शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

‘प्रधानमंत्री श्रमयोगी’त सातारा राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:57 IST

सागर गुजर । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सातारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या ...

सागर गुजर ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेत सातारा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील १७ हजार ७३५ कामगारांची नोंद झाली आहे. पुणे दुसऱ्या तर अमरावती तिसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्हा प्रशासनाने ताकदीने राबविलेल्या कार्यपद्धतीमुळे मोठ्या प्रमाणावर कामगारांच्या भविष्याचा प्रश्न सुटणार आहे.या योजनेच्या नोंदणीमध्ये सातारा जिल्हा सुरुवातीपासूनच अव्वल ठरला आहे. रविवारअखेर सातारा जिल्ह्यातील १७ हजार ७३५ कामगारांची या योजनेसाठी नोंद झाली. पुणे जिल्हा दुसºया क्रमांकावर असून, तिथे १२ हजार ३८६ कामगारांची नोंद झाली. तर अमरावती हा जिल्हा ११ हजार ५९२ कामगारांची नोंद करून तिसºया क्रमांकावर राहिला आहे. मुंबई जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे अवघ्या ४५७ जणांची नोंद झाली आहे. इतर जिल्ह्यांतील नोंदणीही सातारा जिल्ह्याच्या तुलनेत फारच कमी आहेत.केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षिता पुरविण्याच्या उद्देशाने दि. ३१ डिसेंबर २०१८ रोजी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम २००८ पारित केला. त्या अनुषंगाने विविध व्यवसाय गट जसे बांधकाम कामगार, घरेलू कामगार, फेरीवाले, शेतमजूर, गृह उद्योगातील कामगार, माथाडी कामगार, बिडी कामगार, यंत्रमाग कामगार, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यासारख्या विविध १२७ व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षितता पुरविण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना लागू करण्याबाबतचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या योजनेची कार्यवाही १५ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली.या योजनेत असंघटित क्षेत्रात काम करणारा १८ ते ४० वयोगटातील कामगार ज्याचे उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. कर्मचारी राज्य बिमा नियम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसणारा कामगार पात्र ठरणार आहे.१८ ते ४० वयोगटातील लाभार्थीने त्याच्या वयानुसार निर्धारित केलेल्या हप्त्यानुसार ५५ रुपये ते २०० रुपयांपर्यंत प्रतिमहिना अंशदान जमा केल्यास लाभार्थ्यास वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा ३ हजार रुपये निवृत्तीवेतन देय राहणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार व नागरी सुविधा केंद्रात ही नोंदणी सुरू आहे.पंतप्रधानांच्या हस्ते आज उदघाटनप्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचे उद्घाटन ५ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.