शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

मायणीत रुंदीकरणानंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST

मायणी : येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण झाले; मात्र या राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम ...

मायणी : येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण झाले; मात्र या राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेमध्ये वाहन पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे आहे, तसेच चांद नदीच्या काठावरून करण्यात आलेला बाह्यवळण मार्ग चांगल्या दर्जाचा होणे गरजेचे आहे.

जानेवारी २०२० मध्ये येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. दोन ते तीन महिन्यांमध्ये या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण करून देतो, असे आश्वासन संबंधित ठेकेदाराने अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिले होते. त्यामुळे मोठ्या उत्साहाने काही ग्रामस्थांनी वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बांधकाम स्वखर्चाने काढून घेतले.

गतवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत लाॅकडाऊन जाहीर केले. त्यामुळे या राज्यमार्गाचे काम बंद पडले. त्यानंतर गेल्या वर्ष-दीड वर्षापासून विविध कारणांमुळे मुख्य बाजारपेठेतील सुमारे तेराशे मीटर राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम सतत थांबत होते. आज दीड वर्षानंतर हळूहळू पूर्णत्वाकडे गेले आहे. राज्यमार्गाचे रुंदीकरण झाल्यास या भागात नित्यनेमाची असलेली वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, अशी अशा या मुख्य बाजारपेठेत असलेल्या व्यापाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना होती.

रुंदीकरणानंतरही मुख्य बाजारपेठेतील व्यापारी व स्थानिक रहिवाशांच्या आशेवर पाणी पडताना दिसत आहे. राज्य मार्गाचे रुंदीकरण होऊ नये, या ठिकाणची पूर्वीची वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम आहे. दिवसातून अनेकवेळा २० ते २५ मिनिटे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सतत वाहतूक कोंडी होत असल्याने मुख्य मार्गाकडेला असलेल्या व्यापाऱ्यांच्या व्यापारावरही परिणाम होत आहे.

(चौकट)

येथील चांद नदीच्या काठावरून लोकसहभागातून करण्यात आलेला बाह्यवळण रस्ता सतत विविध कारणांमुळे चर्चेचा विषय असतो. दगड-माती भरून कच्च्या स्वरूपात केलेला हा मार्ग उन्हाळ्यात वाहनांमुळे धुराचे लोट पसरत असल्याने स्थानिक रहिवासी यावरून वाहतूक करण्यास विरोध करतात, तर पावसाळ्यामध्ये चिखल-मातीचा रस्ता असल्याने वाहने रुतून बसतात. त्यामुळे वाहनचालक या भागातून वाहने घालण्यास टाळाटाळ करत असतात. त्यामुळे हा मार्ग चांगल्या दर्जाचा व लवकर होणे गरजेचे आहे.

३० मायणी वाहतूक कोंडी

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर मायणी मुख्य बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. (छाया : संदीप कुंभार)