शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

जंगलांचे रक्षण प्रत्येकाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST

रामापूर दि पाटण तालुका विविध जैवविविधतेने नटलेला आहे. तालुक्यात विपुल प्रमाणात वनसंपदा असून, काही समाजकंटक गैरसमजुतीतून वणवे लावत आहेत. ...

रामापूर दि

पाटण तालुका विविध जैवविविधतेने नटलेला आहे. तालुक्यात विपुल प्रमाणात वनसंपदा असून, काही समाजकंटक गैरसमजुतीतून वणवे लावत आहेत. त्यामुळे जंगले जळून खाक होत आहेत. दुर्मिळ वनौषधी वनस्पती नष्ट होत आहेत. सुक्ष्म जीव, पशु, पक्षी यांचा बळी जात आहेत. वणव्यापासून जंगलाचे रक्षण करणे व जंगलांची काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पाटणचे वनक्षेत्रपाल विलास काळे यांनी केले.

न्यू इंग्लिश स्कूल, बेलवडे खुर्द (ता. पाटण) विद्यालयात आयोजित वन वणवा विरोधी जनजागृती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वनपाल एस. बी. भाट, आनंदा जाधव, वनरक्षक वर्षाराणी चौरे, सावंता लोखंडे उपस्थित होते.

मुख्याध्यापक अनिल मोहिते म्हणाले, शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे महत्त्व जाणले पाहिजे. अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अन्नसाखळीतील प्रत्येक प्राण्याचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. निसर्ग ही एक खूप मोठी शक्ती आहे. निसर्ग आपणास भरभरून देत असतो. मानवाकडून मात्र निसर्गाला विविधप्रकारे ओरबडण्याचे काम सुरू आहे. पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती यांना बाधा येईल, असे कोणतेही कृत्य आपल्या हातून घडू नये. पर्यावरण रक्षण ही सर्वांची जबाबदारी आहे.

यावेळी विद्यार्थ्यांना वन वणवा विरोधी शपथ देण्यात आली. वणवा लावणाऱ्याला वन कायद्यानुसार दोन वर्षे कारावास व पाच हजार रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. वणवा लागल्यास वन विभागास कळवा तसेच तो विझवण्यासाठी सहकार्य करा, असे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले.

प्रास्ताविक व स्वागत शंकर सुतार यांनी केले. आभार जागृती कासार यांनी मानले.

बोलताना, विलास काळे, अनिल मोहिते आदी.

फोटो; बेलवडे खुर्द (ता. पाटण) येथील कार्यक्रमात बोलताना वनक्षेत्रपाल विलास काळे, व्यासपीठावर मान्यवर.