शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

साताऱ्याच्या पत्रप्रपंचाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

By admin | Updated: March 16, 2017 23:30 IST

पाच लाख पत्र : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी ‘मसाप’चे विनोद कुलकर्णी यांच्या प्रयत्नांना यश

सातारा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या वतीने महाराष्ट्रातून ५ लाख पत्रे पाठविण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्रे पाठविली होती. ‘मसाप’च्या पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात राबविलेल्या या उपक्रमाची दखल दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने घेतली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, याबाबतचा अहवाल साहित्य अकादमीने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवून दोन वर्षे झाली. फक्त पंतप्रधान मोदी यांच्या सहीसाठी हा निर्णय राहिला आहे. तो त्यांनी त्वरित घ्यावा, यासाठी मसाप, पुणेच्या वतीने महाराष्ट्रातून ५ लाख विनंती पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठविण्याचा संकल्प केला होता. सातारा जिल्ह्यातून १ लाख पत्रे पाठवून खारीचा वाटा उचलला होता. मसाप शाहूपुरी शाखेच्या वतीने पाठवण्यात येणाऱ्या पत्र उपक्रमाचा प्रारंभ सातारा शहर पोस्ट कार्यालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पत्रपेटीत पत्र टाकून झाला. यावेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, किशोर बेडकिहाळ, मसाप, पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी, डॉ. उमेश करंबळेकर, शाहूपुरी शाखेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. मराठी भाषा १० कोटी लोकांची भाषा असून, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. पत्र पाठवण्याच्या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेतला होता. यासाठी ठोस कृती कार्यक्रम ठरविला. एका दिवशी २५ हजार पत्रे पाठविली. त्यानंतर १५ दिवसांत उर्वरित ७५ हजार पत्रे पाठविली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून ५ लाख पत्रे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविली. या पत्रांची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयातील विभागप्रमुख अलोक सुमन यांनी विनोद कुलकर्णी यांना पत्र पाठविले आहे. विनोद कुलकर्णी यांनी पाठविलेली पत्रे मिळाली असून, ती पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या विषयात लक्ष घातले असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. साताऱ्यातील उपक्रमाचे प्रमुख नेत्यांनी दखल घेतल्याने यश मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)शरद पवारांचाही मोदींशी संवाद माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनीही या उपक्रमाची दखल घेतली असून, त्यांच्या स्वीय सहायकांनी विनोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर १४ मार्च रोजी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रासह राज्याबाहेर सुमारे नऊ कोटी लोक मराठी भाषिक आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. यासंदर्भात पाच लाख लोकांनी आपल्या कार्यालयास पत्रे पाठविली आहेत. याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली असून, केवळ आपली सही राहिली आहे. मराठी भाषकांच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा.’