शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

मायणीत रुंदीकरणानंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST

मायणी : येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण झाले; मात्र या राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम ...

मायणी : येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरण झाले; मात्र या राज्य मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम आहे. त्यामुळे मुख्य बाजारपेठेमध्ये वाहन पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे आहे, तसेच चांद नदीच्या काठावरून करण्यात आलेला बाह्यवळण मार्ग चांगल्या दर्जाचा होणे गरजेचे आहे.

जानेवारी २०२० मध्ये येथील मुख्य बाजारपेठेतून जाणाऱ्या मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. दोन ते तीन महिन्यांमध्ये या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम पूर्ण करून देतो, असे आश्वासन संबंधित ठेकेदाराने अधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिले होते. त्यामुळे मोठ्या उत्साहाने काही ग्रामस्थांनी वाहतुकीला अडथळा ठरत असलेले बांधकाम स्वखर्चाने काढून घेतले.

गतवर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत लाॅकडाऊन जाहीर केले. त्यामुळे या राज्यमार्गाचे काम बंद पडले. त्यानंतर गेल्या वर्ष-दीड वर्षापासून विविध कारणांमुळे मुख्य बाजारपेठेतील सुमारे तेराशे मीटर राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम सतत थांबत होते. आज दीड वर्षानंतर हळूहळू पूर्णत्वाकडे गेले आहे. राज्यमार्गाचे रुंदीकरण झाल्यास या भागात नित्यनेमाची असलेली वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, अशी अशा या मुख्य बाजारपेठेत असलेल्या व्यापाऱ्यांना व स्थानिक रहिवाशांना होती.

रुंदीकरणानंतरही मुख्य बाजारपेठेतील व्यापारी व स्थानिक रहिवाशांच्या आशेवर पाणी पडताना दिसत आहे. राज्य मार्गाचे रुंदीकरण होऊ नये, या ठिकाणची पूर्वीची वाहतूक कोंडीची समस्या आजही कायम आहे. दिवसातून अनेकवेळा २० ते २५ मिनिटे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सतत वाहतूक कोंडी होत असल्याने मुख्य मार्गाकडेला असलेल्या व्यापाऱ्यांच्या व्यापारावरही परिणाम होत आहे.

(चौकट)

येथील चांद नदीच्या काठावरून लोकसहभागातून करण्यात आलेला बाह्यवळण रस्ता सतत विविध कारणांमुळे चर्चेचा विषय असतो. दगड-माती भरून कच्च्या स्वरूपात केलेला हा मार्ग उन्हाळ्यात वाहनांमुळे धुराचे लोट पसरत असल्याने स्थानिक रहिवासी यावरून वाहतूक करण्यास विरोध करतात, तर पावसाळ्यामध्ये चिखल-मातीचा रस्ता असल्याने वाहने रुतून बसतात. त्यामुळे वाहनचालक या भागातून वाहने घालण्यास टाळाटाळ करत असतात. त्यामुळे हा मार्ग चांगल्या दर्जाचा व लवकर होणे गरजेचे आहे.

३० मायणी वाहतूक कोंडी

मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्गावर मायणी मुख्य बाजारपेठेत वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. (छाया : संदीप कुंभार)