शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

द्राक्षांवर भुरी, डाळिंबावर तेल्या रोगांचे संकट

By admin | Updated: January 9, 2015 00:01 IST

अवकाळीचे सावट : कातरखटावमधील बागायतदार अडचणीत

कातरखटाव : गेल्या महिन्यात गारपीट व अवकाळीतून शेतकरी सावरतो न सावरतो तोच पुन्हा नवीन वर्षाच्या आगमनालाच अवकाळी पावसाने व हवामान बदलामुळे द्राक्ष बागायतदारांपुढे मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ढगाळ हवामानामुळे द्राक्षांवर भुरी व दावण्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.गेली चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे सूर्यदर्शन तर होतच नाही. रात्री-अपरात्री पहाटे कधीही धुके पडत आहेत. अचानक पडणाऱ्या धुक्यामुळे पोटऱ्यात आलेल्या ज्वारीवर मावा, चिकटा पडला असून, ज्वारी पोटऱ्यातच राहणार, कणीस बाहेर पडणार नाही, या भीतीने शेतकरी चिंतेत आहे.खराब हवामानामुळे द्राक्षांवरही भुरी रोगाचे संकट निर्माण झाले आहे. द्राक्षांच्या घडामध्ये आळी होऊन घड खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कीड लागलेला घड काढून फेकून द्यावा लागत आहे. दिवसातून दोनवेळा औषध मारून शेतकरी बेजार होत आहे.याबरोबरच द्राक्षांच्या घडावर पाणी साचून राहत असल्यामुळे मध्यम स्थितीत आलेल्या द्राक्षांचे मणी काळे पडून गळून गेल्यामुळे नुकसान होत आहे.एकंदरीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे अवकाळी पाऊस पडत असून, आणखी काही दिवस ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. गारपीट व अवकाळीच्या कचाट्यातून शेतकरी सावरत असताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर व फळ बागायतदारवर संकट ओढवल्यामुळे बळीराजा पुरता मेटाकुटीस आला आहे. (वार्ताहर)डाळिंबालाही फटकादुसरीकडे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा जास्त फटका बसला असून, डाळिंब बागेवर तेल्या, कुडबा, मररोग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हजारो रुपये औषधासाठी खर्च करूनही अवकाळीने आपली कळा दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्या झळा पोचत आहेत व अवकाळी पावसाने चांगलीच झोप उडवली आहे.अजून पाच ते सहा दिवस असेच ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता आहे. ज्वारी, हरभरा, द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येणार आहे. बागायतदारांनी व शेतकऱ्यांनी औषध फवारणी करून पिके वाचवावीत.-यू. एम. मिकुटे, कृषी अधिकारी