शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

साताऱ्याच्या पत्रप्रपंचाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल

By admin | Updated: March 16, 2017 23:30 IST

पाच लाख पत्र : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी ‘मसाप’चे विनोद कुलकर्णी यांच्या प्रयत्नांना यश

सातारा : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या वतीने महाराष्ट्रातून ५ लाख पत्रे पाठविण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातून एक लाख पत्रे पाठविली होती. ‘मसाप’च्या पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकारातून जिल्ह्यात राबविलेल्या या उपक्रमाची दखल दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने घेतली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, याबाबतचा अहवाल साहित्य अकादमीने पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवून दोन वर्षे झाली. फक्त पंतप्रधान मोदी यांच्या सहीसाठी हा निर्णय राहिला आहे. तो त्यांनी त्वरित घ्यावा, यासाठी मसाप, पुणेच्या वतीने महाराष्ट्रातून ५ लाख विनंती पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठविण्याचा संकल्प केला होता. सातारा जिल्ह्यातून १ लाख पत्रे पाठवून खारीचा वाटा उचलला होता. मसाप शाहूपुरी शाखेच्या वतीने पाठवण्यात येणाऱ्या पत्र उपक्रमाचा प्रारंभ सातारा शहर पोस्ट कार्यालयात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते पत्रपेटीत पत्र टाकून झाला. यावेळी अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, किशोर बेडकिहाळ, मसाप, पुणेचे कार्यवाह विनोद कुलकर्णी, डॉ. उमेश करंबळेकर, शाहूपुरी शाखेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. मराठी भाषा १० कोटी लोकांची भाषा असून, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. पत्र पाठवण्याच्या उपक्रमात अनेकांनी सहभाग घेतला होता. यासाठी ठोस कृती कार्यक्रम ठरविला. एका दिवशी २५ हजार पत्रे पाठविली. त्यानंतर १५ दिवसांत उर्वरित ७५ हजार पत्रे पाठविली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून ५ लाख पत्रे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविली. या पत्रांची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतली आहे. पंतप्रधान कार्यालयातील विभागप्रमुख अलोक सुमन यांनी विनोद कुलकर्णी यांना पत्र पाठविले आहे. विनोद कुलकर्णी यांनी पाठविलेली पत्रे मिळाली असून, ती पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या विषयात लक्ष घातले असून यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. साताऱ्यातील उपक्रमाचे प्रमुख नेत्यांनी दखल घेतल्याने यश मिळण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)शरद पवारांचाही मोदींशी संवाद माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनीही या उपक्रमाची दखल घेतली असून, त्यांच्या स्वीय सहायकांनी विनोद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर १४ मार्च रोजी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रासह राज्याबाहेर सुमारे नऊ कोटी लोक मराठी भाषिक आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. यासंदर्भात पाच लाख लोकांनी आपल्या कार्यालयास पत्रे पाठविली आहेत. याबाबतची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाली असून, केवळ आपली सही राहिली आहे. मराठी भाषकांच्या भावनांचा आदर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा.’