शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या मूर्तींचे विसर्जन टाळून पर्यावरणाचे रक्षण

By admin | Updated: September 30, 2015 00:02 IST

प्रशासनाकडून कौतुक : सातारा शहरातील १९ मंडळांचा पुढाकार

दत्ता यादव- सातारा  -शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे महाकाय गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. मात्र, पर्यावरणाची हानी होत असल्याबाबत ‘लोकमत’ने जनजागृती केल्याने शहरातील तब्बल १९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा मोठ्या मूर्तीचे विसर्जन न करता छोट्या मूर्तींचे विसर्जन केले. यंदा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वत:हून पुढाकार घेतल्याने प्रशासनाकडूनही त्यांचे कौतुक होत आहे.हल्ली गणेशोत्सव म्हटलं की भरमसाठ खर्च. जस-जशी महागाई भडकत गेली तस-तसा गणेशोत्सवाचा खर्चही लाखांच्या घरात पोहोचला. मोठ्या गणेशमूर्तीची किंमत २५ हजारांपासून ते सव्वा लाखांपर्यंत असते. त्यामुळे दरवर्षी मंडळातील कार्यकर्ते वर्गणी अथवा स्वच्छेने पैसे काढून मूर्तीची प्रतिष्ठापना करत असतात. त्यामुळे इथून पुढे दरवर्षी एकच मूर्ती कायम ठेवली तर खर्चही वाचेल; शिवाय पर्यावरणाचे रक्षणही होईल, अशी दुहेरी भूमिका घेऊन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदा इतर मंडळांना आर्दश घालून दिलाय.गेल्या वर्षी शहरातील केवळ सहा मंडळांनी मूर्ती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यंदा ‘लोकमत’ने राबविलेल्या चळवळीमुळे या उपक्रमाला चांगली बळकटी आली. त्यामुळे पाहता-पाहता १९ गणेश मंडळांनी मूर्ती विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक गणेशोत्सव मंडळ (पोवई नाका), जयहिंद गणेशोत्सव मंडळ (शनिवार पेठ), एकता गणेश उत्सव मंडळ (गुरवार पेठ), वटसिद्धी गणेश मंडळ (एसटी कॉलनी, सातारा) यासह अन्य मंडळांचा त्यामध्ये समावेश आहे. मोठी मूर्ती ठेवायची कुठे, असा प्रश्न उपस्थित होत असला तरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खासगी जागेमध्ये अशा मूर्ती सुरक्षित ठेवल्या आहेत. मोठ्या मूर्ती झाकून त्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत.मोठ्या मूर्तींऐवजी लहान मूर्तीचे विसर्जन करून पर्यावरणाच्या दृष्टीनेही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विचार केलाय. काही मंडळांनी आदल्या दिवशी अचानक निर्णय घेऊन मोठ्या मूर्तीचे विसर्जन करायचे नाही, असा निर्णय घेतला. पोलिसांच्या रेकॉर्डवर शहरातील १९ मंडळांची नोंद असली तरी नोंद नसलेल्या अनेक मंडळांनी या वर्षी मोठ्या मूर्तींचे विसर्जन केले नाही. विसर्जन न करणाऱ्या मंडळांचा आकडा पुढील वर्षी यापेक्षाही वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.