शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
3
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
4
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
5
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
6
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...
7
'जिओ माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका होता'; अंबानींनी का घेतली अब्जावधींची रिस्क? वाचा Inside Story!
8
'तुमच्या मदतीची गरज नाही...', पुतिन यांनी काय ऑफर दिली? डोनाल्ड ट्रम्प यांचा स्पष्ट नकार
9
ब्रेझाचे इंजिन, नवे नवे नाव...! स्पेसिअस केबिनची नवी मारुती SUV कार येतेय...
10
Jalgaon Teacher Suicide: खळबळजनक! जळगाव येथील एका शिक्षकाची शाळेच्या वर्गातच आत्महत्या
11
CSK स्टार मुरली विजयी दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीला करतोय डेट? Viral Photo मुळे चर्चांना उधाण
12
Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!
13
पाकिस्तान तयार करतंय अमेरिकेपर्यंत मारा करणारं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट  
14
ब्रिटिश नेव्हीचे फायटर जेट अजूनही केरळमध्येच! घरवापसीसाठी का लागतोय इतका वेळ?
15
China Rare Earth Magnet: चीननं ठेंगा दाखवल्यानंतर सरकारला आली जाग; आता देशातच होणार रेअर अर्थ मॅग्नेटचं उत्पादन
16
स्लिपमध्ये अनुभवाची कमी! ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे टीम इंडियावर आली लाजिरवाणी वेळ
17
Viral News: काहीही न सांगता कर्मचाऱ्याने सोडला जॉब; एचआर झाली नाराज, लिंक्डइनवर केली 'अशी' पोस्ट!
18
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी इस्राइलमध्ये हाहाकार; ३० हजारांहून अधिक घरे झाली उद्ध्वस्त!
19
Ax-4 Mission: अवकाश भरारी घेण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांनी ऐकलं हृतिक रोशनचं गाणं, नेमकं काय आहे कनेक्शन?
20
एमबीए, नोकरी, मग संन्यास... पण, नशिबाने पुन्हा आणले संसारात; तरुणाने उभं केलं १२५ कोटींचं साम्राज्य!

दक्षिणचा डोंगरी भाग ओलिताखाली आणणार-पृथ्वीराज चव्हाण :

By admin | Updated: July 28, 2014 23:15 IST

सवादेतील ग्रामस्थांशी साधला संवाद

उंडाळे : ‘कऱ्हाड दक्षिण मतदार संघाने माझ्यावर नेहमीच प्रेम केले आहे. माझा परिचय नसतानादेखील मला राजकारणात महत्त्वाची मदत केली आहे. त्या उपकाराची मी निश्चित परतफेड करीन. त्याचाच एक भाग म्हणून चांदोली धरणातून येवती-म्हासोली मार्गे पाणी आणण्याबाबत आश्वासक मार्ग निघाल्यास कऱ्हाड दक्षिणचा डोंगराळ भाग ओलिताखाली आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.सवादे येथील विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच येळगाव जिल्हा परिषद मतदार संघातील गावांचा थेट संवाद-चर्चा कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी वनमंत्री पतंगराव कदम, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार आनंदराव पाटील, अमदार जयकुमार गोरे, मदनराव मोहिते, जयवंत जगताप, मनोहर शिंदे, बाळासाहेब थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘ग्रामीण भागाचा विकास करताना सहकारी क्षेत्राची बळकटी करणे महत्त्वाचे आहे. त्याच बरोबर सर्व पायभूत सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे़ महाराष्ट्राचा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यात प्रथम क्रमांक लागतो़ राज्यातील शेतकऱ्यांसाठी १२ हजार कोटींची मदत दिली़’ वनमंत्री पतंगराव कदम, गृहमंत्री सतेज पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रा. ए. जी. थोरात यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच सचिन थोरात यांनी आभार मानले. कार्यक्रमास सरपंच शिवाजी थोरात, पै. नाना पाटील, अशोक भावके, नितीन थोरात, प्रशांत थोरात, सदाशिव शेवाळे, भास्कर शेवाळे, यांच्यासह विविध गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)मदनदादांची फटकेबाजीज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी कार्यक्रमामध्ये अपेक्षेप्रमाणे राजकीय फटकेबाजी केली. कऱ्हाड दक्षिणमध्ये विकासाचा डोंगर उभारला असे म्हणणाऱ्या उंडाळकरांचा नामोल्लेख न करता ‘तुमचे आकडे लाखांत होते, मुख्यमंत्री बाबांचे कोटीत आहेत,’ असा चिमटा त्यांनी घेतला. तसेच पारतंत्र्यात असणाऱ्या उंडाळे परिसरातील लोकांना बाबांनी भयमुक्त केले आहे, असे सांगून दक्षिणच्या निवडणुकीतील अनिश्चितीचे सावट दूर करण्याचा प्रयत्न केला. भांडणे लावणाऱ्यांचे दुकान बंदकऱ्हाड तालुक्यात आपल्या महाआघाडीच चांगले चालले आहे; पण ते अनेकांना खुपत असल्यामुळे काहीजण भांडण लावण्याचं दुकान सुरू करीत आहेत. आनंदराव पाटीलच आमदार का? असा पोटशूळ काहीना उठला असून भांडणे लावणाऱ्यांचे उद्योग करणाऱ्यांचे दुकान आता जनताच बंद करेल, असा विश्वास मदनराव मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला. ४५ गावांतील ग्रामस्थांसाठी चार तासथेट संवाद कार्यक्रमात येळगाव, उंडाळे, सवादे परिसरातील सुमारे ४५ गावांतील ग्रामस्थांशी मुख्यमंत्र्यांनी थेट संवाद साधला. या भागात आजपर्यंत काय झाले, यापेक्षा गेल्या साडेतीन वर्षांत माझ्यामुळे काय झाले, याची माहिती घ्यायला अन् तुमच्या अपेक्षा काय आहेत, हे जाणून घ्यायला आलो आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या आटोपशीर भाषणात सांगून जाहीर कार्यक्रम थोडक्यात आटोपता घेतला आणि रात्री ९.१५ पर्यंत प्रत्येक गावातील शिष्टमंडळाला स्वतंत्र भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.