शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

‘कॉँग्रेसमुक्त महाराष्ट्रा’चे श्रेय पृथ्वीराज चव्हाणांनाच

By admin | Updated: November 14, 2014 23:16 IST

विलासराव उंडाळकरांचा घणाघात : खून खटल्यात गोवणाऱ्यांना सोडणार नाही

सातारा : ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी जवळच्या सहकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी दिल्लीत जाऊन कहाण्या रंगविल्या. स्वत: क्लिन आहे, असं भासवत त्यांनी विधानसभा निवडणुकीत काँगे्रस क्लिन केली. महाराष्ट्राला काँगे्रसमुक्त केले,’ अशी उपहासात्मक टीका माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेमध्ये केली. ‘राजकीय सूडबुद्धीतून विधी व न्याय खात्याचा गैरवापर केला गेला. पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत:च्या मर्जीतील अधिकारी साताऱ्यात आणले. सरकारी अधिकाऱ्यांचा वापर खासगी कामांसाठी झाला. खाकी वर्दीवाल्यांनाही त्यामुळे नशा चढली. माझ्या मुलाला खून खटल्यात गोवण्यात आले. मी स्वत: व माझ्या पुतण्यालाही आरोपी करण्याचा प्रयत्न केला गेला, असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये १0 ते १२ मुख्यमंत्री मी जवळून पाहिले. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या इतका कोणत्याही राज्यकर्त्याने शासकीय यंत्रणेचा गैरवापर केलेला नाही.माझी राजकीय कादकिर्द उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या एकालाही मी सोडणार नाही,’ असा इशाराही उंडाळकरांनी या पत्रकार परिषदेत बोलताना दिला. ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी कऱ्हाडकरांची फसवणूक केली,’ असे सांगताना उंडाळकर म्हणाले, ‘एका समाजाला देशातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ बांधून देण्याचे खोटे आश्वासन दिले. कऱ्हाडकरांना १८00 कोटींच्या विकासकामांचं आमिष दाखविलं. याचे श्रेय घेण्यासाठी जागोजागी फ्लेक्स लावले; पण यातलं काहीच होणार नाही. वास्तविक, काँगे्रसने सर्व अधिकार त्यांना दिले होते. खरेतर, चांगलं काम करून दाखविण्याची संधी त्यांना होती.’ (प्रतिनिधी)कऱ्हाडात कॉँग्रेस-राष्ट्रवादीची छुपी युती !‘पी. डी. पाटलांशी हाडवैर धरणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या वारसांशी मात्र तह केला होता. मी उत्तरेत येत नाही, तुम्ही दक्षिणेत येऊ नका, असे त्यांनी ठरविले होते, असा गौप्यस्फोटही उंडाळकरांनी केला. दरम्यान, ‘राष्ट्रवादीची मदत तुम्हाला झाली का?’ या प्रश्नाचे उत्तर देताना उंडाळकरांनी साफ नकार देत, राज्यात काडीमोड घेतलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने कऱ्हाडमध्ये छुपी युती केली, असेही त्यांनी सांगितले. भविष्यातील वाटचालीबाबत मात्र अद्याप निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट करत ‘इथून पुढे नेहमी भेटत राहू,’ असंही त्यांनी पत्रकारांना सांगितलं. ...प्रसंगी न्यायालयाची पायरी चढूमुलांना शाळेतून बाहेर काढल्यानंतर संतप्त पालक जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यास गेले होते. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांनी ‘मुलांना जिल्हा परिषद शाळेत घाला. आता प्रवेश देण्याची सोय करतो,’ असे सांगितले होते. पण, एकाही पालकाने त्यादृष्टीने विचार केलेला नाही. यासंदर्भात पालक एकत्र येऊ लागले असून, न्यायालयाचा दरवाजा ठोठावयाचा का? यासंदर्भात तयारीही सुरू आहे. दरम्यान, पालकप्रतिनिधींची बैठक घेऊन शानभाग शाळा ही कशी निर्दोष आहे. हे शाळा व्यवस्थापनाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.