शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणचा डोंगरी भाग ओलिताखाली आणणार-पृथ्वीराज चव्हाण :

By admin | Updated: July 28, 2014 23:15 IST

सवादेतील ग्रामस्थांशी साधला संवाद

उंडाळे : ‘कऱ्हाड दक्षिण मतदार संघाने माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे. माझा परिचय नसतानादेखील मला राजकारणात महत्त्वाची मदत केली आहे. त्या उपकाराची मी निश्चित परतफेड करीन. त्याचाच एक भाग म्हणून चांदोली धरणातून येवती-म्हासोली मार्गे पाणी आणण्याबाबत आश्वासक मार्ग निघाल्यास कऱ्हाड दक्षिणचा डोंगराळ भाग ओलिताखाली आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.सवादे येथील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच येळगाव जिल्हा परिषद मतदार संघातील गावांचा थेट संवाद-चर्चा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार आनंदराव पाटील, अमदार जयकुमार गोरे, मदनराव मोहिते, जयवंत जगताप, मनोहर शिंदे, बाळासाहेब थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘ग्रामीण भागाचा विकास करताना सहकारी क्षेत्राची बळकटी करणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर सर्व पायभूत सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे़ महाराष्ट्राचा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यात प्रथम क्रमांक लागतो़ राज्यातील शेतकऱ्यांसाठी १२ हजार कोटींची मदत दिली़’ वनमंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री सतेज पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. ए. जी. थोरात यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच सचिन थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमास सरपंच शिवाजी थोरात, पै. नाना पाटील, अशोक भावके, नितीन थोरात, प्रशांत थोरात, सदाशिव शेवाळे, भास्कर शेवाळे, यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदनदादांची फटकेबाजीज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी कार्यक्रमामध्ये अपेक्षेप्रमाणे राजकीय फटकेबाजी केली. कऱ्हाड दक्षिणमध्ये विकासाचा डोंगर उभारला असे म्हणणाऱ्या उंडाळकरांचा नामोल्लेख न करता ‘तुमचे आकडे लाखांत होते, मुख्यमंत्री बाबांचे कोटीत आहेत,’ असा चिमटा त्यांनी घेतला. तसेच पारतंत्र्यात असणाऱ्या उंडाळे परिसरातील लोकांना बाबांनी भयमुक्त केले आहे, असे सांगून दक्षिणच्या निवडणुकीतील अनिश्चितीचे सावट दूर करण्याचा प्रयत्न केला. भांडणे लावणाऱ्यांचे दुकान बंदकऱ्हाड तालुक्यात आपल्या महाआघाडीच चांगले चालले आहे; पण ते अनेकांना खुपत असल्यामुळे काहीजण भांडण लावण्याचं दुकान सुरू करीत आहेत. आनंदराव पाटीलच आमदार का? असा पोटशूळ काहीना उठला असून भांडणे लावणाऱ्यांचे उद्योग करणाऱ्यांचे दुकान आता जनताच बंद करेल, असा विश्वास मदनराव मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला. ४५ गावांतील ग्रामस्थांसाठी चार तासथेट संवाद कार्यक्रमात येळगाव, उंडाळे, सवादे परिसरातील सुमारे ४५ गावांतील ग्रामस्थांशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला. या भागात आजपर्यंत काय झाले, यापेक्षा गेल्या साडेतीन वर्षांत माझ्यामुळे काय झाले, याची माहिती घ्यायला अन् तुमच्या अपेक्षा काय आहेत, हे जाणून घ्यायला आलो आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या आटोपशीर भाषणात सांगून जाहीर कार्यक्रम थोडक्यात आटोपता घेतला आणि रात्री ९.१५ पर्यंत प्रत्येक गावातील शिष्टमंडळाला स्वतंत्र भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.