झुडपांचे साम्राज्य वाढले असून, भिंतीला धोका निर्माण झाला आहे. (छाया : पांडुरंग भिलारे)