शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मायणीत रुंदीकरणानंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST

मायणी : येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण झाले; मात्र या राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम ...

मायणी : येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण झाले; मात्र या राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेमध्ये वाहन पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे आहे, तसेच चांद नदीच्या काठावरून करण्यात आलेला बाह्यवळण मार्ग चांगल्या दर्जाचा होणे गरजेचे आहे.

जानेवारी २०२० मध्ये येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. दोन ते तीन महिन्यांमध्ये या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण करून देतो, असे आश्वासन संबंधित ठेकेदाराने अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिले होते. त्यामुळे मोठ्या उत्साहाने काही ग्रामस्थांनी वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बांधकाम स्वखर्चाने काढून घेतले.

गतवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत लाॅकडाऊन जाहीर केले. त्यामुळे या राज्यमार्गाचे काम बंद पडले. त्यानंतर गेल्या वर्ष-दीड वर्षापासून विविध कारणांमुळे मुख्य बाजारपेठेतील सुमारे तेराशे मीटर राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम सतत थांबत होते. आज दीड वर्षानंतर हळूहळू पूर्णत्वाकडे गेले आहे. राज्यमार्गाचे रुंदीकरण झाल्यास या भागात नित्यनेमाची असलेली वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, अशी अशा या मुख्य बाजारपेठेत असलेल्या व्यापाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना होती.

रुंदीकरणानंतरही मुख्य बाजारपेठेतील व्यापारी व स्थानिक रहिवाशांच्या आशेवर पाणी पडताना दिसत आहे. राज्य मार्गाचे रुंदीकरण होऊ नये, या ठिकाणची पूर्वीची वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम आहे. दिवसातून अनेकवेळा २० ते २५ मिनिटे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सतत वाहतूक कोंडी होत असल्याने मुख्य मार्गाकडेला असलेल्या व्यापाऱ्यांच्या व्यापारावरही परिणाम होत आहे.

(चौकट)

येथील चांद नदीच्या काठावरून लोकसहभागातून करण्यात आलेला बाह्यवळण रस्ता सतत विविध कारणांमुळे चर्चेचा विषय असतो. दगड-माती भरून कच्च्या स्वरूपात केलेला हा मार्ग उन्हाळ्यात वाहनांमुळे धुराचे लोट पसरत असल्याने स्थानिक रहिवासी यावरून वाहतूक करण्यास विरोध करतात, तर पावसाळ्यामध्ये चिखल-मातीचा रस्ता असल्याने वाहने रुतून बसतात. त्यामुळे वाहनचालक या भागातून वाहने घालण्यास टाळाटाळ करत असतात. त्यामुळे हा मार्ग चांगल्या दर्जाचा व लवकर होणे गरजेचे आहे.

३० मायणी वाहतूक कोंडी

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर मायणी मुख्य बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. (छाया : संदीप कुंभार)