शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

काँग्रेसचे प्राबल्य राष्ट्रवादी मोडीत काढणार?

By admin | Updated: October 29, 2015 00:17 IST

वाई तालुका : ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार जोमात; मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या

संजीव वरे --वाई तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केंजळ, जांभ आणि ओझर्डे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला आहे. बहुतेक निवडणुका राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील व किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी वाढल्या असून, निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. वाई तालुक्यातील केंजळ, जांब, ओझर्डे, सुलतानपूर, वाघजाईवाडी व गोरेगाव या सहा ग्रामपंचायतींसह इतर आठ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहेत. यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या केंजळ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस पुरस्कृत किसन वीर कारखान्याचे संचालक प्रवीण जगताप यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून ११ जागांसाठी निवडणूक लढविली जात आहे. जांबमध्ये माजी सभापती प्रमोद शिंदे यांच्या नेतत्वाखाली चिलाईदेवी परिवर्तन पॅनेल व किसन वीर कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चिलाईदेवी ग्रामविकास पॅनेल यांच्यात १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीसाठी लढत होत आहे. तर ओझर्डेमध्ये काँग्रेसकडून शेतकरी पॅनेलचे नेतृत्व हणमंतराव पिसाळ व सी. व्ही. काळे तर राष्ट्रवादीकडून बाळासाहेब पिसाळ व तिसऱ्या ओझर्डे विकास आघाडीचे नेतृत्व दिलीप फरांदे करीत आहे. या ठिकाणी १५ जागांसाठी निवडणूक होत असून, उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठींवर जोर दिला आहे.तिन्ही ठिकाणी राजकीय प्रचार वाढला असून, उमेदवारांचा मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्याकडे कल वाढला आहे. ग्रामपंचायतींवर आपली सत्ता स्थापन करण्यासाठी उमेदवारांचे कसोशीने प्रयत्न सुरू केले आहे.निवडणुकीकडे तालुक्याच्या नजराकेंजळ, जांब, ओझर्डे यासह इतर गावांमध्येही स्थानिक प्रश्नांवर निवडणुका लढविल्या जात आहे. तालुक्यात आजी-माजी आमदारांच्या नावावर व कॉँग्रेस राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून निवडणुका होत असून दुसऱ्या पक्षाचे अस्तित्व कोठेही दिसून येत नाही. महत्त्वाच्या तिन्ही ग्रामपंचायतींवर कॉँग्रेसचे प्राबल्य होते. राष्ट्रवादी हे प्राबल्य मोडीत काढणार की, कॉँग्रेस सत्ता अबाधित ठेवणार याकडे सपंूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होणार आहे.