शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

बुलेट ट्रेनला विरोध राहणारच--पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:53 IST

कºहाड : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले

ठळक मुद्देशेतकºयांना सरकारने रामभरोसे सोडलेया नोटाबंदीचा परिणाम युवक, लोकांवर झाला राज्यातल्या रेल्वेच्या दुरुस्तीसाठी येणारा एक हजार कोटी खर्च करण्याऐवजी

कºहाड : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात दहा लाख शेतकºयांनाच कर्जमाफी दिली जात आहे. भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकºयांना रामभरोसे सोडले आहे. त्यामुळे शेतकरी संतापलेला आहे,’ असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

कºहाड येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, मलकापूर उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, एनएसयुआयचे शिवराज मोरे उपस्थित होते.पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, भाजप सरकारने पुकारलेल्या शेतकºयांच्या कर्जमाफीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. हे आम्ही सांगत आलो आहे.

शेतकरी प्रचंड संतापलेला आहे. यामागचे कारण म्हणजे कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी सरकारने लावलेल्या अटी व शर्ती हे आहे. से करून सरकारने एकप्रकारे शेतकºयांवर अविश्वासच दाखवलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षात शेतकºयांचे शेतीचे उत्पन्न दुप्पट करू, असे आश्वासन दिले होते. ते आता पोकळ ठरले आहे. सुरुवातीला नोटाबंदी करीत देशातील काळा पैशाचा मुद्दा समोर आणला. आता कॅशलेसचे कारण सांगितले जात आहे. मात्र, या नोटाबंदीचा परिणाम युवक, लोकांवर झाला आहे. आम्ही भाजपला मते देऊन चूक केली अशा प्रतिक्रिया आता जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत. राज्यातल्या रेल्वेच्या दुरुस्तीसाठी येणारा एक हजार कोटी खर्च करण्याऐवजी बुलेट ट्रेन कशासाठी,’ असा सवाल उपस्थित करीत या बुलेट ट्रेनला आमचा कायम विरोध आहे.’

बुलेट ट्रेनबाबत सांगताना चव्हाण म्हणाले, ‘भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी मोठी बुलेट ट्रेनची परकीय देशास आॅर्डर देण्यात आली आहे. रेल्वेच्या दुरुस्तीसाठी एक लाख कोटी खर्च येत आहे. तो करण्याऐवजी बुलेट ट्रेनसाठी पैसे खर्च केले जात आहेत.’भाजपने राणेंचा अपमान केला..एकेकाळी काँगे्रसमध्ये असलेले नारायण राणे हे आता पक्षाला सोडून गेले आहेत. याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता. ‘काँगे्रस सोडल्यानंतर नारायण राणे भाजपाचे अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्ली येथे गेले. त्यावेळी त्यांना अनेक मार्गातून अपमानीत करण्यात आले. ते करायला नको हवे होते. आज नारायण राणे पक्षात नाहीत, याचे दु:ख होत आहे.नोटाबंदीमुळे व्यापारी संतप्तनोटाबंदीचा सर्वाधिक फटका व्यापारी वर्गाला झाला आहे. याबाबत त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. औरंगाबाद व जालना येथील व्यापारी महासंघाच्या बैठकीस गेलो असताना तेथे भाजपच्या नोटाबंदी निर्णयाविरोधात व्यापाºयांमध्ये आक्रोश पाहायला मिळाला, अशी माहिती पत्रकार परिषदेत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

 

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीPoliticsराजकारण