शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

महामार्गावरील वेगाची ‘किंमत’ तब्बल ३७ लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:44 IST

सातारा : महामार्गावरून प्रवास करत असताना वाहन आपले असले तरी, या वाहनावर नियंत्रण मात्र इंटरसेप्टर व्हेईकलचे आहे. त्यामुळे हे ...

सातारा : महामार्गावरून प्रवास करत असताना वाहन आपले असले तरी, या वाहनावर नियंत्रण मात्र इंटरसेप्टर व्हेईकलचे आहे. त्यामुळे हे व्हेईकल तुमच्या वेगाची किंमत ठरवतेय. जितका स्पीड जास्त, तितकी तुमची किंमतही मोजली जातेय. गेल्या चार महिन्यात महामार्गावरून जाणाऱ्या ३ हजार ७४५ वाहनांना तब्बल ३७ लाख रुपये केवळ वेगाची किंमत म्हणून मोजावी लागलीय.

महामार्गावरून भरधाव वाहने जात असल्यामुळे अपघातांचे प्रमाण अलीकडे अधिकच वाढतेय. काही वेळेला धोकादायक वळण आणि खड्डे अपघाताला कारणीभूत असल्याचे समोर येते. पण यापेक्षा सर्वाधिक ‘वेग’ हाच अपघाताचे मूळ कारण असल्याचा अहवाल वारंवार प्रशासनाकडे पोलीस देत असतात. रस्ता असेल तशी स्पीडची मर्यादा असते. जास्तीत जास्त ८० ते ८० च्या स्पीडने महामार्गावरून प्रवास करणे बंधनकारक आहे. मात्र, वाहन चालकांना हे सरकारी स्पीड रटाळवाणे वाटतेय. त्यामुळे अनेक वाहनचालक शंभर, १२०, १३० च्या स्पीडने महामार्गावरून वाहन चालवत असतात. अशाच वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी इंटरसेप्टर व्हेईकल महामार्गावर तैनात करण्यात आलेय. तुमच्या वेगाची किंमत आता हे वाहन ठरवतंय. हाय स्पीड असणाऱ्या वाहनांचे फोटो या व्हेईकलमधील मशीन काढून घेतेय. तुमचे वाहन किती स्पीडने जात होते, त्याची इत्यंभूत माहिती तसेच तुम्ही वाढविलेल्या वेगाची किंमत एक हजार वाहन चालकांच्या मोबाईलवर पाठविली जात आहे. अशा प्रकारच्या कारवाया महामार्गावर वाढल्या आहेत. मात्र, तरी सुद्धा वाहन चालक यामधून धडा घेत नाहीत. जेव्हा वाहन चालकाच्या मोबाईलवर मेसेज येतो, तेव्हाच त्यांना आपल्या वेगाची किंमत एक हजार रुपयांना पडली असल्याचे समजतेय. म्हणजे वाहन चालकांच्या जीवघेण्या वेगातूनही रोज शासनाच्या खात्यात पैसे जमा होतायेत. वास्तविक हे पैसे भरण्यासाठी १५ दिवसांची मुदत असते. मात्र, अनेक वाहनचालक याकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा कधी त्यांचे वाहन पोलीस पकडतील, तेव्हा कुठे त्यांना आपल्या वाहनावर वेगाची किंमत एक हजार असल्याचे समजते. मागील थकबाकी भरल्याशिवाय पोलीस वाहन सोडत नाहीत. त्यामुळे वाहन चालकांना त्यांच्या वेगाची किंमत मोजावीच लागते.

चाैकट :

ऑनलाईन भरतायेत पैसे...

अनेक वाहन चालकांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज गेल्यानंतर, असे वाहन चालक ऑनलाईन पेमेंट भरत असतात, तर काही वाहन चालकांचा मोबाईल रजिस्टर नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचतच नाही. पण पोलिसांच्या मशीनमध्ये मात्र, वेगाची चूक नोंद केलेली असते. ती कधी ना कधी बाहेर येतेच आणि त्याची किंमत वाहन चालकांना चुकवावीच लागते.