शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रेच आजारी; ७०० पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:39 IST

सातारा : केंद्र शासनाने अर्थसंकल्पात आरोग्यावर मोठा भर दिला असला तरी आरोग्य विभागात आजही अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ...

सातारा : केंद्र शासनाने अर्थसंकल्पात आरोग्यावर मोठा भर दिला असला तरी आरोग्य विभागात आजही अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांना सेवा देताना अडचणी येतात. सातारा जिल्ह्यात तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वर्ग ३ व ४ ची ७०० हून अधिक पदे रिक्त आहेत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे चालविण्यात येतात. या माध्यमातून ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा दिली जाते. पण, वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांची पदे सतत रिक्त असतात. सध्यस्थितीत आरोग्य अधिकाऱ्यांची पदे भरली असली तरी इतर काही पदे रिक्त आहेत. वर्ग ३ आणि ४ ची अनेक पदे मंजूर असूनही रिक्त आहेत. यामध्ये औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, सेविका, पर्यवेक्षक यांची १ हजार ५७१ पदे मंजूर आहेत. पण, यामधील सध्या ८१३ कार्यरत असून, ७५८ रिक्त आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी असून, यावरच प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा डोलारा उभा आहे.

कोरोनासारखी संकटे लक्षात घेऊन आरोग्य विभाग सज्ज असणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासनस्तरावरुनच हालचाली होण्याची खरी गरज आहे.

आरोग्य केंद्राची संख्या

आकडेवारी अशी

आरोग्य केंद्रे ७२, उपकेंद्रे ४००

ऐकूण कर्मचारी संख्या

गट अ पदे १६७

वर्ग ३ व ४ पदे १५७१

एकूण रिक्त कर्मचाऱ्यांची संख्या

गट अ रिक्त पदे ५

वर्ग ३ व ४ रिक्त पदे ७५८

कोट .

राज्य शासनाने परवानगी दिल्याने आरोग्य केंद्रात कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली आहेत. त्यामुळे फारशी अडचण येत नाही. मात्र, वर्ग तीन आणि चारची अनेक पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी परवानगी मिळाली इतर कर्मचाऱ्यांवर ताण येणार नाही.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

चौकट :

डॉक्टर आहेत, कर्मचारी नाहीत...

सातारा जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांची तपासणी होत आहे. पण, इतर कर्मचारी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढतोय. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे जावे लागते. त्यामुळे तारेवरची कसरत सुरू असते.

............................................................................

...............................................................