शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

खासगी शाळांनी आतातरी नैतिकता दाखवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:41 IST

सातारा : कोरोना काळात शाळा बंद असून, वर्ग हे ऑनलाईन पध्दतीने घेतले जात आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक संकटाचाही सामना ...

सातारा : कोरोना काळात शाळा बंद असून, वर्ग हे ऑनलाईन पध्दतीने घेतले जात आहेत. लॉकडाऊनमुळे अनेकांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागल्याने संवेदनशीलतेने विचार करून शैक्षणिक संस्थांनी शुल्क कमी करावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. खासगी शाळांनी आतातरी नैतिकता दाखवावी, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

मुलांना उत्तम शिक्षण मिळावे आणि ते देण्यासाठी आपली आर्थिक कुवत या दोन्हीची सांगड घालून पालक विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश घेतात. मात्र, जागतिक महामारीत एकीकडे शाळा ऑनलाईन झाल्या आणि दुसरीकडे पालक आर्थिक संकटात सापडले. याचा सारासार विचार करून सर्वोच्च न्यायालयाने शाळांनी नैतिकता दाखवून पन्नास टक्के फी घेण्याचा आदेश दिल्याने पालक सुखावले आहेत.

जी सर्व्हिस दिलीच नाही, त्याचेसुद्धा मूल्य शाळा घेत असून, फक्त फीच्या पैशासाठी हपापलेल्या शाळा (काही चांगल्या शाळा अपवाद सोडून) पालकांना त्रास देत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडवत आहेत, पालकांच्या उरावर बसून त्यांना अपमानित करून, लज्जित करून पैसे उकळत आहेत. त्यात शाळांचे जणू हस्तक असल्यासारखे पीटीए मेंबर्ससुद्धा शाळांचे हित पाहत असून, शाळा प्रशासन म्हणेल ती पूर्वदिशा असे निर्लज्जपणे आणि कोडगेपणाने वागत असल्याचे चित्र साताऱ्यात गेल्या तीन महिन्यांपासून पाहायला मिळत आहे.

सातारा जिल्हा पालक संघाने सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेचे स्वागत करताना साताऱ्यातील खासगी शाळांनी आता किमान सर्वोच्च न्यायालयाचा तरी आदर ठेवत जेवढी सर्व्हिस तेवढीच फी हे धोरण स्वीकारून सरसकट एकूण फीमध्ये ५० टक्के सवलत जाहीर करून पालकांना शाळेच्या नैतिकवृत्तीने आश्वासित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चौकट :

शाळा नफा कमविण्याचा धंदा नाही

विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रुपवर फीसाठी अपमानित करणे, पालकांना फोन करून फी भरण्यासाठी तगादा लावणे असे प्रकार करून शाळांनी अन्यायाची परिसीमा टिपेला पोहोचवली. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने शाळा या शिक्षण देण्यासाठी आहेत, नफा मिळविण्यासाठी नाहीत, असे स्पष्ट केले. खासगी शाळांनी जी सेवा दिली नाही, तिचे मूल्य आकारू नये, असे ठणकावून सांगितले आहे.

कोट :

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाने पालकांना निश्चितच बळ मिळाले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखून शाळांनी पालकांकडून सेवेइतके शुल्क घेणे अपेक्षित आहे. साताऱ्यातील काही शाळा यासाठी तयार आहेत, पण काहींवर कायद्याचा दंडुका उगारणं अपेक्षित आहे.

- रितेश रावखंडे, अध्यक्ष, सातारा जिल्हा पालक संघ

\\\\\\\