शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

विदर्भातील वाघ सह्याद्रीत आणण्याचा प्रस्ताव : खामकर

By admin | Updated: April 23, 2016 00:42 IST

‘वाघ असणाऱ्या १३ देशांची नवी दिल्लीत व्याघ्र संवर्धन परिषद नुकतीच झाली.

कऱ्हाड : विदर्भातील जादा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेल्या कोयना, चांदोली व राधानगरी परिसरात सोडता येऊ शकतात का, यासाठीचा प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संचालकांना दिल्या आहेत. पुढील महिन्यात याबाबत नागपूर येथे वन विभागाच्या मुख्यालयात प्राथमिक बैठक होण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती वन्यजीव अभ्यासक नाना खामकर यांनी दिली.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने नवी दिल्लीतील जागतिक व्याघ्र संवर्धन परिषदेत झालेल्या चर्चेची माहिती खामकर यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. विभागीय वन (वन्यजीव) अधिकारी मिलिंद पंडितराव, एस. एल. झुरे, सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, व्ही. एस. थोरात, वनक्षेत्रपाल किरण कांबळे, मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे, डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचे तज्ज्ञ शैलेश माहुलीकर वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. खामकर म्हणाले, ‘विदर्भातील ताडोबा, पेंच व मेळघाट या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मनुष्य व वन्यजीव यांच्यातील संघर्ष वाढीस लागला आहे. यावर उपाय म्हणून वन्यजीवतज्ञांनी ज्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी अतिरिक्त वाघ सोडण्याची सूचना शासनाला दिली आहे. ‘वाघ असणाऱ्या १३ देशांची नवी दिल्लीत व्याघ्र संवर्धन परिषद नुकतीच झाली. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व वनमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत झाले. या परिषदेत मी व रोहन भाटे सहभागी झालो होतो. या परिषदेत २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पटीने वाढविण्याचा संकल्प करण्यात आला. त्या अनुषंगाने ज्या देशांमध्ये वाघ नामशेष होत चालले आहेत अथवा त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होत आहे, अशा देशांमध्ये वाघांचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरले. त्यासाठी भारत इतर देशांना सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले. व्हिएतनाम, कम्बोडिया व म्यानमार या देशांमध्ये वाघ झपाट्याने कमी होत आहेत. या देशांना भारताने सहकार्य करण्याचे ठरवले आहे.’ (प्रतिनिधी)